शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

काटोल विधानसभा पोटनिवडणूक : भाजपात अनेक इच्छुक, मात्र अटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 21:44 IST

काटोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपामध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. पण इच्छुकांनी जिंकल्यास पुढील वेळी कायम ठेवण्याची अट घातली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित मानला जात आहे. पण खर्चाची गणितं आड येत आहेत. पोटनिवडणुकीत उमेदवारी दुसऱ्याला दिल्यास आणि उमेदवार जिंकल्यास निश्चित उमेदवार गोत्यात येण्याची भीती आहे. राज्यात भाजप-सेनेची युती झाल्याने शिवसेनेने उडी मारली आहे. पण भाजपाची दावेदारी जास्त आहे. काटोलमध्ये साडेतीन महिन्यासाठी कुणाला आमदार बनवायचे, हे राजकीय पक्षापुढे कन्फ्युजन आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीकडे नाही पर्याय : सेनेची भूमिका तळ्यात-मळ्यात : काटोलचे कन्फ्युजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपामध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. पण इच्छुकांनी जिंकल्यास पुढील वेळी कायम ठेवण्याची अट घातली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित मानला जात आहे. पण खर्चाची गणितं आड येत आहेत. पोटनिवडणुकीत उमेदवारी दुसऱ्याला दिल्यास आणि उमेदवार जिंकल्यास निश्चित उमेदवार गोत्यात येण्याची भीती आहे. राज्यात भाजप-सेनेची युती झाल्याने शिवसेनेने उडी मारली आहे. पण भाजपाची दावेदारी जास्त आहे. काटोलमध्ये साडेतीन महिन्यासाठी कुणाला आमदार बनवायचे, हे राजकीय पक्षापुढे कन्फ्युजन आहे.भारतीय जनता पक्ष नागपूर शहरातील उमेदवार काटोलमधून उभा करण्यास इच्छुक आहे. पण स्थानिक इच्छुकांनीही पक्षाकडे आपली इच्छा प्रदर्शित केली आहे. किंबहुना पक्षाच्या निर्णयाप्रति नाराजीही व्यक्त करीत सूचक इशाराही दिला आहे; सोबतच अटसुद्धा पक्षापुढे ठेवली आहे. दोन्ही निवडणुकीत खर्च करायला हरकत नाही. पण पोटनिवडणुकीत निवडून आल्यास पुन्हा संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजप-सेनेची युती नसल्याने दोन्ही पक्षाचे उमेदवार येथे उभे झाले होते. पण भाजपाच्या आशिष देशमुखांनी विजय मिळविला होता. आता राज्यात सेना-भाजपाची युती झाली आहे. पण युतीत ही जागा शिवसेनेला जाते आहे. मात्र भाजपा २०१४ मध्ये निवडून आल्यामुळे भाजपाच्या इच्छुकांनी येथे दावा केला आहे. लोकसभेपूर्वी ही पोटनिवडणूक होत असल्याने शिवसेनेला मदत करावीच लागेल, असे त्यांना वाटते आहे. त्यामुळे २०१४ ला शिवसेनेला मिळालेली १४ हजार मतांवरही भाजपाच्या इच्छुकांचा डोळा आहे. हीच अपेक्षा शिवसेनेच्या इच्छुकांकडूनही व्यक्त होत आहे. शिवाय युतीत काटोलची जागा शिवसेनेला जात असल्याने शिवसेनेतूनही इच्छुकांची दावेदारी वाढली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारीवरून खलबते सुरू आहे.आघाडीत मात्र काटोलमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीचा उमेदवार कायम राहणार आहे. पण साडेतीन महिन्यासाठी होणारा खर्च आणि परत ऑक्टोबरमध्ये लागणाऱ्या निवडणुकीत करावा लागणार खर्च, हे गणित राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी अवघड ठरते आहे. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला त्याशिवाय पर्यायच नसल्याचे सांगण्यात येत आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूकnagpurनागपूर