शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाच्या भीतीपोटी जुमलेबाजी ; अशोक चव्हाण यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 22:31 IST

मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान विधानसभा निवडणुकीतील निकालांमुळे केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटत आहे. या दोन्ही सरकारने साडेचार वर्षात कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळे मतदारांना मते माण्याची सोय राहिली नाही. याच भीतीपोटी मोदी व फडणवीस यांनी आता ‘जुमलेबाजी पार्ट - २’ सुरू केली आहे, अशी परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्य७ खा. अशोक चव्हाण यांनी केली.

ठळक मुद्देजनसंघर्ष यात्रेत रामटेक येथे जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्करामटेक : मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान विधानसभा निवडणुकीतील निकालांमुळे केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटत आहे. या दोन्ही सरकारने साडेचार वर्षात कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळे मतदारांना मते माण्याची सोय राहिली नाही. याच भीतीपोटी मोदी व फडणवीस यांनी आता ‘जुमलेबाजी पार्ट - २’ सुरू केली आहे, अशी परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याला नागपूर येथील दीक्षाभूमीवरून गुरुवारी सकाळी सुरुवात करण्यात आली. ही यात्रा दुपारी कामठी मार्गे रामटेक शहरात पोहोचली. रामटेक शहरात यात्रेचे जाहीर सभेत रुपांतर झाले. या वेळी चव्हाण बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. विजय वडेट्टीवार, आ. नसीम खान, माजी मंत्री वसंतराव पुरके, अ.भा.काँग्रेस कमिटीचे सचिव व राज्याचे सहप्रभारी आशिष दुआ, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, मुनाफ हकीम, डॉ. अमोल देशमुख, अनंतराव घारड, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे आदी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, देशात सध्या परिवर्तनाचे वारे वाहात आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान या या तिन्ही राज्यात काँग्रेसने सत्ता सांभाळताच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. फडणवीस सरकाने दोन वर्षांपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले नाही. महाराष्ट्र सध्या दुष्काळात होरपळत आहे. मात्र, शासनाच्यावतीने कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाही. शेतमालाचे भाव, पिण्याचे पाणी, गुरांचे वैरण, रोजगाराची कमतरता, बंद असलेले सोयाबीन, तूर, धान खरेदी केंद्र, विदर्भातील नवीन उद्योगाची वानवा, बेरोजगारी, नोटाबंदी यासह अनेक समस्यांनी आता गंभीर रूप धारण केले आहे. मात्र, हे प्रश्न सोडविण्यात भाजपा सरकार फेल ठरले, असा ठपका त्यांनी ठेवला.राजेंद्र मुळक यांनी प्रास्ताविकातून जनसंघर्ष यात्रेचा हेतू विशद केला. उदयसिंग यादव यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्रा