शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

जेटली यांच्या निधनाने नागपूरच्या भाजप वर्तुळात शोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:53 IST

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर भाजप वर्तुळात शोककळा पसरली आहे. अरुण जेटली यांच्या मृत्यूनंतर भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर भाजप वर्तुळात शोककळा पसरली आहे. अरुण जेटली यांच्या मृत्यूनंतर भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. अरुण जेटली हे संयमित नेते होते. त्यांच्या कार्यकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेने भरारी घेतली व त्यांनी देशाला नवी दिशा दिली. त्यांच्या जाण्याने केवळ पक्षाचेच नव्हे तर देशाचेही नुकसान झाले आहे, असा सूर होता.मी जवळच्या मित्राला मुकलोविद्यार्थीदशेपासूनच प्रभावी वक्ते म्हणून त्यांचा परिचय होता. देशातील नामवंत वकील म्हणून ते परिचित होतेच. भाजपचा अध्यक्ष असताना अनेक कठीण प्रसंगी त्यांचे मार्गदर्शन मिळाले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेता व अर्थमंत्री म्हणून त्यांनी ऐतिहासिक काम केले. प्रखर बुद्धिमत्तेच्या आधारावर युक्तिवाद करण्याची त्यांच्यात अफाट क्षमता होती. मी माझ्या जवळच्या मित्राला मुकलो आहे. सुषमा स्वराज यांच्यानंतर अरुणजी यांचे जाणे हा एक मोठा धक्का आहे.नितीन गडकरी, केंद्रीय मंत्रीझंझावाती व्यक्तिमत्त्वाला देश मुकलाअरुण जेटली हे प्रख्यात वकील, प्रभावी संसदपटू हे होते. त्यांच्या निधनामुळे देश एका झंझावाती व्यक्तिमत्त्वाला मुकला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर देशात आर्थिक शिस्त आणली. अत्यंत महत्त्वाची कामगिरी त्यांनी या काळात पार पाडली. विद्यार्थी नेता ते राजकारणी हा त्यांचा झंझावाती प्रवास होता. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. अशा अत्यंत सक्रिय कार्यकर्त्याच्या जाण्याने भाजपाचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री‘जिनीयस’ व्यक्तिमत्त्व हरविलेअरुण जेटली हे अतिशय हुशार नेते होते. विधी क्षेत्रात त्यांचा दबदबा होता व लोक त्यांना मानत असत. भारतीय जनता पक्षाच्या संघटनेशी व विचारधारेशी त्यांची कटिबद्धता होती. राज्यसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची भाषणे तर अतिशय उत्तम राहिली. नेहमी संयमित व मुद्देसूदपणे बोलणारे देशाचे माजी वित्तमंत्री अरुण जेटली हे खरोखरच राजकारणातील एक ‘जिनीयस’ व्यक्तिमत्त्व होते. कुठलाही मुद्दा असला तरी जेटली हे सखोल विचार व अभ्यास करुन मगच बोलत असत. त्यांच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे.डॉ.परिणय फुके, आदिवासी विकास व वन राज्यमंत्रीअष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे होते धनीअरुण जेटली यांच्यासोबत राज्यसभेत काम करण्याची संधी मिळाली होती. काम करण्याची त्यांची पद्धत थक्क करणारी होती. एक प्रभावी वकील असण्यासोबतच त्यांनी राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. विशेष म्हणजे एक व्यक्ती म्हणून ते अतिशय सहृदयी होते. अरुण जेटली यांच्या मार्गदर्शनात अनेक गोष्टी शिकता आल्या. त्यांच्या निधनामुळे कधीही न भरुन निघणारी हानी झाली आहे.अजय संचेती, माजी खासदार

 

 

 

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीBJPभाजपाnagpurनागपूर