शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ती एक काळरात्र...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:06 IST

रस्त्याकडेच्या खड्ड्यात अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्लांसाठी व्याकूळ होणारी त्याची आई किंवा जंगलातल्या खड्ड्यात पडलेल्या पिल्लाची सुटका करण्यासाठी वेडावलेला हत्तींचा कळप, ...

रस्त्याकडेच्या खड्ड्यात अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्लांसाठी व्याकूळ होणारी त्याची आई किंवा जंगलातल्या खड्ड्यात पडलेल्या पिल्लाची सुटका करण्यासाठी वेडावलेला हत्तींचा कळप, इतकेच कशाला हरणाच्या पाडसाची सुटका करण्यासाठी वन्यश्वापदांची तितकीच भीती असतानाही जीव धोक्यात घालणारे मुके प्राणी, अशी कितीतरी उदाहरणे देता येतील की माणसाइतका मेंदू विकसित झालेला नसताना, भावनांचे कल्लोळ तितकेसे उचंबळणारे नसतानाही पोटच्या गोळ्यासाठी, काळजाच्या तुकड्यासाठी जीवाचा आकांत करतात. ... अन् इकडे सर्व सजीवांमध्ये हुशार समजणारा माणूस मात्र चौदा वर्षाची गोड मुलगी, तिच्या पाठीवर पाय देऊन जगात आलेला तिचा धाकटा भाऊ, जिच्यासोबत प्रेमविवाह केला व सात जन्म निभावण्याच्या आणाभाका घेतल्या अशी जीवनसंगिनी, तिची आई व बहीण अशा सगळ्यांची एकापाठोपाठ एक अशा हत्या करतो. नंतर उपरती नव्हे तर परिणामांच्या भीतीने स्वत:ही गळफास लावून आत्महत्या करतो. नागपूरच्या सोमवारच्या या नृशंस हत्याकांडाने आपल्या सर्वांसमोर प्रश्न उभा केला आहे, की अशा घटनांवेळी संबंधिताला खरेच पशूची उपमा देता येईल. हे असे करणारा आलोक ऊर्फ चंदू माटूरकर म्हणायला माणूस असला तरी रविवारच्या रात्री त्याच्या अंगात सैतान संचारला होता. माणसाचा राग काही मिनिटे, फारतर अर्धा-एक तास टिकतो. त्यानंतर तो भानावर येतो. डोके शांत होते. पण, चंदूच्या रूपातल्या सैतानाच्या डोळ्यात संपूर्ण रात्रभर रक्त उतरले होते. अवघ्या दोनशे फूट अंतरावरच्या दोन घरांमध्ये मिळून पाच जणांचे जीव घेतले. मध्यरात्री साडेअकरा-बारापासून पहाटे पाचपर्यंत तो एकामागून एक हत्या करीत राहिला. कोवळ्या पोरीच्या डोक्यावर हातोड्याचा जीवघेणा घाव करताना, तोंडावर उशी दाबून पाेराचा तडफडून जीव घेताना, पत्नी, मेहुणी व सासूचा गळा चिरताना त्याच्यातला माणूस जणू मरण पावला होता. अंगावर भीतीचे शहारे आणणाऱ्या या घटनेनंतर एकच प्रश्न प्रत्येकांच्या ओठावर आहे, की असे कसे अकल्पित घडू शकते, असा कसा एखादा माणूस इतका निर्दयी बनू शकतो. प्रेम प्रकरण असो की अनैतिक संबंध, शरीराची भूक माणसाला इतके हिंस्र कसे बनवू शकते. आता असे स्पष्ट होऊ लागले आहे, की वरवर सोज्वळ वाटणारा माटूरकर हे प्रत्यक्षात दुभंगलेले व्यक्तिमत्त्व होते. त्याचे कृत्य पूर्वनियोजित होते. त्याला पंधरा वर्षांचा संसार मोडून टाकायचा होता. त्याच्या वेलीवर उमललेली फुले चिरडून टाकायची होती. मेहुणी त्याची होत नसेल तर कुणाचीच होऊ नये, हे नियोजन होते. सगळ्यांना संपूवन टाकायचे होते. त्याने धारदार शस्त्रे मुलीच्या नावाने ऑनलाईन मागवली होती. काळीज गोठवून टाकणाऱ्या या नरसंहाराचा अनेक अंगांनी विचार करायला हवा. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीने, स्मार्टफोनसारख्या संपर्क साधनांनी माणसांच्या आयुष्यात जितकी सुखे आणली त्याहून कितीतरी प्रमाणात विकृती निर्माण करणाऱ्या पॉर्नसारख्या संधी आणल्या. त्यातूनच एक भयंकर प्रकारची लैंगिक विकृती जन्माला आली. एकदा अशी विकृती एखाद्याच्या अंगात व सुखी संसारात शिरली की ती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून दु:खालाच जन्म देते. घरोघरी मातीच्या चुली असतात. संसारात पती-पत्नीची भांडणे होतात, भांड्याला भांडे लागतेच. त्याची कारणे कधी आर्थिक असतात, कधी अन्य कुठली तरी. पण, भांडण झाल्यानंतर एकमेकांना सांभाळून घेणारी घरे, त्यातील माणसांना काहीसा पश्चात्ताप होतो. मुलांचे हसरे चेहरे पाहून पती-पत्नी माघार घेतात. गोकुळ पुन्हा आनंदात न्हाऊ लागते. काही घटनांमध्ये रक्त सांडले तरी ते पाहून माणूस भानावर येतो. त्यांला पश्चात्ताप होतो. आपल्या हातून हे काय आक्रित घडले असे वाटून तो कायद्याला व परिणामांना सामोरा जातो. नागपूरच्या घटनेतील माटूरकरची आर्थिक परिस्थिती फार चांगली नसली आणि त्याचा छोटासा गारमेंटचा व्यवसाय कोरोना महामारीमुळे अडचणीत आला असला तरी केवळ गरिबीच्या वैफल्यातून रक्ताचा सडा टाकण्याइतका तो खचितच वाईट नव्हता. याचाच अर्थ आर्थिक विपन्नावस्था, गरिबी, नैराश्य वगैरे कारणे ही मुळात सबबी असतात. मुळात इतरांचा व स्वत:चा जीव घेणाऱ्याच्या माणुसकीची हत्या आधी झालेली असते. अशा घटना कधीतरी घडणाऱ्या असल्या तरी घरोघरी बोध घ्यायला हवा. थोडेसे इकडेतिकडे होत असेल तर वेळीच सावध व्हायला हवे. एकमेकांना जपायला हवे. नाती अन् संसार प्रेमाने फुलवायला हवेत.

--------------------------------------------------