शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

हे दोन महिने कुटुंबापासून विरहवेदनेचे ! जालंधर ते नागपूर प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 11:22 IST

जालंधर येथील आंतरराष्ट्रीय लवली युनिव्हर्सिटीमध्ये नाट्यशिक्षक असलेले युवा रंगकर्मी प्रा. गौरव अंबारे कोरोनाच्या सावटात तेथेच अडकले आणि तब्बल आठ महिन्यानंतर नागपूरला परतले आहेत. त्यांनी या प्रवासाचा थरारक अनुभव ‘लोकमत’कडे व्यक्त केला.

ठळक मुद्देभयाचा, संशयाचा अन् चिकित्सेचा, स्वत:ला केले ‘होम क्वारंटाईन’

प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ध्येयविहीन परिस्थिती निर्माण झाली तर माणूस सर्वार्थाने एकटा पडतो आणि कुटुंबीयांच्या आठवणींचा कळवळा सुटतो. अशा तळमळीने ग्रासलेल्या मजुरांचे थवे दिसत आहेतच. कोरोनामुळे मानवाच्या मनस्थितीची अशीच दशा थोड्याफार फरकाने दिसून येत आहे. जालंधर येथील आंतरराष्ट्रीय लवली युनिव्हर्सिटीमध्ये नाट्यशिक्षक असलेले युवा रंगकर्मी प्रा. गौरव अंबारे कोरोनाच्या सावटात तेथेच अडकले आणि तब्बल आठ महिन्यानंतर नागपूरला परतले आहेत. त्यांनी या प्रवासाचा थरारक अनुभव ‘लोकमत’कडे व्यक्त केला.शैक्षणिक सत्र आटोपण्यापूर्वीच कोरोनामुळे संपूर्ण देश टाळेबंदीत आला. युनिव्हर्सिटीलाही हा काळ जाईपर्यंत टाळे बसले आणि गौरव विद्यापीठाच्या वसतिगृहात एकलेच बंदिस्त झाले. अशा स्थितीत नागपूरला जाण्याची संधी मिळाली होती. मात्र, आसामचा एक सहकारी प्राध्यापक एकटा पडेल म्हणून ती संधी गौरव यांनी गमावली. त्याच्या राज्यातून त्याला बोलावणे आल्यावर गौरव यांनी पंजाब सरकारला नागपूरला जाण्याच्या व्यवस्थेचे पत्र पाठवले आणि त्या अनुषंगाने सरकारी आरोग्य पथकाकडून त्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी झाली. दहा-बारा दिवसानंतर नागपूरच्या प्रवासाचा मुहूर्त ठरला आणि हा प्रवास अत्यंत भयाचा, संशयाचा, चिकित्सेचा आणि तेवढाच उत्सुकतेचा होता, हे आज नागपुरात उतरल्यानंतर गौरव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ट्रान्सपोर्ट यंत्रणा अर्थात बसस्थानक, रेल्वे, विमानतळ हे सदैव माणसाच्या धावपळीने फुलले असते. मात्र, २७ मे रोजी जेव्हा ते जालंधर बसस्थानकावर पोहोचले तेव्हा बसथानकावर कमालीची स्मशान शांतता दिसली. तेथून दुपारी अमृतसर विमानतळावर पोहोचलो तेव्हा विमानतळ जणू हॉस्पिटलमध्ये परावर्तित झाल्याचा भास झाला. फॉर्म भरून देणे, सॅनिटाईझ करणे, मास्क देणे आणि फ्लाईटचा वेळ होईपर्यंत एकटे बसून राहणे ही प्रक्रिया विमानतळावर होती. रात्री अमृतसरहून दिल्ली विमानतळावर उतरलो तर आणखीनच कठीण प्रक्रिया सुरू झाल्या आणि एवढे मोठ्ठे विमानतळ एखाद्या भयपटाला शोभेल अशा स्थितीत दिसून आले. जो-तो पीपीई किटमध्ये होता आणि दर अर्ध्या तासाने स्क्रिनिंग व चाचपणी होत होती. साधारण ७ तास दिल्ली विमानतळावर घालविल्यानंतर २८ मे रोजी सकाळी ६.३०च्या फ्लाईटमध्ये बसलो तेव्हा जीवात जीव आला आणि ८ वाजता नागपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर पुन्हा फॉर्म भरून द्यावा लागला आणि हातावर ११ जूनपर्यंत ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का बसला. सोबतच शंभर नंबरवर पोलिसांना माहिती दिल्यानंतर घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यावर तब्बल आठ महिन्यानंतर आई व इतरांचे दर्शन झाले. केवळ मुखदर्शन घेऊन वरचा मजला गाठला आणि आता पुढचे १४ दिवस त्याच एका खोलीत राहायचे आहे, असे गौरव यांनी सांगितले.१४ दिवसानंतर आईला करकचून मिठी मारीन : गौरव अंबारेतब्बल आठ महिन्यानंतर आई दिसली. मात्र, सगळ्यांचे आरोग्य महत्त्वाचे. होम क्वारंटाईनचा काळ गेल्यावर तिला करकचून मिठी मारणार आहे. या दोन महिन्याच्या काळात करायला काहीच नव्हते. पुस्तकांचे वाचन आणि घरच्यांची आठवण, हाच विषय होता. दरम्यान, एका आॅनलाईन वेबसिरिजमध्ये काम केले. त्यात सगळेच नागपूरचे असल्याने नागपूरला कधी पोहोचतो असे झाले होते, अशी भावना गौरव अंबारे यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस