शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

जनविजन झाले आम्हा, विठ्ठल नामाप्रमाणे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 01:04 IST

आषाढ महिना आला की वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागते. त्या वाटेने लागलेल्या वारकऱ्यांना टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचे नामस्मरण करताना देहभान हरपल्याचा भास होतो, म्हणूनच संतांनीही नामस्मरणालाच अधिक महत्त्व दिले. नामस्मरणात रंगलेला सांसारिक माणूसही ‘जनविजन झाले आम्हा...’प्रमाणे पांडुरंगाचा अनुग्रह प्राप्त करतो. संतांच्या अभंगातील भक्तिमय स्वरधारांमधून वारकऱ्यांना मिळणारा नामस्मरणाचा अनुग्रह रसिकांनी अनुभवला. निमित्त होते सप्तकतर्फे आयोजित ‘सावळा घन’ या भक्तिमय कार्यक्रमाचे.

ठळक मुद्देपांडुरंग भक्तीच्या स्वरधारांनी हरपले देहभान : सप्तकचे भक्तिमय आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आषाढ महिना आला की वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागते. त्या वाटेने लागलेल्या वारकऱ्यांना टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचे नामस्मरण करताना देहभान हरपल्याचा भास होतो, म्हणूनच संतांनीही नामस्मरणालाच अधिक महत्त्व दिले. नामस्मरणात रंगलेला सांसारिक माणूसही ‘जनविजन झाले आम्हा...’प्रमाणे पांडुरंगाचा अनुग्रह प्राप्त करतो. संतांच्या अभंगातील भक्तिमय स्वरधारांमधून वारकऱ्यांना मिळणारा नामस्मरणाचा अनुग्रह रसिकांनी अनुभवला. निमित्त होते सप्तकतर्फे आयोजित ‘सावळा घन’ या भक्तिमय कार्यक्रमाचे.‘सावळा घन’च्या रूपाने कविकुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टीम येथे आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध युवा गायिका मुग्धा वैशंपायन, समीहन कशाळकर व सौरभ काडगावकर या तरुण गायकांनी त्यांच्या स्वरांमधून भक्तीच्या अमृतधारा बरसवल्या की, सभागृहात उपस्थित प्रत्येक श्रोता पांडुरंगाच्या भक्तिरसात न्हाऊन निघाला. मुग्धा यांनी ‘जनविजन झाले आम्हा...’ने या कार्यक्रमाला सुरुवात केली. टिळा लावणे, अंगाला राख फासणे म्हणजे वैराग्य नाही. वैराग्य, संन्यास हे बाह्यवेश नसून मनाची घडणे होय. संसाराबद्दल विराग आणि भगवंताबद्दल अनुराग हे वैराग्य. कुणी संसारात राहूनही भक्तिमार्गाने वैराग्य ध्यान मिळवू शकतो. भक्तीचा सोपा मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण. देव कळतो तो नामस्मरणातून, त्यासाठी वेदांचे ज्ञान कळणे गौण ठरते. संतांच्या अभिवचनातील हा सार उलगडणारा ‘आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण...’ हा अभंग सौरभ यांनी सादर करून श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेतला. समीहन यांनी पुढे शास्त्रीय अनुरागातील ‘पुंडलिका भेटी...’मधून पांडुरंगभेटीचे मोल उजागर केले. मुग्धा यांनी ‘श्रीरंगा कमलाकांता...’ हे गोपिकांचा भक्तिनाद उलडणारे नाट्यपद तेवढ्याच तल्लीनतेने सादर केले. पुढे या भक्तिमय स्वरधारा अशाच बरसत राहिल्या आणि श्रोत्यांना चिंब करून गेल्या. ‘तल्लीन होऊन नाचू दे..., कान्होबा, तुझी घोंगडी..., काय शोधिसी तू..., कानडा राजा पंढरीचा..., सगुण सुंदर..., सरीवर सरी..., माझे माहेर पंढरी..., कोण पुण्य गाठी..., मन आनंद आनंद..., अगा वैकुंठीच्या राया...’ असा सुरेल स्वरांचा भक्तिनाद रसिकांच्या कानामनात भिनला.कार्यक्रमात श्रीकांत सूर्यवंशी, राजन भावे, आशिष मुजुमदार, उज्ज्वला गोकर्ण, निनाद सोलापूरकर, नितीन वानखेडे यावाद्यकलावंतांनी भक्तिसंगीताचा गजर केला. कार्यक्रमाचे सुरेख निरुपण रेणुका देशकर यांनी केले. कार्यक्रमात समीर बेंद्रे, मिलिंद कुकडे, भारतभूषण जोशी, अमित दिवाडकर, डॉ. उदय गुप्ते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमnagpurनागपूर