शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

कालिदासाच्या शब्दसामर्थ्याचा ‘आषाढातील एक दिवस’

By admin | Updated: June 13, 2014 01:31 IST

संस्कृतचे श्रेष्ठ महाकवी कालिदास यांची प्रत्येक नाट्यकृती म्हणजे एक महाकाव्यच आहे. त्यांच्या अजरामर मेघदूतमवर आधारित मोहन राकेश लिखित हिंदीतील ‘आषाढ का एक दिन’ या नाटकाचा

अनुभूती सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ : नाट्यप्रयोगाचे सादरीकरण नागपूर : संस्कृतचे श्रेष्ठ महाकवी कालिदास यांची प्रत्येक नाट्यकृती म्हणजे एक महाकाव्यच आहे. त्यांच्या अजरामर मेघदूतमवर आधारित मोहन राकेश लिखित हिंदीतील ‘आषाढ का एक दिन’ या नाटकाचा मराठीत ज्योती सुभाष यांनी अनुवाद केला आहे. या ‘आषाढातील एक दिवस’ या तीन अंकी नाटकाचा प्रयोग आज अनुभूती सांस्कृतिक महोत्सवात सादर करण्यात आला. हा कार्यक्रम डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन्स येथे पार पडला. या नाटकानेच अनुभूतीच्या सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला. नाटकघर आणि श्री सिद्धी विनायक, पुणे निर्मित नाटकाचे दिग्दर्शन अतुल पेठे यांनी केले होते. डॉ. हर्षवर्धन मार्डिकर संकल्पित या महोत्सवाला विख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मोहन राकेश लिखित हिंदी नाटकाला १९५९ साली नाटक अकादमीचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार लाभला आहे. मराठीसह जपानी भाषेतही त्याचा अनुवाद करण्यात आला आहे. या नाटकावर आधारीत मणी कौल दिग्दर्शित सिनेमालाही फिल्मफेअरने गौरविण्यात आले आहे. कवी कालिदास आणि त्याची प्रेयसी मल्लिका यांच्या निखळ-निरागस प्रेमकथेवरील नाटक सहज भाषाशैली, ओघवते संवाद, परस्परांच्या कोमल भावनांचे हळुवार चित्रण, विरोधी पात्रांचे कुशल संयोजनासह मराठीतही एक अमिट नाट्यकृती झाली आहे. संवेदनशील मनाचा आणि उत्तुंग प्रतिभेचा कवी कालिदास निसर्गसौंदर्याने नटलेल्या लहान गावातील तरुण. मल्लिका देखणी, निरागस आणि भावनाप्रधान तरुणी. मल्लिका हीच कालिदासाची स्फूर्तीदेवता असते. आषाढातील एका पावसाळी सायंकाळी बेधुंद पावसात दोघेही भिजतात तेवढेच परस्परांच्या रोमांचक सहवासातही भिजतात. मल्लिकाची आई अंबिकाचा या प्रेमाला विरोध असतो. कारण तिच्या व्यवहारी दृष्टिकोनात निर्धन कालिदासाची किंमत नसते. त्यातच कालिदासाला उज्जयनीच्या राजदरबारात राजकवी होण्याची संधी मिळते. कालिदास मल्लिकापासून दूर जायला तयार नसतो. मल्लिका त्याला राजदरबारात जाण्याचा आग्रह धरते. त्यानंतर मात्र हा विरह कधीच संपत नाही. कालिदास ऐश्वर्यसंपन्न आणि कीर्तीमान होतो. गुप्त साम्राज्याच्या राजकुमारीसह त्याचा विवाह होतो. मल्लिका त्याच्या प्रतीक्षेत खंगते. कालिदास तिला भेटायला येतो तेव्हा मल्लिका परिस्थितीशरण गणिका आणि एका बाळाची आई होते. कालिदास निराश मनाने माघारी फिरतो, ती वेळही आषाढातील सांजवेळच. कालिदास मल्लिकाच्या भूमिकेत आलोक राजवाडे व पर्ण पेठे तर अंबिकेच्या भूमिकेत ज्योती सुभाष यांनी जीव ओतला. डॉ. दीपक मांडे, आलोक राजवाडे, ओम भूतकर, ऋचा आपटे, रणजित मोहिते, तुषार गुंजाळ, कृतार्थ शेवगावकर या कलावंतांनी अभिनयाने हे नाटक पेलून धरले. तुषार पंडित यांचे संगीत संयोजन तर दत्तात्रय शिंदे यांचे अचूक नेपथ्य यांचाही उल्लेख करावासा वाटतो. अंजली भांडारकर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सर्व कलावंतांचा सत्कार मध्यंतरात करण्यात आला. (प्रतिनिधी)