शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
2
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
5
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
6
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
7
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
8
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
9
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
10
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
11
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
12
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
13
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
14
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
15
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
16
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
17
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
18
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
19
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
20
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर की खड्डापूर!

By admin | Updated: August 5, 2015 02:33 IST

मे महिन्यात शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण झाल्याने नागरिकांनी कौतुक केले होते. परंतु जून महिन्यातील पहिल्याच पावसाने नागपुरातील रस्त्यांची पोल खोलली.

पावसात मारताहेत पॅचेस : खड्ड्यामुळे लोकांचा जीव धोक्यातलोकमत जागरनागपूर: मे महिन्यात शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण झाल्याने नागरिकांनी कौतुक केले होते. परंतु जून महिन्यातील पहिल्याच पावसाने नागपुरातील रस्त्यांची पोल खोलली. दुरुस्ती झालेल्या शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले. त्यानंतर पावसाने उसंत घेतली. या कालावधीत शहरातील खड्डे बुजवले जातील, अशी अपेक्षा होती. काही ठिकाणी पॅचेस मारण्यात आले. परंतु काही दिवसातच यातील गिट्टी बाहेर आली. शहरातील व्हीआयपी मार्ग व सिव्हील लाईन भागातील रस्ते सोडले तर बहुसंख्य रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे ‘नागपूर की खड्डापूर’ असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.लोकमत चमूने मंगळवारी शहरातील रस्त्यांची पाहणी केली. तेव्हा काही अपवाद वगळता बहुसंख्य रस्त्यांवर खड्डे पडल्याचे निदर्शनास आले. एकदा केलेले डांबरीकरण लगेच हलक्या पावसाने कसे उखडते, या कामांमध्ये भ्रष्टाचार तर झाला नाही ना, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. त्यातच दोन दिवसापासून शहरात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे खड्ड्यात पुन्हा भर पडल्याने वाहन चालकांचा जीव धोक्यात आला आहे.(प्रतिनिधी)वस्तीतील अंतर्गत रस्तेही खराबशहरातील मुख्य रस्त्यापेक्षा वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांची स्थिती वाईट आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पावसाने उघाड दिल्यानंतर खड्डे बुजवण्याचे काम सुरू होईल. परंतु पावसामुळे पुन्हा खड्डे पडतील. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यातही लोकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे. शहरातील नागरिक व्हीआयपी नाही का? मुख्यमंत्री, केंद्र व राज्याचे मंत्री यांच्यासारखे व्हीआयपी शहरातील विशिष्ट मार्गावरून ये-जा करतात. अशा मार्गाची स्थिती चांगली आहे. परंतु शहरातील इतर मार्गाची अवस्था बिकट आहे. प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीने शहरातील नागरिक व्हीआयपी नाही का, चांगल्या रस्त्यांवरून फिरण्याचा त्यांना हक्क नाही का, असे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. डांबरीकरण उखडले त्याचे काय ?दीड -दोन महिन्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेल्या काही रस्त्यांवर खड्डे नाहीत मात्र पावसामुळे डांबरीकरण पूर्ण उखडले आहे. त्यामुळे रस्त्यावर दगडकणांचा थर साचला आहे. यावरून दुचाकी वाहने घसरत आहेत.दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चून खड्डे भरले जातात. मात्र, पुढच्या वर्षी पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडतात. यावरून खड्डे भरण्याच्या कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.