शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जरा हटके : चालती फिरती टेलिफोन ‘डिरेक्टरी’ ; प्रेमराज दवंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:18 IST

कुणाला अमूक व्यक्तीचा मोबाईल नंबर मागितल्यास, आठवत नाही...थांब मोबाईलमध्ये आहे. बिझनेस कार्ड पाठवतो, कुठल्याही कार्यालयात, घराघरांमध्ये किंवा सार्वजनिक स्थळी सहज ऐकायला मिळणारे हे वाक्य. परंतु एक व्यक्ती अशीही आहे जी चालता-फिरता टेलिफोन ‘डिरेक्टरी’ आहे. त्याला एकदा नंबर सांगितल्यास विसरत नाही. त्याच्या ‘मेमरी’मध्ये कायमचा ‘सेव्ह’ होतो. विशेष म्हणजे, या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये एकही नंबर ‘सेव्ह’ नाही. या अफलातून व्यक्तीचे नाव प्रेमराज लक्ष्मण दवंडे.

ठळक मुद्दे शेकडो मोबाईल नंबर तोंडपाठआरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात शिपाई बारावी नापास

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुणाला अमूक व्यक्तीचा मोबाईल नंबर मागितल्यास, आठवत नाही...थांब मोबाईलमध्ये आहे. बिझनेस कार्ड पाठवतो, कुठल्याही कार्यालयात, घराघरांमध्ये किंवा सार्वजनिक स्थळी सहज ऐकायला मिळणारे हे वाक्य. परंतु एक व्यक्ती अशीही आहे जी चालता-फिरता टेलिफोन ‘डिरेक्टरी’ आहे. त्याला एकदा नंबर सांगितल्यास विसरत नाही. त्याच्या ‘मेमरी’मध्ये कायमचा ‘सेव्ह’ होतो. विशेष म्हणजे, या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये एकही नंबर ‘सेव्ह’ नाही. या अफलातून व्यक्तीचे नाव प्रेमराज लक्ष्मण दवंडे.प्रेमराज हे आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात शिपाई म्हणून कार्यरत आहे. बारावी नापास असलेले परंतु कुठलाही नंबर सांगा ते नेहमीच लक्षात ठेवणारे प्रेमराज याची आरोग्य विभागाच्या माताकचेरी परिसरात वेगळी ओळख आहे. येथील अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर त्यांना तोंडपाठ आहेत. एखाद्या अधिकाऱ्याला तातडीने कुणाचा नंबर हवा असल्यास ते आवर्जून प्रेमराजला फोन करतात. विशेषत: कार्यालयीन सुटीच्या दिवशी किंवा रात्री हमखास ‘प्रेमराजला’ फोन येतो.प्रेमराजची परीक्षा पाहण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्याला आपला मोबाईल नंबर सांगून तो नंबर अमूक अधिकाऱ्यांना सांगण्यास सांगितला. त्या अधिकाऱ्याने दोन दिवसानंतर तो नंबर पुन्हा पे्रमराजला विचारला असता त्याने न चुकता सांगितला. प्रेमराजकडे मोबाईल आहे, पण एकही नंबर ‘सेव्ह’ नाही. तो मोबाईलचा उपयोग केवळ संवाद साधण्यासाठी करतो. त्याला बोलते केल्यावर म्हणाला, नोकरीला लागलो त्यावेळी मोबाईल फोन नव्हता. सर्व कामे फॅक्सवर व्हायची. सहा जिल्ह्यांना फॅक्स करावे लागायचे. त्यांची माहिती त्यांना टेलिफोनवरून द्यावी लागायची. अनेक गोपनीय फॅक्स असल्याने नंबर चुकू न देण्याची ताकीद असायची. त्यामुळे विशिष्ट जिल्ह्याचे विशिष्ट नंबर, कार्यालयाचे नंबर व संबंधित अधिकाऱ्यांचे नंबर पाठ करणे सुरू केले. परंतु लक्षात राहत नव्हते. मात्र व्यक्तीचा चेहरा किंवा त्याची विशिष्ट ओळख व नंबर डोळ्यासमोर आणल्यास तो नंबर लक्षात राहत असल्याचे लक्षात आले. ही पद्धती विकसित केली आणि पुढे कामाचा हा भाग सवयीचा झाला, असेही तो म्हणाला.कामाचा ताण व मोबाईलच्या अतिवापरामुळे रोजच्या महत्त्वाच्या गोष्टीही विसरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पाठ असलेले मोबाईल नंबर्स किंवा रोजच्या घडामोडी तरुणाईच्या लक्षात राहत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यात बारावी नापास प्रेमराजने नंबर लक्षात ठेवण्याची आत्मसात केलेली विशिष्ट शैली कौतुकास्पद आहे.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMobileमोबाइल