शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

कालिदास महोत्सव : आरोग्यज्ञान, श्रवणभानाने अन् पदन्यासाच्या सुरेखतेने गाजली संध्याकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 23:33 IST

रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू असलेल्या कालिदास महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आरोग्य जागृतीचे ज्ञान, सतारीच्या मधूर कंपनाचे श्रवणज्ञान आणि लयपूर्ण पदन्यासाची नृत्यजाणिव रसिकांना करता आली.

ठळक मुद्देशर्वरी जमेनिस यांनी नृत्यातून सादर केले ‘अर्धनारिनटेश्वरस्तोत्र’पंचतत्त्वातून वैद्यांनी सांगितली शरीरसृष्टीचे विज्ञानसमन्वय सरकार यांची सतार अन् पिनाकी चक्रवर्ती यांच्या तबलावादनाची चालली जादू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कालिदास समारोह आयोजन समिती, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू असलेल्या कालिदास महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आरोग्य जागृतीचे ज्ञान, सतारीच्या मधूर कंपनाचे श्रवणज्ञान आणि लयपूर्ण पदन्यासाची नृत्यजाणिव रसिकांना करता आली.

सोमवारी सप्तकतर्फे ‘पंचतत्त्व’ या आयुर्वेद ज्ञान, नृत्य अन् संगीताच्या मेजवानीने महोत्सवाची सुरुवात झाली. रेणुका देशकर यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या या कार्यक्रमाचे संगीत नियोजन शैलेश दाणी, २५ नृत्यांगनांच्या चमूचे नृत्य दिग्दर्शन स्वाती भालेराव यांचे होते तर गीत प्रणव पटवारी यांचे होते. संगीत आणि नृत्य दिग्दर्शन विशेषत: याच कार्यक्रमासाठी तयार करण्यात आले होते. वायू, आप, तेज, आकाश आणि पृथ्वी या पाच तत्त्वांचा सखोल अभ्यास करून अनेक सवयी आपल्या दैनंदिन जीवनात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. या पंचतत्त्वांचे संतुलन, मग ते निसर्गातील असो किंवा मानवी शरीरातील, बिघडल्यास विनाशकारी परिणाम होतात. आज पर्यावरण असंतुलन आणि त्याचे परिणाम हाच धोक्याचा इशारा देत असून, सावध होण्याची हीच खरी वेळ असल्याचा तज्ज्ञांचा सूर या कार्यक्रमात उमटला. या चर्चेत वैद्य मृणाल जामदार, डॉ. संदीप शिरखेडकर व डॉ. योगेश मुरकुटे यांनी सहभाग घेतला आणि त्यांना रेणुका देशकर यांनी बोलते केले. वेदातील ऋचांचा समावेश आणि खास या कार्यक्रमासाठी रचलेले पंचतत्त्व गीत हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. त्यानंतर बंगालचे सुप्रसिद्ध सितारवादक समन्वय सरकार यांच्या सतारवादनाचा कार्यक्रम श्रवणीय ठरला. सतारीची छेडली जाणारी एक एक तार, त्यातून उमटणारे मधूर स्वर आणि त्यातून प्राप्त होणारा चैतन्य अनुपम ठरला. त्यांना तबल्यावर पिनाकी चक्रवर्ती यांनी धमाकेदार संगत केली. 
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात दोघांच्याही जुगलबंदीने रसिक तृप्त झाले. अखेरच्या सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना शर्वरी जमेनिस यांनी आद्य शंकरराचार्य रचित ‘अर्धनारिनटेश्वरस्तोत्र’ नृत्याभिनयातून सादर केला. शरीराची डावी बाजू म्हणजे शक्ती आणि उजवी बाजू म्हणजे शिव. भाव आणि सौंदर्याचा अनुपम जोड सृष्टीशी करणाºया स्तोत्राला सुरेल पदन्यास, नयनकटाक्ष आणि हस्तमुद्रिकेतून त्यांनी सादर केला. त्यांना तबल्यावर त्यांचे पती निखिल फाटक, संवादिनीवर चिन्मय कोल्हटकर, बासरीवर सुनील अवचट यांनी संगत केली. तर पढंत जुई सगदेव यांनी केली. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन श्वेता शेलगावकर व रेणुका देशकर यांनी केले.साऊंड सिस्टीम झाली ब्रेकशर्वरी जमेनिस यांचे नृत्यसादरीकरण होत असताना दरम्यान सभागृहातील ध्वनिव्यवस्था काही काळ खोळंबली होती. त्यामुळे, कार्यक्रमाची लय तुटल्याने प्रेक्षकांसह स्वत: शर्वरी नाराज दिसल्या. नृत्याचा तो बाज टिकवण्यास त्यांना नंतर त्रास झाल्याचे दिसून येत होते.नागपूरकर रसिक उजवे - शर्वरी जमेनिसमी अनेक ठिकाणी नृत्यसादरीकरण करते. पुण्याचे रसिक जास्तच चोखंदळ असतात, असे म्हटले जाते. मात्र, मी नागपुरात जेव्हा जेव्हा आली तेव्हा तेव्हा नागपूरकर रसिक जास्त उजवे वाटल्याची दाद शर्वरी जमेनिस यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Kalidas Festivalकालिदास महोत्सवnagpurनागपूर