शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

'उघड्यावरील शौच संपले तसे शिक्षणातून महिलांचे ड्रॉप आऊटही संपेल!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2023 21:54 IST

Nagpur News येत्या दहा वर्षात स्त्रियांच्या शिक्षण ड्रॉप आऊटपासून मुक्ती मिळेल असा विश्वास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देप्रांजली जयस्वाल यांना ‘रमाबाई रानडे स्मृती शिक्षण - प्रबोधन पुरस्कार’ प्रदान

नागपूर : आपण परिवर्तनाच्या अशा टर्निंग पॉइंटवर उभे आहोत, जेथून सभ्यता पुनरूज्जीवनाच्या आशेची किरणे दिसू लागली आहेत. २०१४ मध्ये लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर शौचालय’चा नारा दिला आणि महिलांना उघड्यावरील शौचालयाकडे जाण्यापासून मुक्ती मिळाली. अशीच मुक्ती शिक्षणाच्या क्षेत्रात ड्रॉप आऊटपासून (अर्ध्यात शिक्षण सोडून देणे) येत्या दहा वर्षात मिळेल आणि नव्या राष्ट्रीय शिक्षण नितीची त्यात मोलाची भूमिका राहील, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

सोमवारी सेवा सदन शिक्षण संस्थेच्या ९६व्या वर्धापनदिनानिमित्त अकोला जिल्ह्यातील एन्करेज एज्युकेशनल फाउंडेशनच्या प्रांजली जयस्वाल यांना ‘रमाबाई रानडे स्मृती शिक्षण - प्रबोधन पुरस्कार’ प्रदान करताना ते बोलत होते. शिक्षण संस्थेच्या पटांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रा. स्व. संघाच्या अ. भा. कार्यकारिणीचे सदस्य अनिरूद्ध देशपांडे, भारतीय संगणक विज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध लेखक यशवंत कानेटकर, माजी आमदार नागो गाणार, संस्थेच्या अध्यक्ष कांचन गडकरी, सचिव वासंती भागवत उपस्थित होते.

भारतीयत्त्वाच्या दिशेने राबविण्यात येणारी राष्ट्रीय शिक्षण नीती आता आली असली तरी भारतीय विद्या भारती, रामकृष्ण मिशनसारख्या संघटनांनी गेल्या ७० वर्षांत त्याच दिशेने कार्य केले. याच कार्याच्या प्रेरणेने ही नीती कार्यरत राहणार आहे. या नीतीमध्ये संस्काराला महत्त्व असून, चुकीच्या पद्धतीने शिक्षण दिले गेले तर ‘साक्षर’च्या उलट ‘राक्षस’ घडणार ही जाणीव यात आहे. भारताला संपविण्यासाठी आलेले स्वत: समाप्त झाले आणि आताही जे अशी स्वप्न बघत आहेत, तेही स्वत:च संपणार आहेत. भारत एव्हरेस्टप्रमाणे निधडी छाती दाखवत उभा राहणार असल्याची भावना भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन अमर कुळकर्णी यांनी केले. प्रास्ताविक कांचन गडकरी यांनी केले, तर मानपत्राचे वाचन वासंती भागवत यांनी केले. एकल गीत बाळकृष्ण गड्डमवार यांनी गायले.

शिक्षणात आता स्वदेश - अनिरूद्ध देशपांडे

- आजही साडेतीन कोटी मुले शिक्षणापासून वंचित आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून ही उणीव भरून काढली जाणार आहे. शिक्षणात आता स्वदेश असणार आहे. आता आर्य चाणक्य, महात्मा गांधी, विवेकानंद हे शिकविले जाणार आहेत. सर्वांना शिक्षण, सर्वांना संधी या घोषवाक्याद्वारे शिक्षणातील हे परिवर्तन साधले जाणार असल्याचे अनिरूद्ध देशपांडे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी बोलताना यशवंत कानेटकर यांनी भाषा कोणतीही असो, मांडण्यात येणारा मुद्दा प्रखर असेल तर तो महत्त्वाचा असल्याची भावना व्यक्त केली.

.....................

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी