शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

नागपुरात आजपासून ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 00:47 IST

नागपुरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता लोकप्रतिनिधींच्या मागणीवर सप्टेंबर महिन्यात प्रत्येक शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देमनपाने काढला नाही आदेश : महापौरांनी केले स्वेच्छेने सामील होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता लोकप्रतिनिधींच्या मागणीवर सप्टेंबर महिन्यात प्रत्येक शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे. परंतु मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जनता कर्फ्यूबाबत मनपातर्फे कुठलेही अधिकृत आदेश काढण्यात आलेले नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान सोशल मीडियावर जनता कर्फ्यूबाबत वेगवेगळे वक्तव्य जारी होत आहेत. अशा परिस्थितीत १९ व २० सप्टेंबर रोजी लावण्यात येणाऱ्या जनता कर्फ्यूमध्ये नागरिक किती स्वेच्छेने सहभागी होतात हे येणारी वेळच स्पष्ट करेल.सूत्रानुसार वाढते संसर्ग रोखण्यासोबतच कोरोनाशी संघर्ष करणाºया कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही थोडा दिलासा देण्याच्या उद्देशाने जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. नागरिक जर घरात राहिले तर त्यांना थोडाफार दिलासा मिळेल. अनेक व्यापारी संघटनांनीही महापौरांना पत्र लिहून जनता कर्फ्यूसाठी समर्थन दिले आहे. त्यामुळे हा जनता कर्फ्यू यशस्वी करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे.विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण होणार नाहीजनता कर्फ्यू दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे, त्यांना कुठलीही अडचण होणार नाही. त्यांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवावे. महापौर जोशी यांनीसुद्धा स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. लोक्रतिनिधींनीही नागरिकांना प्रेरित करण्यासाठी पुढे यावे.दुकाने-प्रतिष्ठाने उघडल्यास दंड होणार - महापौरजनता कर्फ्यू दरम्यान जर कुणी आपली प्रतिष्ठाने, दुकान, कार्यालय सुरु ठेवले तर त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल, असे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. लोकमतशी बोलताना त्यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार महापौरांनी जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. तेव्हा न्यूसेंस डिटेक्श्न स्क्वॉड (एनडीएस)तर्फे कारवाई सुद्धा केली जाईल. जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय लोकप्रतिनिधींच्या सहमतीने घेण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी कुटुंबासाठी, परिवारातील प्रत्येक सदस्यासाठी जनता कर्फ्यूमध्ये सामील व्हा. जनता कर्फ्यूचा अर्थ नागरिकांनी स्वत:हून आपली प्रतिष्ठाने, दुकाने, कार्यालय आदी बंद ठेवणे होय. जेणेकरून संसर्ग रोखता येईल. दोन दिवस बंद राहील तर संक्रमणावर ब्रेक लागेल.व्हायरल मॅसेज- महाराष्ट्र सरकारचा कर्फ्यू नाहीसोशल मीडियावर शुक्रवारी एक मॅसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यात मुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहमंत्री यांचे फोटो लावलेले होते. यात लिहिले होते की, कृपया भ्रमित होऊ नका, महाराष्ट्र सरकारने नागपुरात शनिवारी व रविवारी कुठल्याही प्रकारचा कर्फ्यू लावलेला नाही. जर कुणी आपले दुकान, प्रतिष्ठान बंद करायला आले तर आपल्या कॅमेºयाने त्याचे फोटो घ्या. तातडीने पोलीस कंट्रोल ररुम मध्ये १०० नंबरवर फोन लावा.कुठलाही आदेश काढलेला नाही, स्वेच्छेने व्हा सामील - आयुक्तमनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी टिष्ट्वट करून सांगितले की, शनिवारी व रविवारी लागणाºया जनता कर्फ्यूबाबत अनेक फोन आले आहेत. परंतु जनता कर्फ्यूबाबत अधिकृतरीत्या कुठलाही आदेश महापालिकेतर्फे काढण्यात आलेला नाही. नागरिक यात स्वेच्छेने सामील होऊ शकतात. विनाकारण कुणीही घराबाहेर निघू नये, मास्कचा वापर करावा आणि सुरक्षित अंतर राखावे, ही काळाची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर