शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कन्हानची पातळी घटली : पूर्व व उत्तर नागपुरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:52 IST

गेल्या एक-दोन महिन्यापासून कन्हान नदीतील पाण्याची पातळी कमी होण्याच्या घटना वारंवार घडत आहे. परिणामी कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्ध पाण्याचे पंपिंग ३० एमएलडी ने कमी झाले आहे. यामुळे गेल्या काही दिवसापासून पूर्व व उत्तर नागपुरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. १ मार्च २०१९ रोजी नेहरूनगर झोन, लकडगंज झोन, सतरंजीपुरा झोन व आशीनगर झोनचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे.

ठळक मुद्देजलशुद्धीकरण केंद्राला अपुरा पुरवठा  

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या एक-दोन महिन्यापासून कन्हान नदीतील पाण्याची पातळी कमी होण्याच्या घटना वारंवार घडत आहे. परिणामी कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्ध पाण्याचे पंपिंग ३० एमएलडी ने कमी झाले आहे. यामुळे गेल्या काही दिवसापासून पूर्व व उत्तर नागपुरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. १ मार्च २०१९ रोजी नेहरूनगर झोन, लकडगंज झोन, सतरंजीपुरा झोन व आशीनगर झोनचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे.साधारणपणे कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज १९० ते १९५ एमएलडी पाण्याचे पंपिंग होते. सध्या येथून १६० एमएलडी पंपिंग होत आहे. १२ फेब्रुवारी नंतर आता २८ फेब्रुवारीला पुन्हा कन्हान इनटेक वेलमधील पाण्याची पातळी खाली गेली आहे. मनपा-ओसीडब्ल्यू यांनी जलसंपदा विभागाकडे पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर नवेगाव-खैरी धरणातून पाणी सोडले आहे.कन्हान नदी उन्हाळ्यात कोरडी पडते. त्यामुळे शुद्धीकरणासाठी लागणारे अधिकचे पाणी धरणाच्या उजव्या कालव्यात सोडण्यात येते. उजव्या कालव्यापासून १९.४ किमी अंतरावर असलेल्या दरवाज्यातून पाणी सोडले जाते. हे पाणी कन्हान नदीत येते. २८ फेब्रुवारी रोजी सोडण्यात आलेले अधिकचे पाणी इनटेक वेलपर्यंत १ मार्च रोजी सायंकाळी पोहोचेल. यानंतर बाधित झालेला पाणीपुरवठा २ मार्च रोजी सकाळी सुरळीत होईल.११ व १२ फेब्रुवारी रोजी कन्हान नदीवरील पंपिंग काही काळासाठी बाधित झाले होते. यामुळे पूर्व व उत्तर नागपुरातील पाणीपुरवठा बाधित झाला होता. तसेच या भागातील काही वस्त्यांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची ओरड आहे. टंचाई विचारात घेता पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

टॅग्स :Kanhan Riverकन्हान नदीwater scarcityपाणी टंचाई