शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जनविजन झाले आम्हा, विठ्ठल नामाप्रमाणे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 01:04 IST

आषाढ महिना आला की वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागते. त्या वाटेने लागलेल्या वारकऱ्यांना टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचे नामस्मरण करताना देहभान हरपल्याचा भास होतो, म्हणूनच संतांनीही नामस्मरणालाच अधिक महत्त्व दिले. नामस्मरणात रंगलेला सांसारिक माणूसही ‘जनविजन झाले आम्हा...’प्रमाणे पांडुरंगाचा अनुग्रह प्राप्त करतो. संतांच्या अभंगातील भक्तिमय स्वरधारांमधून वारकऱ्यांना मिळणारा नामस्मरणाचा अनुग्रह रसिकांनी अनुभवला. निमित्त होते सप्तकतर्फे आयोजित ‘सावळा घन’ या भक्तिमय कार्यक्रमाचे.

ठळक मुद्देपांडुरंग भक्तीच्या स्वरधारांनी हरपले देहभान : सप्तकचे भक्तिमय आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आषाढ महिना आला की वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागते. त्या वाटेने लागलेल्या वारकऱ्यांना टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचे नामस्मरण करताना देहभान हरपल्याचा भास होतो, म्हणूनच संतांनीही नामस्मरणालाच अधिक महत्त्व दिले. नामस्मरणात रंगलेला सांसारिक माणूसही ‘जनविजन झाले आम्हा...’प्रमाणे पांडुरंगाचा अनुग्रह प्राप्त करतो. संतांच्या अभंगातील भक्तिमय स्वरधारांमधून वारकऱ्यांना मिळणारा नामस्मरणाचा अनुग्रह रसिकांनी अनुभवला. निमित्त होते सप्तकतर्फे आयोजित ‘सावळा घन’ या भक्तिमय कार्यक्रमाचे.‘सावळा घन’च्या रूपाने कविकुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टीम येथे आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध युवा गायिका मुग्धा वैशंपायन, समीहन कशाळकर व सौरभ काडगावकर या तरुण गायकांनी त्यांच्या स्वरांमधून भक्तीच्या अमृतधारा बरसवल्या की, सभागृहात उपस्थित प्रत्येक श्रोता पांडुरंगाच्या भक्तिरसात न्हाऊन निघाला. मुग्धा यांनी ‘जनविजन झाले आम्हा...’ने या कार्यक्रमाला सुरुवात केली. टिळा लावणे, अंगाला राख फासणे म्हणजे वैराग्य नाही. वैराग्य, संन्यास हे बाह्यवेश नसून मनाची घडणे होय. संसाराबद्दल विराग आणि भगवंताबद्दल अनुराग हे वैराग्य. कुणी संसारात राहूनही भक्तिमार्गाने वैराग्य ध्यान मिळवू शकतो. भक्तीचा सोपा मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण. देव कळतो तो नामस्मरणातून, त्यासाठी वेदांचे ज्ञान कळणे गौण ठरते. संतांच्या अभिवचनातील हा सार उलगडणारा ‘आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण...’ हा अभंग सौरभ यांनी सादर करून श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेतला. समीहन यांनी पुढे शास्त्रीय अनुरागातील ‘पुंडलिका भेटी...’मधून पांडुरंगभेटीचे मोल उजागर केले. मुग्धा यांनी ‘श्रीरंगा कमलाकांता...’ हे गोपिकांचा भक्तिनाद उलडणारे नाट्यपद तेवढ्याच तल्लीनतेने सादर केले. पुढे या भक्तिमय स्वरधारा अशाच बरसत राहिल्या आणि श्रोत्यांना चिंब करून गेल्या. ‘तल्लीन होऊन नाचू दे..., कान्होबा, तुझी घोंगडी..., काय शोधिसी तू..., कानडा राजा पंढरीचा..., सगुण सुंदर..., सरीवर सरी..., माझे माहेर पंढरी..., कोण पुण्य गाठी..., मन आनंद आनंद..., अगा वैकुंठीच्या राया...’ असा सुरेल स्वरांचा भक्तिनाद रसिकांच्या कानामनात भिनला.कार्यक्रमात श्रीकांत सूर्यवंशी, राजन भावे, आशिष मुजुमदार, उज्ज्वला गोकर्ण, निनाद सोलापूरकर, नितीन वानखेडे यावाद्यकलावंतांनी भक्तिसंगीताचा गजर केला. कार्यक्रमाचे सुरेख निरुपण रेणुका देशकर यांनी केले. कार्यक्रमात समीर बेंद्रे, मिलिंद कुकडे, भारतभूषण जोशी, अमित दिवाडकर, डॉ. उदय गुप्ते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमnagpurनागपूर