शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

हे दोन महिने कुटुंबापासून विरहवेदनेचे ! जालंधर ते नागपूर प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 11:22 IST

जालंधर येथील आंतरराष्ट्रीय लवली युनिव्हर्सिटीमध्ये नाट्यशिक्षक असलेले युवा रंगकर्मी प्रा. गौरव अंबारे कोरोनाच्या सावटात तेथेच अडकले आणि तब्बल आठ महिन्यानंतर नागपूरला परतले आहेत. त्यांनी या प्रवासाचा थरारक अनुभव ‘लोकमत’कडे व्यक्त केला.

ठळक मुद्देभयाचा, संशयाचा अन् चिकित्सेचा, स्वत:ला केले ‘होम क्वारंटाईन’

प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ध्येयविहीन परिस्थिती निर्माण झाली तर माणूस सर्वार्थाने एकटा पडतो आणि कुटुंबीयांच्या आठवणींचा कळवळा सुटतो. अशा तळमळीने ग्रासलेल्या मजुरांचे थवे दिसत आहेतच. कोरोनामुळे मानवाच्या मनस्थितीची अशीच दशा थोड्याफार फरकाने दिसून येत आहे. जालंधर येथील आंतरराष्ट्रीय लवली युनिव्हर्सिटीमध्ये नाट्यशिक्षक असलेले युवा रंगकर्मी प्रा. गौरव अंबारे कोरोनाच्या सावटात तेथेच अडकले आणि तब्बल आठ महिन्यानंतर नागपूरला परतले आहेत. त्यांनी या प्रवासाचा थरारक अनुभव ‘लोकमत’कडे व्यक्त केला.शैक्षणिक सत्र आटोपण्यापूर्वीच कोरोनामुळे संपूर्ण देश टाळेबंदीत आला. युनिव्हर्सिटीलाही हा काळ जाईपर्यंत टाळे बसले आणि गौरव विद्यापीठाच्या वसतिगृहात एकलेच बंदिस्त झाले. अशा स्थितीत नागपूरला जाण्याची संधी मिळाली होती. मात्र, आसामचा एक सहकारी प्राध्यापक एकटा पडेल म्हणून ती संधी गौरव यांनी गमावली. त्याच्या राज्यातून त्याला बोलावणे आल्यावर गौरव यांनी पंजाब सरकारला नागपूरला जाण्याच्या व्यवस्थेचे पत्र पाठवले आणि त्या अनुषंगाने सरकारी आरोग्य पथकाकडून त्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी झाली. दहा-बारा दिवसानंतर नागपूरच्या प्रवासाचा मुहूर्त ठरला आणि हा प्रवास अत्यंत भयाचा, संशयाचा, चिकित्सेचा आणि तेवढाच उत्सुकतेचा होता, हे आज नागपुरात उतरल्यानंतर गौरव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ट्रान्सपोर्ट यंत्रणा अर्थात बसस्थानक, रेल्वे, विमानतळ हे सदैव माणसाच्या धावपळीने फुलले असते. मात्र, २७ मे रोजी जेव्हा ते जालंधर बसस्थानकावर पोहोचले तेव्हा बसथानकावर कमालीची स्मशान शांतता दिसली. तेथून दुपारी अमृतसर विमानतळावर पोहोचलो तेव्हा विमानतळ जणू हॉस्पिटलमध्ये परावर्तित झाल्याचा भास झाला. फॉर्म भरून देणे, सॅनिटाईझ करणे, मास्क देणे आणि फ्लाईटचा वेळ होईपर्यंत एकटे बसून राहणे ही प्रक्रिया विमानतळावर होती. रात्री अमृतसरहून दिल्ली विमानतळावर उतरलो तर आणखीनच कठीण प्रक्रिया सुरू झाल्या आणि एवढे मोठ्ठे विमानतळ एखाद्या भयपटाला शोभेल अशा स्थितीत दिसून आले. जो-तो पीपीई किटमध्ये होता आणि दर अर्ध्या तासाने स्क्रिनिंग व चाचपणी होत होती. साधारण ७ तास दिल्ली विमानतळावर घालविल्यानंतर २८ मे रोजी सकाळी ६.३०च्या फ्लाईटमध्ये बसलो तेव्हा जीवात जीव आला आणि ८ वाजता नागपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर पुन्हा फॉर्म भरून द्यावा लागला आणि हातावर ११ जूनपर्यंत ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का बसला. सोबतच शंभर नंबरवर पोलिसांना माहिती दिल्यानंतर घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यावर तब्बल आठ महिन्यानंतर आई व इतरांचे दर्शन झाले. केवळ मुखदर्शन घेऊन वरचा मजला गाठला आणि आता पुढचे १४ दिवस त्याच एका खोलीत राहायचे आहे, असे गौरव यांनी सांगितले.१४ दिवसानंतर आईला करकचून मिठी मारीन : गौरव अंबारेतब्बल आठ महिन्यानंतर आई दिसली. मात्र, सगळ्यांचे आरोग्य महत्त्वाचे. होम क्वारंटाईनचा काळ गेल्यावर तिला करकचून मिठी मारणार आहे. या दोन महिन्याच्या काळात करायला काहीच नव्हते. पुस्तकांचे वाचन आणि घरच्यांची आठवण, हाच विषय होता. दरम्यान, एका आॅनलाईन वेबसिरिजमध्ये काम केले. त्यात सगळेच नागपूरचे असल्याने नागपूरला कधी पोहोचतो असे झाले होते, अशी भावना गौरव अंबारे यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस