शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'उघड्यावरील शौच संपले तसे शिक्षणातून महिलांचे ड्रॉप आऊटही संपेल!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2023 21:54 IST

Nagpur News येत्या दहा वर्षात स्त्रियांच्या शिक्षण ड्रॉप आऊटपासून मुक्ती मिळेल असा विश्वास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देप्रांजली जयस्वाल यांना ‘रमाबाई रानडे स्मृती शिक्षण - प्रबोधन पुरस्कार’ प्रदान

नागपूर : आपण परिवर्तनाच्या अशा टर्निंग पॉइंटवर उभे आहोत, जेथून सभ्यता पुनरूज्जीवनाच्या आशेची किरणे दिसू लागली आहेत. २०१४ मध्ये लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर शौचालय’चा नारा दिला आणि महिलांना उघड्यावरील शौचालयाकडे जाण्यापासून मुक्ती मिळाली. अशीच मुक्ती शिक्षणाच्या क्षेत्रात ड्रॉप आऊटपासून (अर्ध्यात शिक्षण सोडून देणे) येत्या दहा वर्षात मिळेल आणि नव्या राष्ट्रीय शिक्षण नितीची त्यात मोलाची भूमिका राहील, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

सोमवारी सेवा सदन शिक्षण संस्थेच्या ९६व्या वर्धापनदिनानिमित्त अकोला जिल्ह्यातील एन्करेज एज्युकेशनल फाउंडेशनच्या प्रांजली जयस्वाल यांना ‘रमाबाई रानडे स्मृती शिक्षण - प्रबोधन पुरस्कार’ प्रदान करताना ते बोलत होते. शिक्षण संस्थेच्या पटांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रा. स्व. संघाच्या अ. भा. कार्यकारिणीचे सदस्य अनिरूद्ध देशपांडे, भारतीय संगणक विज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध लेखक यशवंत कानेटकर, माजी आमदार नागो गाणार, संस्थेच्या अध्यक्ष कांचन गडकरी, सचिव वासंती भागवत उपस्थित होते.

भारतीयत्त्वाच्या दिशेने राबविण्यात येणारी राष्ट्रीय शिक्षण नीती आता आली असली तरी भारतीय विद्या भारती, रामकृष्ण मिशनसारख्या संघटनांनी गेल्या ७० वर्षांत त्याच दिशेने कार्य केले. याच कार्याच्या प्रेरणेने ही नीती कार्यरत राहणार आहे. या नीतीमध्ये संस्काराला महत्त्व असून, चुकीच्या पद्धतीने शिक्षण दिले गेले तर ‘साक्षर’च्या उलट ‘राक्षस’ घडणार ही जाणीव यात आहे. भारताला संपविण्यासाठी आलेले स्वत: समाप्त झाले आणि आताही जे अशी स्वप्न बघत आहेत, तेही स्वत:च संपणार आहेत. भारत एव्हरेस्टप्रमाणे निधडी छाती दाखवत उभा राहणार असल्याची भावना भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन अमर कुळकर्णी यांनी केले. प्रास्ताविक कांचन गडकरी यांनी केले, तर मानपत्राचे वाचन वासंती भागवत यांनी केले. एकल गीत बाळकृष्ण गड्डमवार यांनी गायले.

शिक्षणात आता स्वदेश - अनिरूद्ध देशपांडे

- आजही साडेतीन कोटी मुले शिक्षणापासून वंचित आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून ही उणीव भरून काढली जाणार आहे. शिक्षणात आता स्वदेश असणार आहे. आता आर्य चाणक्य, महात्मा गांधी, विवेकानंद हे शिकविले जाणार आहेत. सर्वांना शिक्षण, सर्वांना संधी या घोषवाक्याद्वारे शिक्षणातील हे परिवर्तन साधले जाणार असल्याचे अनिरूद्ध देशपांडे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी बोलताना यशवंत कानेटकर यांनी भाषा कोणतीही असो, मांडण्यात येणारा मुद्दा प्रखर असेल तर तो महत्त्वाचा असल्याची भावना व्यक्त केली.

.....................

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी