शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

तिळे जन्मणाऱ्या महिलेच्या पाठीशी ‘जंगोराइतड्’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:35 IST

बाळाचा जन्म हा प्रत्येकच घरच्यांसाठी आनंदाचा क्षण असतो. जुळे झाले तर आनंद द्विगुणित होतो, मात्र तिळे होणार म्हटल्यावर जास्त आनंद होतो असे नाही. सुखरुप जन्माला आलेही तरी आर्थिक विवंचनेत असणाऱ्या गरीब कुटुंबासाठी तीन मुलांचा सांभाळ मोठी समस्या ठरतो. ‘ती’च्या व कुटुंबासमोरही हे संकट उभे ठाकले होते. मात्र या संकटसमयी जंगोराइतड आदिवासी विकास संस्थेने तिला आधार दिला. संस्थेने तिच्या बाळंतपणाचा खर्च उचलला आणि वर्षभर त्या बाळांची जबाबदारीही स्वीकारली.

ठळक मुद्देवर्षभर माता व बाळांचा करणार सांभाळ : गरीब महिलांना मिळतोय आधार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाळाचा जन्म हा प्रत्येकच घरच्यांसाठी आनंदाचा क्षण असतो. जुळे झाले तर आनंद द्विगुणित होतो, मात्र तिळे होणार म्हटल्यावर जास्त आनंद होतो असे नाही. सुखरुप जन्माला आलेही तरी आर्थिक विवंचनेत असणाऱ्या गरीब कुटुंबासाठी तीन मुलांचा सांभाळ मोठी समस्या ठरतो. ‘ती’च्या व कुटुंबासमोरही हे संकट उभे ठाकले होते. मात्र या संकटसमयी जंगोराइतड आदिवासी विकास संस्थेने तिला आधार दिला. संस्थेने तिच्या बाळंतपणाचा खर्च उचलला आणि वर्षभर त्या बाळांची जबाबदारीही स्वीकारली.या महिलेचे नाव नेहा आत्राम असे आहे. पांढराबोडी येथे राहणाऱ्या नेहाने ५ एप्रिलला दोन मुली व मुलाला जन्म दिला. एरवी अशावेळी मुले अ‍ॅबनॉर्मल जन्मण्याचा धोका अधिक असतो. मात्र तिन्ही गुटगुटीत मुलांना जन्म देणारी नेहा याबाबतीत सुदैवी ठरली. काही महिन्यापूर्वी मात्र नेहा व तिच्या कुटुंबासमोर चिंतेचे ढग जमा झाले होते. त्यावेळी नेहा धरमपेठच्या डॉ. स्मिता चतुर्वेदी यांच्याकडे ट्रीटमेंट घेत होती. आपल्या पोटात तीन मुले वाढताहेत हे जेव्हा तिच्या लक्षात आले, तेव्हा ती हादरलीच होती. एकतर तिला आणि बाळांना धोका होण्याची शक्यता भीतीचे कारण होते. नेहाचे पती एका कंपनीत कामाला जातात. आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने तीन मुलांचा सांभाळ कसा करावा, हा प्रश्न तिच्या व कुटुंबाच्या समोर उभा ठाकला. जीवाचा धोका व गरिबीची चिंता यामुळे दोन मुलांना पोटातच नष्ट करावे का, हा विचारही तिच्या मनात घोळत होता. विज्ञानाच्या प्रगतीमुळे हे शक्यही झाले असते कदाचित.डॉ. स्मिता यांनी गरीब गरोदर महिलांसाठी काम करणाºया जंगोराइतड् आदिवासी विकास संस्थेचे अध्यक्ष प्रबोध वेखंडे यांना सांगितले. वेखंडे व संस्थेच्या इतर सहकाºयांनी नेहा व तिच्या कुटुंबाचे समुपदेशन करून दोन्ही पर्यायासाठी हवी ती मदत करण्याचा विश्वास दिला. संस्थेचा आधार मिळाल्याने नेहानेही तिळ्यांना जन्म देण्याचा निर्णय ठामपणे घेतला. तेव्हापासून ते बाळंतपण होईपर्यंत सर्व खर्च जंगोराइतड् संस्थेने केला आहे. यापुढे वर्षभर माता व तिन्ही बाळांचा औषधोपचार, आहार आणि इतर खर्च करण्याची जबाबदारी संस्थेने स्वीकारली आहे. त्यामुळे तिचे बाळंतपण सुखदायी ठरले असून बाळंत वेदनेतून तीही सुखावली आहे.काय आहे जंगोरातड् संस्थेचे कार्य?जंगोराइतड् ही संस्था गेल्या दोन वर्षापासून गरीब बाळंत महिलांसाठी कार्य करीत आहे. बाळंतपणाचा खर्चही न पेलणाऱ्या कुटुंबातील गरीब महिलांना औषधोपचार व डॉक्टरांचे समुपदेशन व बाळंतपणानंतर तीन महिने माता व बाळाच्या औषधोपचार व सकस आहाराची जबाबदारी संस्थेकडून उचलली जाते. यादरम्यान माता किंवा बाळाला काही आजार झाल्यास त्यांच्या आॅपरेशनपासून उपचारापर्यंतचा खर्च संस्थेद्वारे केला जातो. दोन वर्षात संस्थेने ४० महिलांना अशाप्रकारे मदत केली आहे. यावर्षी संस्थेने आतापर्यंत १५ महिलांच्या बाळंतपणाची जबाबदारी उचलली आहे. नेहाच्या बाळांचा वर्षभराचा खर्च आणि त्यानंतरही हवी तशी मदत करण्याचा विश्वास प्रबोध वेखंडे यांनी दिला.

टॅग्स :WomenमहिलाHealthआरोग्य