शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

हे दोन महिने कुटुंबापासून विरहवेदनेचे ! जालंधर ते नागपूर प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 11:22 IST

जालंधर येथील आंतरराष्ट्रीय लवली युनिव्हर्सिटीमध्ये नाट्यशिक्षक असलेले युवा रंगकर्मी प्रा. गौरव अंबारे कोरोनाच्या सावटात तेथेच अडकले आणि तब्बल आठ महिन्यानंतर नागपूरला परतले आहेत. त्यांनी या प्रवासाचा थरारक अनुभव ‘लोकमत’कडे व्यक्त केला.

ठळक मुद्देभयाचा, संशयाचा अन् चिकित्सेचा, स्वत:ला केले ‘होम क्वारंटाईन’

प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ध्येयविहीन परिस्थिती निर्माण झाली तर माणूस सर्वार्थाने एकटा पडतो आणि कुटुंबीयांच्या आठवणींचा कळवळा सुटतो. अशा तळमळीने ग्रासलेल्या मजुरांचे थवे दिसत आहेतच. कोरोनामुळे मानवाच्या मनस्थितीची अशीच दशा थोड्याफार फरकाने दिसून येत आहे. जालंधर येथील आंतरराष्ट्रीय लवली युनिव्हर्सिटीमध्ये नाट्यशिक्षक असलेले युवा रंगकर्मी प्रा. गौरव अंबारे कोरोनाच्या सावटात तेथेच अडकले आणि तब्बल आठ महिन्यानंतर नागपूरला परतले आहेत. त्यांनी या प्रवासाचा थरारक अनुभव ‘लोकमत’कडे व्यक्त केला.शैक्षणिक सत्र आटोपण्यापूर्वीच कोरोनामुळे संपूर्ण देश टाळेबंदीत आला. युनिव्हर्सिटीलाही हा काळ जाईपर्यंत टाळे बसले आणि गौरव विद्यापीठाच्या वसतिगृहात एकलेच बंदिस्त झाले. अशा स्थितीत नागपूरला जाण्याची संधी मिळाली होती. मात्र, आसामचा एक सहकारी प्राध्यापक एकटा पडेल म्हणून ती संधी गौरव यांनी गमावली. त्याच्या राज्यातून त्याला बोलावणे आल्यावर गौरव यांनी पंजाब सरकारला नागपूरला जाण्याच्या व्यवस्थेचे पत्र पाठवले आणि त्या अनुषंगाने सरकारी आरोग्य पथकाकडून त्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी झाली. दहा-बारा दिवसानंतर नागपूरच्या प्रवासाचा मुहूर्त ठरला आणि हा प्रवास अत्यंत भयाचा, संशयाचा, चिकित्सेचा आणि तेवढाच उत्सुकतेचा होता, हे आज नागपुरात उतरल्यानंतर गौरव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ट्रान्सपोर्ट यंत्रणा अर्थात बसस्थानक, रेल्वे, विमानतळ हे सदैव माणसाच्या धावपळीने फुलले असते. मात्र, २७ मे रोजी जेव्हा ते जालंधर बसस्थानकावर पोहोचले तेव्हा बसथानकावर कमालीची स्मशान शांतता दिसली. तेथून दुपारी अमृतसर विमानतळावर पोहोचलो तेव्हा विमानतळ जणू हॉस्पिटलमध्ये परावर्तित झाल्याचा भास झाला. फॉर्म भरून देणे, सॅनिटाईझ करणे, मास्क देणे आणि फ्लाईटचा वेळ होईपर्यंत एकटे बसून राहणे ही प्रक्रिया विमानतळावर होती. रात्री अमृतसरहून दिल्ली विमानतळावर उतरलो तर आणखीनच कठीण प्रक्रिया सुरू झाल्या आणि एवढे मोठ्ठे विमानतळ एखाद्या भयपटाला शोभेल अशा स्थितीत दिसून आले. जो-तो पीपीई किटमध्ये होता आणि दर अर्ध्या तासाने स्क्रिनिंग व चाचपणी होत होती. साधारण ७ तास दिल्ली विमानतळावर घालविल्यानंतर २८ मे रोजी सकाळी ६.३०च्या फ्लाईटमध्ये बसलो तेव्हा जीवात जीव आला आणि ८ वाजता नागपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर पुन्हा फॉर्म भरून द्यावा लागला आणि हातावर ११ जूनपर्यंत ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का बसला. सोबतच शंभर नंबरवर पोलिसांना माहिती दिल्यानंतर घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यावर तब्बल आठ महिन्यानंतर आई व इतरांचे दर्शन झाले. केवळ मुखदर्शन घेऊन वरचा मजला गाठला आणि आता पुढचे १४ दिवस त्याच एका खोलीत राहायचे आहे, असे गौरव यांनी सांगितले.१४ दिवसानंतर आईला करकचून मिठी मारीन : गौरव अंबारेतब्बल आठ महिन्यानंतर आई दिसली. मात्र, सगळ्यांचे आरोग्य महत्त्वाचे. होम क्वारंटाईनचा काळ गेल्यावर तिला करकचून मिठी मारणार आहे. या दोन महिन्याच्या काळात करायला काहीच नव्हते. पुस्तकांचे वाचन आणि घरच्यांची आठवण, हाच विषय होता. दरम्यान, एका आॅनलाईन वेबसिरिजमध्ये काम केले. त्यात सगळेच नागपूरचे असल्याने नागपूरला कधी पोहोचतो असे झाले होते, अशी भावना गौरव अंबारे यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस