शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

जमाल सिद्दिकी यांना ‘एक्स’ श्रेणीची सुरक्षा नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 22:56 IST

Jamal Siddiqui , denied 'X' category security भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल अनवर सिद्दिकी यांना ‘एक्स’ श्रेणीची सुरक्षा नाकारण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने योग्य ठरवला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल अनवर सिद्दिकी यांना ‘एक्स’ श्रेणीची सुरक्षा नाकारण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने योग्य ठरवला. तसेच, या निर्णयाविरुद्ध सिद्दिकी यांनी दाखल केलेली रिट याचिका फेटाळून लावली.

याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सिद्दिकी यांना पहिल्यांदा २०१७ मध्ये ‘एक्स’ श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. त्यानंतर परिस्थितीत बदल झाल्याच्या कारणावरून १३ नोव्हेंबर २०१९ रोजी ही सुरक्षा काढून घेण्यात आली. त्याऐवजी त्यांना एक बंदुकधारी सुरक्षारक्षक देण्यात आला. हा निर्णय अवैध असल्याचे सिद्दिकी यांचे म्हणणे होते. हा निर्णय राजकीय द्वेषभावनेतून घेण्यात आला. सरकारने समान पदांवरील इतर व्यक्तींना 'एक्स' श्रेणीची सुरक्षा दिली आहे असा त्यांचा आरोप होता. न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता सरकारचा निर्णय योग्य ठरवून सिद्दिकी यांना दिलासा देण्यास नकार दिला. अशा प्रकरणात सरकारच्या निर्णयावर असमाधानी असणारे व्यक्ती स्वत:च्या खर्चाने खासगी सुरक्षा रक्षकांची सेवा घेऊ शकतात असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

मागेल त्याला विशेष सुरक्षा दिली जाऊ शकत नाही

स्वत:च्या प्राणाला व मालमत्तेला धोका असल्याचे कारण सांगणाऱ्या प्रत्येकाला विशेष सुरक्षा प्रदान केली जाऊ शकत नाही. कुणीही अधिकार म्हणून विशेष सुरक्षा मिळवू शकत नाही. याकरिता प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. राज्य सरकार त्या प्रक्रियेचे पालन करून कुणाला विशेष सुरक्षा द्यायची व कुणाला नाही, यावर निर्णय घेते. सुरक्षा मागणारी व्यक्ती स्वत: याविषयी निर्णय घेऊ शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

देशात सर्वत्र कायद्याचे राज्य

देशाचा कारभार चालवण्यासाठी लिखित राज्यघटना असलेल्या भारतात सर्वत्र कायद्याचे राज्य आहे. नागरिकांचे प्राण व मालमत्तेचे संरक्षण करण्याचे कर्तव्य व जबाबदारी सरकारकडे असून त्याला विविध कायद्यांद्वारे न्याय दिला जातो. त्याकरिता सर्वत्र पोलीस ठाणी स्थापन करण्यात आली आहेत. राखीव पोलीस बल निर्माण करण्यात आले आहे. पोलीस विभागाद्वारे संकटातील व्यक्तींपर्यंत मदत पोहचविण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. कुख्यात गुन्हेगारांना हद्दपार व स्थानबद्ध केले जाते, असेही न्यायालयाने निर्णयात म्हटले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयBJPभाजपा