शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जरा हटके! बारचा ‘वेटर’ बनला इंजिनियर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 11:17 IST

एखाद्या कथानकाला शोभावी, अशी ही कहाणी आहे. नवनीत गोपीचंद मोटघरे ऊर्फ बिट्टू असे या मुलाचे नाव. भंडारा जिल्ह्याचा रहिवासी असलेला नवनीत दहावीत असताना मोबाईल हरविला म्हणून घरातून पळून नागपुरात आला.

ठळक मुद्देप्लॅटफॉर्म शाळेने दिला आधारश्रीकांत आगलावे यांनी दिले पंखांना बळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयुष्याच्या वळणावर पाऊल चुकते. मात्र वेळीच ते सावरणारा देवदूत भेटला तर आयुष्याचे सोने कसे होते, याची प्रचिती सध्या भंडाऱ्यातील नवनीत नावाच्या युवकाला येत आहे. एकेकाळी घरातून बालवयात पळालेल्या या युवकाने बारमध्ये वेटरचे काम केले. मात्र श्रीकांत आगलावेसारख्या सहृदयी माणसाला दया आली. नागपुरातील प्लॅटफॉर्म शाळेची वाट दाखविली. आयुष्याला दिशा दिली. आज नवनीत हैदराबादमध्ये टाटा कनेक्ट या कंपनीत कॉम्प्युटर इंजिनियर बनला आहे.एखाद्या कथानकाला शोभावी, अशी ही कहाणी आहे. नवनीत गोपीचंद मोटघरे ऊर्फ बिट्टू असे या मुलाचे नाव. भंडारा जिल्ह्याचा रहिवासी असलेला नवनीत दहावीत असताना मोबाईल हरविला म्हणून घरातून पळून नागपुरात आला. पोटाची भूक असह्य झाल्याने एका बारमध्ये वेटर म्हणून कामाला लागला. एका सद्गृहस्थाला त्याची दया आली. त्याने बिट्टूचे मनपरिवर्तन केले. घरापासून भटकलेल्या मुलांसाठी त्या काळी लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने प्लॅटफॉर्म स्कूल नावाने शाळा सुरू करण्यात आली होती. या शाळेचे संचालन श्रीकांत आगलावे करीत होते. त्यांना नवनीतची परिस्थिती सांगितली. दुसºया दिवसापासून नवनीत बीअरबारमधील वेटरची नोकरी सोडून प्लॅटफॉर्म शाळेत दाखल झाला. येथूनच त्याच्या आयुष्याला दिशा मिळाली. त्याने पुढे शिकण्याचा मानस श्रीकांत आगलावे यांच्याकडे बोलून दाखविला. इंजिनियर बनण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. त्याच्या स्वप्नांना श्रीकांत आगलावे यांनी बळ दिले. त्याला पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश मिळवून दिला. पण तो अपयशी ठरला. पण हार न मानता त्याने विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण केली. या गुणांच्या आधारावर आगलावे यांनी त्याला नवनीतसिंग तुली यांच्या मदतीने गुरुनानक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. प्लॅटफॉर्म शाळेत त्याला शिक्षणात काहीच कमी पडू दिले नाही. मात्र २०१६ मध्ये प्लॅटफॉर्म शाळाच बंद पडली. पुन्हा आयुष्याला संघर्षाची झळ बसली. मात्र श्रीकांत आगलावे वडिलांसारखे पाठीशी भक्कमपणे आधाराला होते. नवनीतला भारतीय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून निवास मिळवून दिला. आमदार प्रा. अनिल सोले, जयप्रकाश गुप्ता यांच्या माध्यमातून वेळोवेळी मदत मिळवून दिली. वीर बजरंग सेवा संस्थानच्या माध्यमातून शिक्षणासाठी आर्थिक सोईसवलती उपलब्ध करून दिल्या. अखेर नवनीत इंजिनियर झाला. निकालाच्या दिवशी पहिला पेढा त्याने श्रीकांत आगलावे यांच्या मुखात भरविला. अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. एवढेच नाही तर हैदराबादमध्ये नोकरीही मिळाली. भरकटलेल्या पाखराला मोकळ्या आभाळात मार्ग गवसला. श्रीकांत आगलावे यांनी त्याच्या पंखात बळ भरले. अन् पापण्याआड पाहिलेले एक गोड स्वप्न मूर्तरुपात आले.

श्रीकांत आगलावे भेटले नसते तर...नवनीतच्या यशाबद्दल विचारले असता, तो म्हणाला की श्रीकांत आगलावे मिळाले नसते तर मी आज काय झालो असतो आणि कुठे खितपत पडलो असतो, हे सांगता येत नाही. त्यांच्यामुळे आज मी घडलोय. माझ्या हातूनही माझ्यासारखेच बिट्टू घडावे, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.

प्लॅटफॉर्म अजूनही काम करतोयआज प्लॅटफॉर्म शाळा नाही, मात्र प्लॅटफॉर्म थांबला नाही. शाळा बंद झाली म्हणून काम संपले नाही. शाळा असती तर अनेक बिट्टू घडले असते, ते आता कसे घडतील याची खंत आहे.- श्रीकांत आगलावे, सदस्य,वीर बजरंगी सेवा संस्था

टॅग्स :Jara hatkeजरा हटके