शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

नागपुरात सहा ऋतूंवर आधारित कालिदास महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 22:55 IST

महाकवि कालिदास यांच्या ‘ऋतूसंहार’वर आधारित कालिदास महोत्सव १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटनदेबप्रिय अधिकारी, समन्वय सरकार, आस्था गोस्वामी, गुरु शमा भाटे,पं. उदयकुमार मल्लिक, बिंदू जुनेजा प्रमुख आकर्षण

ऑनलाईन लोकमतनागपूर : महाकवि कालिदास यांच्या ‘ऋतूसंहार’वर आधारित कालिदास महोत्सव १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. शास्त्रीय संगीत व वादन प्रेमींसाठी यंदा देबप्रिय अधिकारी, समन्वय सरकार, आस्था गोस्वामी, गुरु शमा भाटे,पं. उदयकुमार मल्लिक, बिंदू जुनेजा हे प्रमुख आकर्षण राहणार आहे.१७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कालिदास महोत्सवाचे उद्घाटन होईल. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख अतिथी राहतील. त्यानंतर नागपूरकर रसिक सहा ‘ऋथउँछए शङआ शआएङळे ’ हा संगीतमय कार्यक्रम सादर करतील. रात्री ८.३० वाजता पूरबाई या कार्यक्रमांंतर्गत कोलकाता येथील देबप्रिय अधिकारी आणि समन्वय सरकार यांच्यातील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत व सतार जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.१८ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वाजता मन वृंदावन या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायन कार्यक्रमांंतर्गंत आस्था गोस्वामी यांना ऐकता येणार आहे. सायंकाळी ७.४५ वाजता पुण्याच्या नादरुप ग्रूपच्या गुरु शमा भाटे आणि त्यांची चमू कथ्थक नृत्यनाटिका सादर करतील. रात्री ९ वाजता नवी दिल्लीच्या पंडित उदयकुमार मल्लिक यांच्या धमारवरील धृपद धमार गायनाचा कार्यक्रम होईल तर शेवटच्या दिवशी सायंकाळी ऋतूचक्र या शास्त्रीय गायन कार्यक्रमांतर्गंत मुंबईच्या पं. रोणू मजुमदार आणि पं.सतीश व्यास यांच्यातील जुगलबंदी ऐकायला मिळेल. त्यानंतर सायंकाळी ७.१५ वाजता वसंतरास या कार्यक्रमांतर्गंत ओडिसी समूह नृत्यामध्ये भोपाळच्या बिंदू जुनेजा आणि त्यांच्या चमूचे नृत्य पाहायला मिळणार आहे. तर रात्री ८.४५ वाजता ऋतूरंग कार्यक्रमांतर्गंत पुण्याचे संजीव अभ्यंकर आणि मुंबईच्या अश्विनी भिडे-देशपांडे यांच्यातील शास्त्रीय गायनातील जुगलबंदी अनुभवता येईल. हा कार्यक्रम नि:शुल्क राहील, अशी माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली.मनपातर्फे ग्रीन बससह विशेष बस सुविधाकालिदास महोत्सवाकरिता नागपूरकर रसिकांसाठी मनपाच्यावतीने वर्धा मार्ग व अमरावती मार्ग येथून दोन विशेष वातानुकूलित ग्रीन बसची तर स्वावलंबीनगर , पारडी, कळमेश्वर, हजारी पहाड, कोराडी, पिपळा फाटा आणि बेसा येथून रेशीमबागपर्यंत विशेष बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.