शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जुलैअखेरही नागपूर विभागातील धरणे कोरडीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 11:49 IST

जुलै महिना संपत आला आहे. परंतु नागपूर विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये २२ जुलैला केवळ ३१.४४ इतकाच पाणीसाठा आहे.

ठळक मुद्देमोठ्या प्रकल्पांत ३१.४४ टक्केच साठादमदार पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै महिना संपत आला आहे. परंतु नागपूर विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये २२ जुलैला केवळ ३१.४४ इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.पावसाळ्याचे दिवस आहे, परंतु काही अपवाद वगळल्यास अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. ६ जुलैला झालेल्या मुसळधार पावसाने विभागातील धरणे हाऊसफूल्ल होतील, अशी शक्यता होती. सहा तासात तब्बल २६३.५ मिमी विक्रमी पाऊस पडला. वडगाव-नांद धरणातील दरवाजे उघडण्याची वेळ आली. परंतु त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली. धरणे भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये २२ जुलै रोजी केवळ ३१.४४ टक्के इतकाच जलसाठा आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्याची एकूण क्षमता ३५५३.७७ दलघमी इतका असून २२ जुलैपर्यंत यात १११७.४१ दलघमी (३१.४४ टक्के) इतकाच पाणीसाठा आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणाची पाणीसाठा क्षमता १०१६.८८ इतकी आहे. यात १९७.१२ दलघमी म्हणजे १९.३९ टक्के इतका पाणीसाठा आहे. यासोबतच कामठी खैरीमध्ये ६३.८० टक्के, रामटेकमध्ये ३३.२७ टक्के, लोवर नांद वणा ४९.५८ टक्के, वडगाव ४८.८५ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ४२.४७ टक्के, सिरपूर २२.४३ टक्के, पुजारी टोला ६४.६५ टक्के, कालीसरार ६३.३५ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा २- १.७० टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ९२.७२ टक्के, गडचिरोली जिल्ह्या दिना ६१.१० टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर २९.२८ टक्के, धाम २९.४९ टक्के, पोथरा ९९.२० टक्के, लोअर वर्धा टप्पा १- २४.६२ टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा १ - २५.४१ आणि बावनथडी ३०.९१ टक्के इतका पाणीसाठा आहे.

असोलामेंढा व पोथरा भरलेविभागातील मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प ९२.७२ टक्के इतके भरले आहे. परंतु त्याचा एकूण साठा केवळ ५२.३३ इतका आहे. तर वर्धा जिल्ह्यातील पोथरा प्रकल्प ९९.२० टक्के भरले. त्याची एकूण साठा क्षमताच ३५ दलघमी इतकी आहे. यासोबतच पुजारी टोला, कामठी खैरी, दिना, कालीसरार हे प्रकल्प ५० टक्केवर भरले आहेत.

येत्या दिवसात धरण भरण्याची शक्यताजलसंपदा विभागाने जारी केलेल्या एकूण पाणीसाठ्याच्या माहितीनुसार गेल्या वर्षी आजच्याच तारखेचा एकूण पाणीसाठा पाहिला तर तो केवळ २०. ७३ टक्के इतकाच होता. तेव्हा आॅगस्ट आणि सप्टेंबर महिना शिल्लक असल्याने येत्या दिवसात धरणे भरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Damधरण