शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

आरपीएफची प्रतिमा उंचावण्यात यशस्वी झालो : ज्योती कुमार सतीजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:15 IST

मागील चार वर्षात नागपूर शहरात रेल्वे सुरक्षा दलाचा वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त म्हणून काम करताना अनेक चांगले अनुभव आले. नागपुरातील नागरिक प्रेमळ आहेत. आरपीएफचा प्रमुख म्हणून अनेक चांगली कामे केली. अनेक उपक्रम राबवून आरपीएफची प्रतिमा उंचावण्यात यशस्वी झालो, असे प्रतिपादन ज्योती कुमार सतीजा यांनी केले.

ठळक मुद्देउप महानिरीक्षकपदी लखनौला बदली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील चार वर्षात नागपूर शहरात रेल्वे सुरक्षा दलाचा वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त म्हणून काम करताना अनेक चांगले अनुभव आले. नागपुरातील नागरिक प्रेमळ आहेत. आरपीएफचा प्रमुख म्हणून अनेक चांगली कामे केली. अनेक उपक्रम राबवून आरपीएफची प्रतिमा उंचावण्यात यशस्वी झालो, असे प्रतिपादन ज्योती कुमार सतीजा यांनी केले.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांची पदोन्नतीवर लखनौच्या आरपीएफ ट्रेनिंग अ‍ॅकेडमीच्या उपमहानिरीक्षक पदावर बदली झाली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. सतीजा म्हणाले, मागील चार वर्षात रेल्वेत अनेक चांगली कामे केली. आरपीएफ जवानांचे समुपदेशन करून त्यांचा उत्साह वाढविला. चार वर्षात ३२३१ चांगली कामे केली. घरून पळालेल्या १०७२ मुलांना सुखरुप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. गांजाच्या ५२ केसमध्ये ३५ जणांना अटक करून १.४ कोटीचा गांजा जप्त केला. दारूच्या ८५४ केसेसमध्ये ३११ तस्करांना अटक करून १.१५ कोटी रुपयांची दारु जप्त केली. मोबाईल आणि प्रवाशांचे सामान पळविण्याच्या १७६ प्रकरणात २१२ जणांना अटक करून २५.८४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ९० दलालांचा बंदोबस्त करून १.१३ कोटींच्या तिकीट जप्त केली. सोन्याचांदीचे दागिने विना कागदपत्र नेणाऱ्या ७ जणांकडून ३.११ कोटींचे दागिने जप्त केले. गुटखा तस्करीच्या २४ केसेस पकडल्या. मोबाईल हरविलेल्या २६४ जणांना त्यांचे मोबाईल परत केले. १६ हजार १६० अवैध व्हेंडरविरुद्ध कारवाई करून ३४७ जणांना तुरुंगात पाठविले. रेल्वेस्थानकावरील सर्व अवैध प्रवेशद्वारे बंद केल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागला. वर्धा, आमला आणि घोडाडोंगरी ठाणे तंबाखूमुक्त केल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दपूम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय, सहायक सुरक्षा आयुक्त दीपकसिंग चौहान उपस्थित होते.सामाजिक कामातही आरपीएफ अग्रेसररेल्वे सुरक्षा दलाने मागील चार वर्षात १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्तदानाप्रति जनजागृती केली. आरपीएफच्या ५० जवानांनी अवयवदानाचा संकल्प केला. नो हॉर्न हा उपक्रम शहरात राबविला. मागील चार वर्षांपासून दर शनिवारी १०० कॅन्सरच्या रुग्णांना जेवण देण्यात येत असल्याचे सतीजा यांनी सांगितले.

 

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस