शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

जरा हटके! वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेतलेला ‘ट्री मॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 11:46 IST

वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेत प्रामाणिकतेने वृक्षांची सेवा करतानाच इतरांनाही वृक्ष लागवडीसाठी प्रेरित करणारे राजिंदरसिंह खऱ्या अर्थाने ‘ट्री मॅन’ ठरले आहेत.

ठळक मुद्देराजिंदरसिंह यांनी लावले ६४१ वृक्षपरिचितांना भेट दिली शेकडो रोपटी

निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपले भविष्य सुरक्षित आणि पुढच्या पिढीपर्यंत स्वच्छ पर्यावरण आणि शुद्ध हवा उपलब्ध ठेवायची असेल तर आजपासून वृक्षसंवर्धनाशिवाय तरणोपाय नाही. ही जाणीव बाळगून काही लोक प्रामाणिकपणे वृक्षसंवर्धनासाठी झटत असतात. वृक्षांप्रति अतोनात प्रेम आणि श्रद्धा असलेले राजिंदरसिंह प्लाया हे सुद्धा असेच व्यक्तिमत्त्व होय. वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेत प्रामाणिकतेने वृक्षांची सेवा करतानाच इतरांनाही वृक्ष लागवडीसाठी प्रेरित करणारे राजिंदरसिंह खऱ्या अर्थाने ‘ट्री मॅन’ ठरले आहेत.मिसाळ ले-आऊट, जरीपटका येथील राजिंदरसिंह हे सामान्य व्यक्तिमत्त्व. गुरुनानक फार्मसी महाविद्यालयाच्या वाचनालयात ते कार्यरत आहेत. मात्र वृक्षसंवर्धनासाठी त्यांचा सेवाभाव असामान्य आहे. अचानक हा भाव जागृत होण्यासाठी कारणही तसे आहे. त्यांच्यानुसार पूर्वी कोराडी मार्गाने जाताना रस्त्याच्या कडेला दिसणारी वृक्षवल्ली आनंददायी वाटायची. मात्र एकदा पत्नीसोबत त्या मार्गाने जाताना हे वृक्ष कटले होते. त्या रस्त्यावर मोठे उड्डाण पूल तयार होत होते. हे पाहताना दु:ख झाले आणि त्याच वेळी वृक्षांच्या संवर्धनाचा निर्धारही केला. घरापासूनच याची सुरुवात केली. आंबा, चिकू अशी फळझाड आणि फुलझाडांची लागवड करून अंगण हिरवेगार केले. मग कॉलेजमध्ये अनेक वृक्षांची लागवड केली. मग ज्या रस्त्याने जायचे त्या रस्त्यावर राजिंदरसिंह यांनी वृक्ष लागवड सुरू केली. नातेवाईक, वस्तीतील लोक, परिचित अशा मिळेल त्यांच्या घरी, मिळेल त्या जागी वेगवेगळ्या प्रजातींचे रोपटे लावणे सुरू केले. लोक संवर्धन करावे म्हणून जास्तीत जास्त फळझाडांची लागवड केली. रस्त्यावर निव्वळ लागवड केली नाही तर त्या वृक्षांचे दररोज पाणी टाकून संवर्धनही केले. विविध शाळा, लोकांचे घर, मंदिरे अशा सर्व ठिकाणी त्यांनी लागवड केली. अशाप्रकारे दोन अडीच वर्षात त्यांनी ६४१ वृक्षांची लागवड आणि संवर्धन चालविले आहे. यात त्यांच्या कुटुंबाचीही त्यांना साथ मिळाली.हा सिलसिला सुरू असताना लोकांना भेट म्हणून रोपटे देण्याची कल्पना त्यांना रुचली. मग काय, कुणाचा वाढदिवस, कुणाचे लग्न, रिसेप्शन, सत्कार असा कुठलाही कार्यक्रम असला की राजिंदरसिंह यांच्याकडून वृक्षभेट गेलीच पाहिजे, हा नित्यक्रम. लोक फुलांचे बुके फेकतात पण रोपटे सांभाळून ठेवतात याचे त्यांना समाधान आहे. अशाप्रकारे अनेकांना शेकडो रोपटे त्यांनी भेट दिले.सार्वजनिक ठिकाणच्या झाडांना कठडे लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. कधी नगरसेवकांना मागून तर अनेकदा स्वत:च्या खर्चाने आणून त्यांनी ते वृक्षांभोवती लावले आहेत. आतातर उन्हापासून संरक्षणासाठी हिरवी ताडपत्री लावण्याचे कामही त्यांनी सुरू केले आहे. अशाप्रकारे राजिंदरसिंह वृक्ष जगविणारे, वाढविणारे व इतरांना प्रोत्साहित करणारे ट्री मॅन झाले आहेत.

वर्षभरापूर्वी घराजवळ लावलेल्या फळझाडांना आंबे, चिकू आणि पेरू लागले आहेत. आपण लावलेल्या झाडांना फळ आल्याचे दृश्य पाहून खरेच समाधान वाटते. समाजाने माझ्यावर उपकार केले आहेत, आपणही काही करणे हे कर्तव्य आहे आणि वृक्षसंवर्धनासारखी दुसरी परतफेड ठरू शकत नाही.- राजिंदरसिंह प्लाया, वृक्षप्रेमी

टॅग्स :Jara hatkeजरा हटके