शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

काटवल, खापरखुटी, चंदनबटवा, कुंजीरचा मेवा; भरपावसात सजला रानभाज्यांचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 10:50 IST

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने रविनगर शासकीय वसाहतीच्या मैदानात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देश्रावणातील भाज्यांनी वाढवा प्रतिकारशक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्रावण महिन्यात रानावनातून मिळणाऱ्या रानभाज्या व रानफळे म्हणजे निसर्गाने दिलेला ठेवाच आहे. या रानभाज्या खायला जेवढ्या रुचकर तेवढ्याच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत फायदेशीर. अळु, अंबाडी, काटवल, चिवई, गावरानी कोहळे, सुरण, गुळवेल, शेवगा, खापरखुटी, चंदनबटवा, समुद्री घोष, बांबू आस्ते, केना, कुंजीर या भाज्यांची चवच वेगळी. शहरवासीयांसाठी हा तसा दुर्मिळ ठेवा. अशावेळी रविवारी भरपावसात रानभाज्यांचा बाजार भरला आणि नागरिकांनी हा रानमेवा घरी नेण्यासाठी गर्दी केली.कोरोना काळात प्रत्येकाच्या मनाला भीतीने घेरले आहे. हा आजार होऊ नये यासाठी स्वत:ची रोग प्रतिकारशक्ती वाढविणे हा एकच पर्याय आपल्याजवळ आहे. ही प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी श्रावणात मिळणाऱ्या या रानभाज्या व रानफळांचा आहारात समावेश असणे महत्त्वाचे आहे. हे महत्त्व ओळखून जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने रविनगर शासकीय वसाहतीच्या मैदानात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. राज्यात १०४ प्रजातींच्या रानभाज्यांचा समावेश आहे. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, कृषी विभागाचे सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे, आत्माच्या संचालक नलिनी भोयर प्रामुख्याने उपस्थित होते. महोत्सवाला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपवनसंरक्षक प्रभुदयाल शुक्ल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील भेट दिली.

रानफळांचीही मेजवानीखास विदर्भाचे वैशिष्ट्य असलेल्या नऊ भाज्यांसह इतरही पालेभाज्या व रानफळे दिसून येतात. अशा विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश महोत्सवात होता. १४ स्टॉलवर रानभाज्यांसह रानफळे उपलब्ध होती. शहरावासीयांसाठी अनोखी पर्वणी ठरली. औषधी गुणधर्मांसह त्यांच्या पाककृतींची माहिती स्टॉलवर असल्याने नागरिकांनी उत्साहाने या भाज्या खरेदी केल्या.

टॅग्स :vegetableभाज्या