शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

जरा हटके! बारचा ‘वेटर’ बनला इंजिनियर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 11:17 IST

एखाद्या कथानकाला शोभावी, अशी ही कहाणी आहे. नवनीत गोपीचंद मोटघरे ऊर्फ बिट्टू असे या मुलाचे नाव. भंडारा जिल्ह्याचा रहिवासी असलेला नवनीत दहावीत असताना मोबाईल हरविला म्हणून घरातून पळून नागपुरात आला.

ठळक मुद्देप्लॅटफॉर्म शाळेने दिला आधारश्रीकांत आगलावे यांनी दिले पंखांना बळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयुष्याच्या वळणावर पाऊल चुकते. मात्र वेळीच ते सावरणारा देवदूत भेटला तर आयुष्याचे सोने कसे होते, याची प्रचिती सध्या भंडाऱ्यातील नवनीत नावाच्या युवकाला येत आहे. एकेकाळी घरातून बालवयात पळालेल्या या युवकाने बारमध्ये वेटरचे काम केले. मात्र श्रीकांत आगलावेसारख्या सहृदयी माणसाला दया आली. नागपुरातील प्लॅटफॉर्म शाळेची वाट दाखविली. आयुष्याला दिशा दिली. आज नवनीत हैदराबादमध्ये टाटा कनेक्ट या कंपनीत कॉम्प्युटर इंजिनियर बनला आहे.एखाद्या कथानकाला शोभावी, अशी ही कहाणी आहे. नवनीत गोपीचंद मोटघरे ऊर्फ बिट्टू असे या मुलाचे नाव. भंडारा जिल्ह्याचा रहिवासी असलेला नवनीत दहावीत असताना मोबाईल हरविला म्हणून घरातून पळून नागपुरात आला. पोटाची भूक असह्य झाल्याने एका बारमध्ये वेटर म्हणून कामाला लागला. एका सद्गृहस्थाला त्याची दया आली. त्याने बिट्टूचे मनपरिवर्तन केले. घरापासून भटकलेल्या मुलांसाठी त्या काळी लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने प्लॅटफॉर्म स्कूल नावाने शाळा सुरू करण्यात आली होती. या शाळेचे संचालन श्रीकांत आगलावे करीत होते. त्यांना नवनीतची परिस्थिती सांगितली. दुसºया दिवसापासून नवनीत बीअरबारमधील वेटरची नोकरी सोडून प्लॅटफॉर्म शाळेत दाखल झाला. येथूनच त्याच्या आयुष्याला दिशा मिळाली. त्याने पुढे शिकण्याचा मानस श्रीकांत आगलावे यांच्याकडे बोलून दाखविला. इंजिनियर बनण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. त्याच्या स्वप्नांना श्रीकांत आगलावे यांनी बळ दिले. त्याला पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश मिळवून दिला. पण तो अपयशी ठरला. पण हार न मानता त्याने विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण केली. या गुणांच्या आधारावर आगलावे यांनी त्याला नवनीतसिंग तुली यांच्या मदतीने गुरुनानक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. प्लॅटफॉर्म शाळेत त्याला शिक्षणात काहीच कमी पडू दिले नाही. मात्र २०१६ मध्ये प्लॅटफॉर्म शाळाच बंद पडली. पुन्हा आयुष्याला संघर्षाची झळ बसली. मात्र श्रीकांत आगलावे वडिलांसारखे पाठीशी भक्कमपणे आधाराला होते. नवनीतला भारतीय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून निवास मिळवून दिला. आमदार प्रा. अनिल सोले, जयप्रकाश गुप्ता यांच्या माध्यमातून वेळोवेळी मदत मिळवून दिली. वीर बजरंग सेवा संस्थानच्या माध्यमातून शिक्षणासाठी आर्थिक सोईसवलती उपलब्ध करून दिल्या. अखेर नवनीत इंजिनियर झाला. निकालाच्या दिवशी पहिला पेढा त्याने श्रीकांत आगलावे यांच्या मुखात भरविला. अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. एवढेच नाही तर हैदराबादमध्ये नोकरीही मिळाली. भरकटलेल्या पाखराला मोकळ्या आभाळात मार्ग गवसला. श्रीकांत आगलावे यांनी त्याच्या पंखात बळ भरले. अन् पापण्याआड पाहिलेले एक गोड स्वप्न मूर्तरुपात आले.

श्रीकांत आगलावे भेटले नसते तर...नवनीतच्या यशाबद्दल विचारले असता, तो म्हणाला की श्रीकांत आगलावे मिळाले नसते तर मी आज काय झालो असतो आणि कुठे खितपत पडलो असतो, हे सांगता येत नाही. त्यांच्यामुळे आज मी घडलोय. माझ्या हातूनही माझ्यासारखेच बिट्टू घडावे, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.

प्लॅटफॉर्म अजूनही काम करतोयआज प्लॅटफॉर्म शाळा नाही, मात्र प्लॅटफॉर्म थांबला नाही. शाळा बंद झाली म्हणून काम संपले नाही. शाळा असती तर अनेक बिट्टू घडले असते, ते आता कसे घडतील याची खंत आहे.- श्रीकांत आगलावे, सदस्य,वीर बजरंगी सेवा संस्था

टॅग्स :Jara hatkeजरा हटके