शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक-तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातदेखील कायदा आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 21:28 IST

अनुसूचित जाती व अनुसूचित जाती विभागाचा निधी खर्च करण्यासंदर्भात कर्नाटक व तेलंगणामध्ये कायदा आहे. महाराष्ट्रातदेखील याप्रमाणे कायदा आणण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग मंत्री नितीन राऊत यांनी केली.

ठळक मुद्दे‘एससी-एसटी’ विभागाच्या निधीसंदर्भात घोषणा : आदिवासी वसतिगृहे शासकीय इमारतींमध्ये आणण्यासाठी प्रयत्न

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अनुसूचित जाती व अनुसूचित जाती विभागाचा निधी खर्च करण्यासंदर्भात कर्नाटक व तेलंगणामध्ये कायदा आहे. महाराष्ट्रातदेखील याप्रमाणे कायदा आणण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग मंत्री नितीन राऊत यांनी केली. विधान परिषदेत रवींद्र फाटक यांनी पालघरमधील आदिवासी मुलांच्या वसतिगृहासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान ते बोलत होते.अनुसूचित जाती व अनुसूचित जाती विभागाला शासनाकडून निधी देण्यात येतो. तो खर्च करण्यासंदर्भात कर्नाटक व तेलंगणामध्ये कायद्याच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे त्याप्रमाणे राज्यातदेखील कायदा आणला जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान आदिवासी वसतिगृहांच्या समस्यांबाबतदेखील विविध सदस्यांनी मुद्दे मांडले. राज्यातील अनेक आदिवासी वसतिगृहे ही भाड्याच्या इमारतींमध्ये सुरू आहेत. या वसतिगृहांना शासकीय इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाजपचे सदस्य परिणय फुके यांनी केली. यावर अशा प्रकारचा प्रस्ताव विचाराधीन असून आदिवासी वसतिगृहे शासकीय इमारतींमध्ये आणण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन नितीन राऊत यांनी दिले.पालघर-डहाणूतील ७९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणारमहाविद्यालयांत प्रवेश घेऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला असूनदेखील पालघर व डहाणू तालुक्यातील ७९ आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसल्याची बाब रवींद्र फाटक यांनी सभागृहासमोर आणली. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याची जबाबदारी राज्य शासनाची असून त्यादृष्टीने लगेच पावले उचलली जातील, असे आश्वासन नितीन राऊत यांनी दिले. सद्यस्थितीत राज्यात अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी २८५ व मुलींसाठी २१० अशी एकूण ४९५ वसतिगृहे आहेत. यांची मंजूर क्षमता ५८ हजार ७९५ इतकी असून, त्यापैकी ५३ हजार ३५५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. शिवाय वसतिगृहांत प्रवेश न मिळालेल्या २० हजार विद्यार्थ्यांना ‘स्वयम्’ योजनेचा लाभ मिळू शकतो व या वर्षात ७ हजार ११९ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतVidhan Parishadविधान परिषद