शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

काटोल विधानसभा पोटनिवडणूक : भाजपात अनेक इच्छुक, मात्र अटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 21:44 IST

काटोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपामध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. पण इच्छुकांनी जिंकल्यास पुढील वेळी कायम ठेवण्याची अट घातली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित मानला जात आहे. पण खर्चाची गणितं आड येत आहेत. पोटनिवडणुकीत उमेदवारी दुसऱ्याला दिल्यास आणि उमेदवार जिंकल्यास निश्चित उमेदवार गोत्यात येण्याची भीती आहे. राज्यात भाजप-सेनेची युती झाल्याने शिवसेनेने उडी मारली आहे. पण भाजपाची दावेदारी जास्त आहे. काटोलमध्ये साडेतीन महिन्यासाठी कुणाला आमदार बनवायचे, हे राजकीय पक्षापुढे कन्फ्युजन आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीकडे नाही पर्याय : सेनेची भूमिका तळ्यात-मळ्यात : काटोलचे कन्फ्युजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपामध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. पण इच्छुकांनी जिंकल्यास पुढील वेळी कायम ठेवण्याची अट घातली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित मानला जात आहे. पण खर्चाची गणितं आड येत आहेत. पोटनिवडणुकीत उमेदवारी दुसऱ्याला दिल्यास आणि उमेदवार जिंकल्यास निश्चित उमेदवार गोत्यात येण्याची भीती आहे. राज्यात भाजप-सेनेची युती झाल्याने शिवसेनेने उडी मारली आहे. पण भाजपाची दावेदारी जास्त आहे. काटोलमध्ये साडेतीन महिन्यासाठी कुणाला आमदार बनवायचे, हे राजकीय पक्षापुढे कन्फ्युजन आहे.भारतीय जनता पक्ष नागपूर शहरातील उमेदवार काटोलमधून उभा करण्यास इच्छुक आहे. पण स्थानिक इच्छुकांनीही पक्षाकडे आपली इच्छा प्रदर्शित केली आहे. किंबहुना पक्षाच्या निर्णयाप्रति नाराजीही व्यक्त करीत सूचक इशाराही दिला आहे; सोबतच अटसुद्धा पक्षापुढे ठेवली आहे. दोन्ही निवडणुकीत खर्च करायला हरकत नाही. पण पोटनिवडणुकीत निवडून आल्यास पुन्हा संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजप-सेनेची युती नसल्याने दोन्ही पक्षाचे उमेदवार येथे उभे झाले होते. पण भाजपाच्या आशिष देशमुखांनी विजय मिळविला होता. आता राज्यात सेना-भाजपाची युती झाली आहे. पण युतीत ही जागा शिवसेनेला जाते आहे. मात्र भाजपा २०१४ मध्ये निवडून आल्यामुळे भाजपाच्या इच्छुकांनी येथे दावा केला आहे. लोकसभेपूर्वी ही पोटनिवडणूक होत असल्याने शिवसेनेला मदत करावीच लागेल, असे त्यांना वाटते आहे. त्यामुळे २०१४ ला शिवसेनेला मिळालेली १४ हजार मतांवरही भाजपाच्या इच्छुकांचा डोळा आहे. हीच अपेक्षा शिवसेनेच्या इच्छुकांकडूनही व्यक्त होत आहे. शिवाय युतीत काटोलची जागा शिवसेनेला जात असल्याने शिवसेनेतूनही इच्छुकांची दावेदारी वाढली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारीवरून खलबते सुरू आहे.आघाडीत मात्र काटोलमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीचा उमेदवार कायम राहणार आहे. पण साडेतीन महिन्यासाठी होणारा खर्च आणि परत ऑक्टोबरमध्ये लागणाऱ्या निवडणुकीत करावा लागणार खर्च, हे गणित राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी अवघड ठरते आहे. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला त्याशिवाय पर्यायच नसल्याचे सांगण्यात येत आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूकnagpurनागपूर