शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हे दोन महिने कुटुंबापासून विरहवेदनेचे ! जालंधर ते नागपूर प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 11:22 IST

जालंधर येथील आंतरराष्ट्रीय लवली युनिव्हर्सिटीमध्ये नाट्यशिक्षक असलेले युवा रंगकर्मी प्रा. गौरव अंबारे कोरोनाच्या सावटात तेथेच अडकले आणि तब्बल आठ महिन्यानंतर नागपूरला परतले आहेत. त्यांनी या प्रवासाचा थरारक अनुभव ‘लोकमत’कडे व्यक्त केला.

ठळक मुद्देभयाचा, संशयाचा अन् चिकित्सेचा, स्वत:ला केले ‘होम क्वारंटाईन’

प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ध्येयविहीन परिस्थिती निर्माण झाली तर माणूस सर्वार्थाने एकटा पडतो आणि कुटुंबीयांच्या आठवणींचा कळवळा सुटतो. अशा तळमळीने ग्रासलेल्या मजुरांचे थवे दिसत आहेतच. कोरोनामुळे मानवाच्या मनस्थितीची अशीच दशा थोड्याफार फरकाने दिसून येत आहे. जालंधर येथील आंतरराष्ट्रीय लवली युनिव्हर्सिटीमध्ये नाट्यशिक्षक असलेले युवा रंगकर्मी प्रा. गौरव अंबारे कोरोनाच्या सावटात तेथेच अडकले आणि तब्बल आठ महिन्यानंतर नागपूरला परतले आहेत. त्यांनी या प्रवासाचा थरारक अनुभव ‘लोकमत’कडे व्यक्त केला.शैक्षणिक सत्र आटोपण्यापूर्वीच कोरोनामुळे संपूर्ण देश टाळेबंदीत आला. युनिव्हर्सिटीलाही हा काळ जाईपर्यंत टाळे बसले आणि गौरव विद्यापीठाच्या वसतिगृहात एकलेच बंदिस्त झाले. अशा स्थितीत नागपूरला जाण्याची संधी मिळाली होती. मात्र, आसामचा एक सहकारी प्राध्यापक एकटा पडेल म्हणून ती संधी गौरव यांनी गमावली. त्याच्या राज्यातून त्याला बोलावणे आल्यावर गौरव यांनी पंजाब सरकारला नागपूरला जाण्याच्या व्यवस्थेचे पत्र पाठवले आणि त्या अनुषंगाने सरकारी आरोग्य पथकाकडून त्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी झाली. दहा-बारा दिवसानंतर नागपूरच्या प्रवासाचा मुहूर्त ठरला आणि हा प्रवास अत्यंत भयाचा, संशयाचा, चिकित्सेचा आणि तेवढाच उत्सुकतेचा होता, हे आज नागपुरात उतरल्यानंतर गौरव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ट्रान्सपोर्ट यंत्रणा अर्थात बसस्थानक, रेल्वे, विमानतळ हे सदैव माणसाच्या धावपळीने फुलले असते. मात्र, २७ मे रोजी जेव्हा ते जालंधर बसस्थानकावर पोहोचले तेव्हा बसथानकावर कमालीची स्मशान शांतता दिसली. तेथून दुपारी अमृतसर विमानतळावर पोहोचलो तेव्हा विमानतळ जणू हॉस्पिटलमध्ये परावर्तित झाल्याचा भास झाला. फॉर्म भरून देणे, सॅनिटाईझ करणे, मास्क देणे आणि फ्लाईटचा वेळ होईपर्यंत एकटे बसून राहणे ही प्रक्रिया विमानतळावर होती. रात्री अमृतसरहून दिल्ली विमानतळावर उतरलो तर आणखीनच कठीण प्रक्रिया सुरू झाल्या आणि एवढे मोठ्ठे विमानतळ एखाद्या भयपटाला शोभेल अशा स्थितीत दिसून आले. जो-तो पीपीई किटमध्ये होता आणि दर अर्ध्या तासाने स्क्रिनिंग व चाचपणी होत होती. साधारण ७ तास दिल्ली विमानतळावर घालविल्यानंतर २८ मे रोजी सकाळी ६.३०च्या फ्लाईटमध्ये बसलो तेव्हा जीवात जीव आला आणि ८ वाजता नागपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर पुन्हा फॉर्म भरून द्यावा लागला आणि हातावर ११ जूनपर्यंत ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का बसला. सोबतच शंभर नंबरवर पोलिसांना माहिती दिल्यानंतर घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यावर तब्बल आठ महिन्यानंतर आई व इतरांचे दर्शन झाले. केवळ मुखदर्शन घेऊन वरचा मजला गाठला आणि आता पुढचे १४ दिवस त्याच एका खोलीत राहायचे आहे, असे गौरव यांनी सांगितले.१४ दिवसानंतर आईला करकचून मिठी मारीन : गौरव अंबारेतब्बल आठ महिन्यानंतर आई दिसली. मात्र, सगळ्यांचे आरोग्य महत्त्वाचे. होम क्वारंटाईनचा काळ गेल्यावर तिला करकचून मिठी मारणार आहे. या दोन महिन्याच्या काळात करायला काहीच नव्हते. पुस्तकांचे वाचन आणि घरच्यांची आठवण, हाच विषय होता. दरम्यान, एका आॅनलाईन वेबसिरिजमध्ये काम केले. त्यात सगळेच नागपूरचे असल्याने नागपूरला कधी पोहोचतो असे झाले होते, अशी भावना गौरव अंबारे यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस