शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जरा हटके! वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेतलेला ‘ट्री मॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 11:46 IST

वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेत प्रामाणिकतेने वृक्षांची सेवा करतानाच इतरांनाही वृक्ष लागवडीसाठी प्रेरित करणारे राजिंदरसिंह खऱ्या अर्थाने ‘ट्री मॅन’ ठरले आहेत.

ठळक मुद्देराजिंदरसिंह यांनी लावले ६४१ वृक्षपरिचितांना भेट दिली शेकडो रोपटी

निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपले भविष्य सुरक्षित आणि पुढच्या पिढीपर्यंत स्वच्छ पर्यावरण आणि शुद्ध हवा उपलब्ध ठेवायची असेल तर आजपासून वृक्षसंवर्धनाशिवाय तरणोपाय नाही. ही जाणीव बाळगून काही लोक प्रामाणिकपणे वृक्षसंवर्धनासाठी झटत असतात. वृक्षांप्रति अतोनात प्रेम आणि श्रद्धा असलेले राजिंदरसिंह प्लाया हे सुद्धा असेच व्यक्तिमत्त्व होय. वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेत प्रामाणिकतेने वृक्षांची सेवा करतानाच इतरांनाही वृक्ष लागवडीसाठी प्रेरित करणारे राजिंदरसिंह खऱ्या अर्थाने ‘ट्री मॅन’ ठरले आहेत.मिसाळ ले-आऊट, जरीपटका येथील राजिंदरसिंह हे सामान्य व्यक्तिमत्त्व. गुरुनानक फार्मसी महाविद्यालयाच्या वाचनालयात ते कार्यरत आहेत. मात्र वृक्षसंवर्धनासाठी त्यांचा सेवाभाव असामान्य आहे. अचानक हा भाव जागृत होण्यासाठी कारणही तसे आहे. त्यांच्यानुसार पूर्वी कोराडी मार्गाने जाताना रस्त्याच्या कडेला दिसणारी वृक्षवल्ली आनंददायी वाटायची. मात्र एकदा पत्नीसोबत त्या मार्गाने जाताना हे वृक्ष कटले होते. त्या रस्त्यावर मोठे उड्डाण पूल तयार होत होते. हे पाहताना दु:ख झाले आणि त्याच वेळी वृक्षांच्या संवर्धनाचा निर्धारही केला. घरापासूनच याची सुरुवात केली. आंबा, चिकू अशी फळझाड आणि फुलझाडांची लागवड करून अंगण हिरवेगार केले. मग कॉलेजमध्ये अनेक वृक्षांची लागवड केली. मग ज्या रस्त्याने जायचे त्या रस्त्यावर राजिंदरसिंह यांनी वृक्ष लागवड सुरू केली. नातेवाईक, वस्तीतील लोक, परिचित अशा मिळेल त्यांच्या घरी, मिळेल त्या जागी वेगवेगळ्या प्रजातींचे रोपटे लावणे सुरू केले. लोक संवर्धन करावे म्हणून जास्तीत जास्त फळझाडांची लागवड केली. रस्त्यावर निव्वळ लागवड केली नाही तर त्या वृक्षांचे दररोज पाणी टाकून संवर्धनही केले. विविध शाळा, लोकांचे घर, मंदिरे अशा सर्व ठिकाणी त्यांनी लागवड केली. अशाप्रकारे दोन अडीच वर्षात त्यांनी ६४१ वृक्षांची लागवड आणि संवर्धन चालविले आहे. यात त्यांच्या कुटुंबाचीही त्यांना साथ मिळाली.हा सिलसिला सुरू असताना लोकांना भेट म्हणून रोपटे देण्याची कल्पना त्यांना रुचली. मग काय, कुणाचा वाढदिवस, कुणाचे लग्न, रिसेप्शन, सत्कार असा कुठलाही कार्यक्रम असला की राजिंदरसिंह यांच्याकडून वृक्षभेट गेलीच पाहिजे, हा नित्यक्रम. लोक फुलांचे बुके फेकतात पण रोपटे सांभाळून ठेवतात याचे त्यांना समाधान आहे. अशाप्रकारे अनेकांना शेकडो रोपटे त्यांनी भेट दिले.सार्वजनिक ठिकाणच्या झाडांना कठडे लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. कधी नगरसेवकांना मागून तर अनेकदा स्वत:च्या खर्चाने आणून त्यांनी ते वृक्षांभोवती लावले आहेत. आतातर उन्हापासून संरक्षणासाठी हिरवी ताडपत्री लावण्याचे कामही त्यांनी सुरू केले आहे. अशाप्रकारे राजिंदरसिंह वृक्ष जगविणारे, वाढविणारे व इतरांना प्रोत्साहित करणारे ट्री मॅन झाले आहेत.

वर्षभरापूर्वी घराजवळ लावलेल्या फळझाडांना आंबे, चिकू आणि पेरू लागले आहेत. आपण लावलेल्या झाडांना फळ आल्याचे दृश्य पाहून खरेच समाधान वाटते. समाजाने माझ्यावर उपकार केले आहेत, आपणही काही करणे हे कर्तव्य आहे आणि वृक्षसंवर्धनासारखी दुसरी परतफेड ठरू शकत नाही.- राजिंदरसिंह प्लाया, वृक्षप्रेमी

टॅग्स :Jara hatkeजरा हटके