शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जेटलींचे डोके ठिकाणावर आहे का? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:13 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख दुर्गा असा केला होता. आता त्याच पक्षाचे अर्थमंत्री अरुण जेटली हे इंदिराजींची तुलना हिटलरशी करीत आहेत. या जेटलींचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केला. इंदिराजींची आणीबाणी ही घटनादत्त होती. पण सध्या भाजपाने देशावर अघोषित आणीबाणी लादली आहे, असा आरोपही काँग्रेस नेत्यांनी केला.

ठळक मुद्देकाँग्रेस नेत्यांचा सवाल : छत्रपती शाहू महाराज यांची जयंती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख दुर्गा असा केला होता. आता त्याच पक्षाचे अर्थमंत्री अरुण जेटली हे इंदिराजींची तुलना हिटलरशी करीत आहेत. या जेटलींचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केला. इंदिराजींची आणीबाणी ही घटनादत्त होती. पण सध्या भाजपाने देशावर अघोषित आणीबाणी लादली आहे, असा आरोपही काँग्रेस नेत्यांनी केला.काँग्रेसतर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतापनगर रिंगरोडवरील राधे मंगलम येथे विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला. या वेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी मंत्री हरिभाऊ नाईक, किशोर गजभिये, डॉ. बबनराव तायवाडे, बाबुरावतिडके,अतुल लोंढे, धनंजय धार्मिक आदी उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या वेळी काँग्रेस नेत्यांनी संघ परिवार, भाजपा व केंद्र तसेच राज्य सरकारच्या एकूणच कारभारावर हल्ला चढविला. मुत्तेमवार म्हणाले, इंदिराजींच्या आणीबाणीचा उल्लेख विनोबा भावे यांनी अनुशासन पर्व असा केला आहे. हीटलर हा क्रूर वृत्तीचा होता. त्याने ८० लाख ज्यू लोकांना मारले. जेटली त्याच्याशी इंदिराजींची तुलना करतात. यावरून जेटलींच्या बुद्धीमत्तेची उंची लक्षात येते, अशी टीका त्यांनी केली. वडेट्टीवार म्हणाले, इंदिराजींवर आरोप करणाऱ्यांची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. संघ परिवाराकडून आपली विचारधारा लादण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अभ्यासक्रम बदलण्याचे षङ्यंत्र सुरू आहे. उद्या हेडगेवारांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, हे विद्यार्थ्यांना शिकविले जाईल. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे खलनायकाप्रमाणे काम करीत आहेत. यांच्या विरोधात कुणी बोलले तर त्याला देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन संषर्घ करण्याचे आवाहन त्यांनी केले.हरिभाऊ नाईक म्हणाले, काँग्रेस नेत्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी भाजप व संघ परिवाराचा जन्म झाला आहे. यांचा इतिहासही तसाच आहे. मात्र, काँग्रेसजनांनी आता पुढे येऊन आपल्या दैवतांचे रक्षण करण्यासाठी गरज त्यांनी व्यक्त केली. लोकांना परिवर्तन हवे आहे. याची सुरुवात भंडारा-गोंदियाच्या निवडणुकीने झाली असल्याचे त्यांनी सांगितले.किशोर गजभिये म्हणाले, शाहू महाराजांनी सदैव सामाजिक न्यायाची भूमिका घेतली. मात्र, सध्या देशात सामाजिक अन्यायाचे वातावरण सुरू आहे. मागासवर्गीयांवर हल्ले चढविले जात आहेत. सध्या देशात अषोषित आणीबाणी लागली असून, ती हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार करण्यासाठी काम करीत आसल्याचा आरोप त्यांनी केला. संदेश सिंगलकर यांनी आभार मानले.एकत्र या, भाजपाला उलथवून फेका !- जनतेला बदल हवा आहे. जनता काँग्रेसकडे आशेने पाहत आहे. अशा वेळी सर्व काँग्रेस नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे सांगत एकत्र या व भाजपाला उलथवून फेका, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.मंत्री म्हणतात, पुन्हा सत्ता येऊ नये!वडेट्टीवार म्हणाले, मंत्रालयात मंत्र्यांपुढे व सचिवांपुढे संघाने आपले लोक बसविले आहेत. ते सरकारचा पगार घेतात व काम संघ, भाजपासाठी करतात. मंत्र्यांना तर कुठलेच अधिकार नाहीत. पुढे जर पुन्हा भाजपाची सत्ता आली तर आमचा काहीच सन्मान राहणार नाही. त्यामुळे सत्ता न आलेली बरी, असे भाजपाचे मंत्री खासगीत बोलून दाखवीत आहेत, असा चिमटाही वडेट्टीवार यांनी या वेळी काढला.

टॅग्स :congressकाँग्रेसShahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंती