शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
4
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
5
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
6
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
7
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
8
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
9
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
10
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
11
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
12
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
13
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
14
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
15
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
16
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
17
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
18
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
19
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
20
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट

दोन मिनिटांच्या वेळेसाठी खडसेंचा संताप; थेट आकस अन् दुश्मनीचाच आरोप

By योगेश पांडे | Updated: December 18, 2024 18:29 IST

Nagpur : तालिका सभापतींशी जुंपली

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषद सभागृहात कामकाज सुरू असताना आपली भूमिका जास्तीत जास्त वेळ मांडण्याचा अनेक सदस्यांचा प्रयत्न असतो. यात त्यांना दिलेल्या वेळेचे भानदेखील राहत नाही आणि कुणी आठवण करून दिली तर तीळपापड होतो. असाच प्रकार बुधवारी विधान परिषदेत झाला. विधान परिषदेत तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी वेळेची आठवण करून दिल्याने राष्ट्रवादीचे सदस्य एकनाथ खडसे बुधवारी चांगलेच संतापल्याचे दिसून आले. दोन मिनिटे अगोदर मला का थांबविले, असा सवाल उपस्थित करत खडसे यांनी डावखरे यांच्यावर आकस आणि दुश्मनीचाच आरोप लावला. यामुळे सभागृहातील सदस्यदेखील अचंबित झाले.

राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना खडसे ११.२७ मिनिटांनी बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी अभिभाषणात आदिवासी व अनुसूचित जातींच्या मुद्द्यांचा समावेश नसल्याबाबत खंत व्यक्त केली. तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी खडसे यांना दहा मिनिटेच बोलण्याची मुभा दिली होती. याची ११.३७ मिनिटांनी डावखरे यांनी बेल वाजवून आठवण करून दिली. यावरून खडसे यांचा पारा चढला. तुम्ही खुर्चीवर असताना मला कधीही वेळ देत नाही, असे म्हणून त्यांनी संताप व्यक्त केला. तुमचा माझ्यावर इतका आकस का आहे व माझ्याशी तुमची काय दुश्मनी आहे तसेच मला दोन मिनिटे अगोदर का थांबविले, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. खडसेंच्या या वक्तव्यानंतर मंत्री शंभूराज देसाई हे लगेच उभे झाले व सभापती किंवा तालिका सभापतींबाबत आकसाची भाषा करणे अयोग्य असल्याचे म्हटले. तुम्हाला अगोदरच वेळेची कल्पना दिली होती. खुर्चीवर वैयक्तिक टीका करणे चुकीचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली. डावखरे यांनीदेखील खडसे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर सेनेचे अनिल परब यांनी आक्षेप घेतला. कुणी किती वेळ बोलायचे हे कोण ठरविणार व त्याला कुठल्या नियमाचा आधार आहे, असा सवाल त्यांनी केला. अखेर डावखरे यांनी त्यांना सभापतिपदाच्या खुर्चीवर असलेल्यांना नियम क्रमांक ६२ अंतर्गत हे ठरविता येते असे उत्तर दिले. मात्र विरोधकांचा गोंधळ सुरूच होता.

आदिवासींनी राज्यात जन्म घेऊन पाप केले का?राज्य सरकार आदिवासी व अनुसूचित जातींच्या विरोधात असल्याची टीका त्यांनी केली. नंदुरबारप्रमाणे कोल्हापूर, जळगाव, ठाणे जिल्ह्यांतदेखील कुपोषण वाढत असून, राज्यासाठी ही बाब लांच्छनास्पद आहे. याची सरकारने चौकशी केली पाहिजे व विशेष मोहीम राबविली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आदिवासींकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहेत. ते कीड्यामुंग्यांसारखे आयुष्य जगत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात जन्म घेऊन पाप केले का, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनVidhan Parishadविधान परिषदnagpurनागपूर