शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

दोन मिनिटांच्या वेळेसाठी खडसेंचा संताप; थेट आकस अन् दुश्मनीचाच आरोप

By योगेश पांडे | Updated: December 18, 2024 18:29 IST

Nagpur : तालिका सभापतींशी जुंपली

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषद सभागृहात कामकाज सुरू असताना आपली भूमिका जास्तीत जास्त वेळ मांडण्याचा अनेक सदस्यांचा प्रयत्न असतो. यात त्यांना दिलेल्या वेळेचे भानदेखील राहत नाही आणि कुणी आठवण करून दिली तर तीळपापड होतो. असाच प्रकार बुधवारी विधान परिषदेत झाला. विधान परिषदेत तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी वेळेची आठवण करून दिल्याने राष्ट्रवादीचे सदस्य एकनाथ खडसे बुधवारी चांगलेच संतापल्याचे दिसून आले. दोन मिनिटे अगोदर मला का थांबविले, असा सवाल उपस्थित करत खडसे यांनी डावखरे यांच्यावर आकस आणि दुश्मनीचाच आरोप लावला. यामुळे सभागृहातील सदस्यदेखील अचंबित झाले.

राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना खडसे ११.२७ मिनिटांनी बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी अभिभाषणात आदिवासी व अनुसूचित जातींच्या मुद्द्यांचा समावेश नसल्याबाबत खंत व्यक्त केली. तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी खडसे यांना दहा मिनिटेच बोलण्याची मुभा दिली होती. याची ११.३७ मिनिटांनी डावखरे यांनी बेल वाजवून आठवण करून दिली. यावरून खडसे यांचा पारा चढला. तुम्ही खुर्चीवर असताना मला कधीही वेळ देत नाही, असे म्हणून त्यांनी संताप व्यक्त केला. तुमचा माझ्यावर इतका आकस का आहे व माझ्याशी तुमची काय दुश्मनी आहे तसेच मला दोन मिनिटे अगोदर का थांबविले, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. खडसेंच्या या वक्तव्यानंतर मंत्री शंभूराज देसाई हे लगेच उभे झाले व सभापती किंवा तालिका सभापतींबाबत आकसाची भाषा करणे अयोग्य असल्याचे म्हटले. तुम्हाला अगोदरच वेळेची कल्पना दिली होती. खुर्चीवर वैयक्तिक टीका करणे चुकीचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली. डावखरे यांनीदेखील खडसे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर सेनेचे अनिल परब यांनी आक्षेप घेतला. कुणी किती वेळ बोलायचे हे कोण ठरविणार व त्याला कुठल्या नियमाचा आधार आहे, असा सवाल त्यांनी केला. अखेर डावखरे यांनी त्यांना सभापतिपदाच्या खुर्चीवर असलेल्यांना नियम क्रमांक ६२ अंतर्गत हे ठरविता येते असे उत्तर दिले. मात्र विरोधकांचा गोंधळ सुरूच होता.

आदिवासींनी राज्यात जन्म घेऊन पाप केले का?राज्य सरकार आदिवासी व अनुसूचित जातींच्या विरोधात असल्याची टीका त्यांनी केली. नंदुरबारप्रमाणे कोल्हापूर, जळगाव, ठाणे जिल्ह्यांतदेखील कुपोषण वाढत असून, राज्यासाठी ही बाब लांच्छनास्पद आहे. याची सरकारने चौकशी केली पाहिजे व विशेष मोहीम राबविली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आदिवासींकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहेत. ते कीड्यामुंग्यांसारखे आयुष्य जगत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात जन्म घेऊन पाप केले का, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनVidhan Parishadविधान परिषदnagpurनागपूर