शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आरपीएफची प्रतिमा उंचावण्यात यशस्वी झालो : ज्योती कुमार सतीजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:15 IST

मागील चार वर्षात नागपूर शहरात रेल्वे सुरक्षा दलाचा वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त म्हणून काम करताना अनेक चांगले अनुभव आले. नागपुरातील नागरिक प्रेमळ आहेत. आरपीएफचा प्रमुख म्हणून अनेक चांगली कामे केली. अनेक उपक्रम राबवून आरपीएफची प्रतिमा उंचावण्यात यशस्वी झालो, असे प्रतिपादन ज्योती कुमार सतीजा यांनी केले.

ठळक मुद्देउप महानिरीक्षकपदी लखनौला बदली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील चार वर्षात नागपूर शहरात रेल्वे सुरक्षा दलाचा वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त म्हणून काम करताना अनेक चांगले अनुभव आले. नागपुरातील नागरिक प्रेमळ आहेत. आरपीएफचा प्रमुख म्हणून अनेक चांगली कामे केली. अनेक उपक्रम राबवून आरपीएफची प्रतिमा उंचावण्यात यशस्वी झालो, असे प्रतिपादन ज्योती कुमार सतीजा यांनी केले.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांची पदोन्नतीवर लखनौच्या आरपीएफ ट्रेनिंग अ‍ॅकेडमीच्या उपमहानिरीक्षक पदावर बदली झाली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. सतीजा म्हणाले, मागील चार वर्षात रेल्वेत अनेक चांगली कामे केली. आरपीएफ जवानांचे समुपदेशन करून त्यांचा उत्साह वाढविला. चार वर्षात ३२३१ चांगली कामे केली. घरून पळालेल्या १०७२ मुलांना सुखरुप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. गांजाच्या ५२ केसमध्ये ३५ जणांना अटक करून १.४ कोटीचा गांजा जप्त केला. दारूच्या ८५४ केसेसमध्ये ३११ तस्करांना अटक करून १.१५ कोटी रुपयांची दारु जप्त केली. मोबाईल आणि प्रवाशांचे सामान पळविण्याच्या १७६ प्रकरणात २१२ जणांना अटक करून २५.८४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ९० दलालांचा बंदोबस्त करून १.१३ कोटींच्या तिकीट जप्त केली. सोन्याचांदीचे दागिने विना कागदपत्र नेणाऱ्या ७ जणांकडून ३.११ कोटींचे दागिने जप्त केले. गुटखा तस्करीच्या २४ केसेस पकडल्या. मोबाईल हरविलेल्या २६४ जणांना त्यांचे मोबाईल परत केले. १६ हजार १६० अवैध व्हेंडरविरुद्ध कारवाई करून ३४७ जणांना तुरुंगात पाठविले. रेल्वेस्थानकावरील सर्व अवैध प्रवेशद्वारे बंद केल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागला. वर्धा, आमला आणि घोडाडोंगरी ठाणे तंबाखूमुक्त केल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दपूम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय, सहायक सुरक्षा आयुक्त दीपकसिंग चौहान उपस्थित होते.सामाजिक कामातही आरपीएफ अग्रेसररेल्वे सुरक्षा दलाने मागील चार वर्षात १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्तदानाप्रति जनजागृती केली. आरपीएफच्या ५० जवानांनी अवयवदानाचा संकल्प केला. नो हॉर्न हा उपक्रम शहरात राबविला. मागील चार वर्षांपासून दर शनिवारी १०० कॅन्सरच्या रुग्णांना जेवण देण्यात येत असल्याचे सतीजा यांनी सांगितले.

 

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस