शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोन मिनिटांच्या वेळेसाठी खडसेंचा संताप; थेट आकस अन् दुश्मनीचाच आरोप

By योगेश पांडे | Updated: December 18, 2024 18:29 IST

Nagpur : तालिका सभापतींशी जुंपली

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषद सभागृहात कामकाज सुरू असताना आपली भूमिका जास्तीत जास्त वेळ मांडण्याचा अनेक सदस्यांचा प्रयत्न असतो. यात त्यांना दिलेल्या वेळेचे भानदेखील राहत नाही आणि कुणी आठवण करून दिली तर तीळपापड होतो. असाच प्रकार बुधवारी विधान परिषदेत झाला. विधान परिषदेत तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी वेळेची आठवण करून दिल्याने राष्ट्रवादीचे सदस्य एकनाथ खडसे बुधवारी चांगलेच संतापल्याचे दिसून आले. दोन मिनिटे अगोदर मला का थांबविले, असा सवाल उपस्थित करत खडसे यांनी डावखरे यांच्यावर आकस आणि दुश्मनीचाच आरोप लावला. यामुळे सभागृहातील सदस्यदेखील अचंबित झाले.

राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना खडसे ११.२७ मिनिटांनी बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी अभिभाषणात आदिवासी व अनुसूचित जातींच्या मुद्द्यांचा समावेश नसल्याबाबत खंत व्यक्त केली. तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी खडसे यांना दहा मिनिटेच बोलण्याची मुभा दिली होती. याची ११.३७ मिनिटांनी डावखरे यांनी बेल वाजवून आठवण करून दिली. यावरून खडसे यांचा पारा चढला. तुम्ही खुर्चीवर असताना मला कधीही वेळ देत नाही, असे म्हणून त्यांनी संताप व्यक्त केला. तुमचा माझ्यावर इतका आकस का आहे व माझ्याशी तुमची काय दुश्मनी आहे तसेच मला दोन मिनिटे अगोदर का थांबविले, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. खडसेंच्या या वक्तव्यानंतर मंत्री शंभूराज देसाई हे लगेच उभे झाले व सभापती किंवा तालिका सभापतींबाबत आकसाची भाषा करणे अयोग्य असल्याचे म्हटले. तुम्हाला अगोदरच वेळेची कल्पना दिली होती. खुर्चीवर वैयक्तिक टीका करणे चुकीचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली. डावखरे यांनीदेखील खडसे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर सेनेचे अनिल परब यांनी आक्षेप घेतला. कुणी किती वेळ बोलायचे हे कोण ठरविणार व त्याला कुठल्या नियमाचा आधार आहे, असा सवाल त्यांनी केला. अखेर डावखरे यांनी त्यांना सभापतिपदाच्या खुर्चीवर असलेल्यांना नियम क्रमांक ६२ अंतर्गत हे ठरविता येते असे उत्तर दिले. मात्र विरोधकांचा गोंधळ सुरूच होता.

आदिवासींनी राज्यात जन्म घेऊन पाप केले का?राज्य सरकार आदिवासी व अनुसूचित जातींच्या विरोधात असल्याची टीका त्यांनी केली. नंदुरबारप्रमाणे कोल्हापूर, जळगाव, ठाणे जिल्ह्यांतदेखील कुपोषण वाढत असून, राज्यासाठी ही बाब लांच्छनास्पद आहे. याची सरकारने चौकशी केली पाहिजे व विशेष मोहीम राबविली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आदिवासींकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहेत. ते कीड्यामुंग्यांसारखे आयुष्य जगत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात जन्म घेऊन पाप केले का, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनVidhan Parishadविधान परिषदnagpurनागपूर