शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

कांबळे दुहेरी खून खटला नागपुरातच चालणार : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:25 IST

कांबळे दुहेरी खून खटला नागपूर सत्र न्यायालयातच चालेल यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. हा खटला दुसऱ्या राज्यात स्थानांतरित करण्यासाठी आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली. न्यायमूर्तीद्वय एस. अब्दुल नझीर व आर. सुभाष रेड्डी यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे आरोपींना जोरदार दणका बसला आहे.

ठळक मुद्दे खटला स्थानांतरणाची याचिका फेटाळली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कांबळे दुहेरी खून खटला नागपूर सत्र न्यायालयातच चालेल यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. हा खटला दुसऱ्या राज्यात स्थानांतरित करण्यासाठी आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली. न्यायमूर्तीद्वय एस. अब्दुल नझीर व आर. सुभाष रेड्डी यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे आरोपींना जोरदार दणका बसला आहे.प्रकरणातील आरोपींमध्ये गणेश शिवभरण शाहू, गुडिया ऊर्फ गुड्डी गणेश शाहू, अंकित शिवभरण शाहू व एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. हा खटला चालवित असलेले अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. काझी हे राजकीय दबावात कार्य करीत असल्याचे आरोपींचे म्हणणे होते. सरकारने हा आरोप फेटाळून लावला. न्या. काझी यांच्यावर कोणताही दबाव नाही. आरोपींना स्वत:च्या संरक्षणासाठी भरपूर वेळ देण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चित केले असून एक साक्षीदारही तपासण्यात आला आहे असे सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपींची याचिका खारीज केली.आरोपींवर उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांचा खून केल्याचा आरोप आहे. ही घटना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती. घटनेच्या दिवशी आरोपी व उषा कांबळे यांच्यामध्ये भिसीच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय राशीचाही निर्घृण खून केला. त्यानंतर दोघांचेही मृतदेह नाल्यात फेकून दिले. आरोपी पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. सर्वोच्च न्यायालयात आरोपींतर्फे अ‍ॅड. गगन सांगी व अ‍ॅड. सिद्धार्थ धर्माधिकारी, सरकारतर्फे अ‍ॅड. निशांत काटनेश्वरकर तर, फिर्यादी रविकांत कांबळे यांच्यातर्फे अ‍ॅड. सचिन पुजारी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMurderखून