शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेतकरी कर्जमाफी यंत्रणेत न्यायिक अधिकारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांना दिलेले कर्ज माफ करण्याच्या दाव्यांवर निर्णय घेणा ऱ्या यंत्रणेत न्यायिक अधिकाऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणामध्ये राज्य शासनाला हा मुद्दा विचारात घेण्याचा आदेश दिला आहे.परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांना दिलेले कर्ज माफ करण्याच्या दाव्यांवर निर्णय घेण्यासाठी सध्या तीन सदस्यीय तालुका ...

ठळक मुद्देहायकोर्ट : शासनाला विचार करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांना दिलेले कर्ज माफ करण्याच्या दाव्यांवर निर्णय घेणा ऱ्या यंत्रणेत न्यायिक अधिकाऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणामध्ये राज्य शासनाला हा मुद्दा विचारात घेण्याचा आदेश दिला आहे.परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांना दिलेले कर्ज माफ करण्याच्या दाव्यांवर निर्णय घेण्यासाठी सध्या तीन सदस्यीय तालुका व जिल्हास्तरीय समित्या कार्यरत आहेत. तहसीलदार तालुकास्तरीय तर, जिल्हाधिकारी जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष असतात. बुलडाणा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे दावे तालुकास्तरीय समितीने मंजूर केले होते. परंतु, जिल्हास्तरीय समितीने ते दावे फेटाळले होते. परिणामी, संबंधित शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशावरून शासनाने यासंदर्भातील यंत्रणेची विस्तृत माहिती दिली. त्याचे अवलोकन केल्यानंतर न्यायालयाने या यंत्रणेत न्यायिक अधिकाऱ्यांचा समावेश असणे आवश्यक असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहचून शासनाला हा मुद्दा विचारात घेण्याचा आदेश दिला आहे. तसेच, याचिकाकर्त्या शेतकऱ्यांच्या प्रकरणांवर पुनर्निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशाची नियुक्ती करण्यात यावी, असे बुलडाणा जिल्हा न्यायाधीशांना सांगितले आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मनीष पितळे यांच्यासमक्ष बुधवारी सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील व अ‍ॅड. विपुल भिसे तर, शासनातर्फे अ‍ॅड. मेहरोज खान पठाण यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयFarmerशेतकरी