शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण अधिकारी सापडले कात्रीत

By admin | Updated: June 17, 2014 00:43 IST

जिल्हा विद्युतीकरण समन्वय बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत विद्युत महावितरण अधिकारी खासदार व आमदारांच्या कात्रीत सापडले होते. भारनियमनविषयी

समन्वय बैठकीत केवळ चर्चा : भारनियमनाचा मुद्दा गाजलाअमरावती : जिल्हा विद्युतीकरण समन्वय बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत विद्युत महावितरण अधिकारी खासदार व आमदारांच्या कात्रीत सापडले होते. भारनियमनविषयी तसेच विद्युत महावितरणाबद्दलच्या अनेक तक्रारींबाबत बैठकीत घमासान चर्चा झाल्याने महावितरण अधिकाऱ्यांना बोलणे सुचेनासे झाले होते. खासदार आंनदराव अडसूळ यांच्या अध्यतेखाली झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार, माजी खासदार अंनत गुढे, विद्युत महावितरणाचे अधीक्षक अभिंयता दिलीप घुगल, इंडिया बुल्सचे व्यवस्थापक अमित पंचालवार, आमदार वीरेन्द्र जगताप, आमदार प्रवीण पोटे, आमदार केवलराम काळे, आमदार यशोमती ठाकूर, आमदार अभिजित अडसूळ, एमआयडीसी असोसिएयनचे अध्यक्ष राजेन्द्र भागलीया, विद्युत विभागाचे प्रमोद दहाट, व्ही.डी. मेंढे, किरण पातूरकर यांच्यासह आदी उपस्थित होते. या बैठकीत विविध मुद्दे असताना कोणत्या मुद्यावर आधी चर्चा करायची हाच प्रश्न पडला होता. चर्चेतील पहिला मुद्दा खासदारांनी वाचुन दाखविला. यामध्ये ग्राहकांच्या प्रत्येक वर्गवारीमध्ये दरवर्षी होणाऱ्या वाढीच्या प्रमाणात विद्युत वितरण व्यवस्थेतील पायाभूत सुविधा वाढ सुसंगत आहे काय, याबाबत माहिती देण्याचे मुद्दा ठेवण्यात आला. मात्र आपल्या जिल्ह्याला किती मेगावॅट विजेची आवश्यकता आहे. त्यावर विद्युत वितरण कंपनीने काय केले आणि पुढे काय करणार यावर विद्युत वितरण अधिकाऱ्यांचे मत ऐकून घेण्यात आले. जिल्ह्याला ५७५ मेगावॅट विजेची आवश्यकता आहे व आपल्याकडे ५०० मेगावॅट वीज उपलब्ध आहे. त्यावर जिल्ह्याचे काम चालू शकते, असे मत विद्युत महावितरणाचे अधिकाऱ्यांनी मांडले. मात्र तरीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी भारनियमन होत आहे, असा सवाल आमदारांनी उपस्थित केला. आमदारांनी आपआपल्या परिसरातील समस्या आवर्जून बैठकीत मांडल्या. वीज वितरणचे अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. एवढेच नव्हे तर स्वत: विद्युत महावितरणाच्या दारी जाऊन आपल्या समस्या माडंल्या. मात्र त्याकडेही लक्ष देण्यात आले नाही, अशी खंत त्यांनी बैठकीत व्यक्त केली. आमदारांच्याच समस्यांकडेच दुर्लक्ष केले जाते मग सामान्य नागरिकांच्या समस्या कश्या दूर होणार, असा सूर बैठकीत निघाला. शेतकऱ्यांच्या समस्या, शहरातील नागरिकांच्या वीज जोडणी तसेच वीज वितरणचे इनफ्रास्ट्रक्चर अशा एक ना अनेक मुद्यांवर घमासान चर्चा झाली. यावर विद्युत महावितरण अधिकाऱ्यांनी घोंगडे झटकण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळेपर्यंत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. अखेर विद्युत वितरणने वीज पुरवठ्याबद्दल उपाययोजना कराव्या, असे निर्देश खासदार अडसुळांनी दिले. (प्रतिनिधी)