शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

नागपुरात सहा ऋतूंवर आधारित कालिदास महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 22:55 IST

महाकवि कालिदास यांच्या ‘ऋतूसंहार’वर आधारित कालिदास महोत्सव १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटनदेबप्रिय अधिकारी, समन्वय सरकार, आस्था गोस्वामी, गुरु शमा भाटे,पं. उदयकुमार मल्लिक, बिंदू जुनेजा प्रमुख आकर्षण

ऑनलाईन लोकमतनागपूर : महाकवि कालिदास यांच्या ‘ऋतूसंहार’वर आधारित कालिदास महोत्सव १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. शास्त्रीय संगीत व वादन प्रेमींसाठी यंदा देबप्रिय अधिकारी, समन्वय सरकार, आस्था गोस्वामी, गुरु शमा भाटे,पं. उदयकुमार मल्लिक, बिंदू जुनेजा हे प्रमुख आकर्षण राहणार आहे.१७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कालिदास महोत्सवाचे उद्घाटन होईल. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख अतिथी राहतील. त्यानंतर नागपूरकर रसिक सहा ‘ऋथउँछए शङआ शआएङळे ’ हा संगीतमय कार्यक्रम सादर करतील. रात्री ८.३० वाजता पूरबाई या कार्यक्रमांंतर्गत कोलकाता येथील देबप्रिय अधिकारी आणि समन्वय सरकार यांच्यातील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत व सतार जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.१८ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वाजता मन वृंदावन या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायन कार्यक्रमांंतर्गंत आस्था गोस्वामी यांना ऐकता येणार आहे. सायंकाळी ७.४५ वाजता पुण्याच्या नादरुप ग्रूपच्या गुरु शमा भाटे आणि त्यांची चमू कथ्थक नृत्यनाटिका सादर करतील. रात्री ९ वाजता नवी दिल्लीच्या पंडित उदयकुमार मल्लिक यांच्या धमारवरील धृपद धमार गायनाचा कार्यक्रम होईल तर शेवटच्या दिवशी सायंकाळी ऋतूचक्र या शास्त्रीय गायन कार्यक्रमांतर्गंत मुंबईच्या पं. रोणू मजुमदार आणि पं.सतीश व्यास यांच्यातील जुगलबंदी ऐकायला मिळेल. त्यानंतर सायंकाळी ७.१५ वाजता वसंतरास या कार्यक्रमांतर्गंत ओडिसी समूह नृत्यामध्ये भोपाळच्या बिंदू जुनेजा आणि त्यांच्या चमूचे नृत्य पाहायला मिळणार आहे. तर रात्री ८.४५ वाजता ऋतूरंग कार्यक्रमांतर्गंत पुण्याचे संजीव अभ्यंकर आणि मुंबईच्या अश्विनी भिडे-देशपांडे यांच्यातील शास्त्रीय गायनातील जुगलबंदी अनुभवता येईल. हा कार्यक्रम नि:शुल्क राहील, अशी माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली.मनपातर्फे ग्रीन बससह विशेष बस सुविधाकालिदास महोत्सवाकरिता नागपूरकर रसिकांसाठी मनपाच्यावतीने वर्धा मार्ग व अमरावती मार्ग येथून दोन विशेष वातानुकूलित ग्रीन बसची तर स्वावलंबीनगर , पारडी, कळमेश्वर, हजारी पहाड, कोराडी, पिपळा फाटा आणि बेसा येथून रेशीमबागपर्यंत विशेष बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.