शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

पराभवाच्या भीतीपोटी जुमलेबाजी ; अशोक चव्हाण यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 22:31 IST

मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान विधानसभा निवडणुकीतील निकालांमुळे केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटत आहे. या दोन्ही सरकारने साडेचार वर्षात कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळे मतदारांना मते माण्याची सोय राहिली नाही. याच भीतीपोटी मोदी व फडणवीस यांनी आता ‘जुमलेबाजी पार्ट - २’ सुरू केली आहे, अशी परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्य७ खा. अशोक चव्हाण यांनी केली.

ठळक मुद्देजनसंघर्ष यात्रेत रामटेक येथे जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्करामटेक : मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान विधानसभा निवडणुकीतील निकालांमुळे केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटत आहे. या दोन्ही सरकारने साडेचार वर्षात कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळे मतदारांना मते माण्याची सोय राहिली नाही. याच भीतीपोटी मोदी व फडणवीस यांनी आता ‘जुमलेबाजी पार्ट - २’ सुरू केली आहे, अशी परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याला नागपूर येथील दीक्षाभूमीवरून गुरुवारी सकाळी सुरुवात करण्यात आली. ही यात्रा दुपारी कामठी मार्गे रामटेक शहरात पोहोचली. रामटेक शहरात यात्रेचे जाहीर सभेत रुपांतर झाले. या वेळी चव्हाण बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. विजय वडेट्टीवार, आ. नसीम खान, माजी मंत्री वसंतराव पुरके, अ.भा.काँग्रेस कमिटीचे सचिव व राज्याचे सहप्रभारी आशिष दुआ, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, मुनाफ हकीम, डॉ. अमोल देशमुख, अनंतराव घारड, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे आदी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, देशात सध्या परिवर्तनाचे वारे वाहात आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान या या तिन्ही राज्यात काँग्रेसने सत्ता सांभाळताच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. फडणवीस सरकाने दोन वर्षांपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले नाही. महाराष्ट्र सध्या दुष्काळात होरपळत आहे. मात्र, शासनाच्यावतीने कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाही. शेतमालाचे भाव, पिण्याचे पाणी, गुरांचे वैरण, रोजगाराची कमतरता, बंद असलेले सोयाबीन, तूर, धान खरेदी केंद्र, विदर्भातील नवीन उद्योगाची वानवा, बेरोजगारी, नोटाबंदी यासह अनेक समस्यांनी आता गंभीर रूप धारण केले आहे. मात्र, हे प्रश्न सोडविण्यात भाजपा सरकार फेल ठरले, असा ठपका त्यांनी ठेवला.राजेंद्र मुळक यांनी प्रास्ताविकातून जनसंघर्ष यात्रेचा हेतू विशद केला. उदयसिंग यादव यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्रा