शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

नागपुरात सहा ऋतूंवर आधारित कालिदास महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 22:55 IST

महाकवि कालिदास यांच्या ‘ऋतूसंहार’वर आधारित कालिदास महोत्सव १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटनदेबप्रिय अधिकारी, समन्वय सरकार, आस्था गोस्वामी, गुरु शमा भाटे,पं. उदयकुमार मल्लिक, बिंदू जुनेजा प्रमुख आकर्षण

ऑनलाईन लोकमतनागपूर : महाकवि कालिदास यांच्या ‘ऋतूसंहार’वर आधारित कालिदास महोत्सव १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. शास्त्रीय संगीत व वादन प्रेमींसाठी यंदा देबप्रिय अधिकारी, समन्वय सरकार, आस्था गोस्वामी, गुरु शमा भाटे,पं. उदयकुमार मल्लिक, बिंदू जुनेजा हे प्रमुख आकर्षण राहणार आहे.१७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कालिदास महोत्सवाचे उद्घाटन होईल. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख अतिथी राहतील. त्यानंतर नागपूरकर रसिक सहा ‘ऋथउँछए शङआ शआएङळे ’ हा संगीतमय कार्यक्रम सादर करतील. रात्री ८.३० वाजता पूरबाई या कार्यक्रमांंतर्गत कोलकाता येथील देबप्रिय अधिकारी आणि समन्वय सरकार यांच्यातील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत व सतार जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.१८ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वाजता मन वृंदावन या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायन कार्यक्रमांंतर्गंत आस्था गोस्वामी यांना ऐकता येणार आहे. सायंकाळी ७.४५ वाजता पुण्याच्या नादरुप ग्रूपच्या गुरु शमा भाटे आणि त्यांची चमू कथ्थक नृत्यनाटिका सादर करतील. रात्री ९ वाजता नवी दिल्लीच्या पंडित उदयकुमार मल्लिक यांच्या धमारवरील धृपद धमार गायनाचा कार्यक्रम होईल तर शेवटच्या दिवशी सायंकाळी ऋतूचक्र या शास्त्रीय गायन कार्यक्रमांतर्गंत मुंबईच्या पं. रोणू मजुमदार आणि पं.सतीश व्यास यांच्यातील जुगलबंदी ऐकायला मिळेल. त्यानंतर सायंकाळी ७.१५ वाजता वसंतरास या कार्यक्रमांतर्गंत ओडिसी समूह नृत्यामध्ये भोपाळच्या बिंदू जुनेजा आणि त्यांच्या चमूचे नृत्य पाहायला मिळणार आहे. तर रात्री ८.४५ वाजता ऋतूरंग कार्यक्रमांतर्गंत पुण्याचे संजीव अभ्यंकर आणि मुंबईच्या अश्विनी भिडे-देशपांडे यांच्यातील शास्त्रीय गायनातील जुगलबंदी अनुभवता येईल. हा कार्यक्रम नि:शुल्क राहील, अशी माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली.मनपातर्फे ग्रीन बससह विशेष बस सुविधाकालिदास महोत्सवाकरिता नागपूरकर रसिकांसाठी मनपाच्यावतीने वर्धा मार्ग व अमरावती मार्ग येथून दोन विशेष वातानुकूलित ग्रीन बसची तर स्वावलंबीनगर , पारडी, कळमेश्वर, हजारी पहाड, कोराडी, पिपळा फाटा आणि बेसा येथून रेशीमबागपर्यंत विशेष बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.