शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अजनीवन वाचवणार, ‘आयएमएस’चा आराखडाही बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 11:07 IST

Nagpur News अजनी येथे होणाऱ्या ‘आयएमएस’ला (इंटरमॉडेल स्टेशन) वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून प्रचंड विरोध सुरू झाला आहे. ही बाब लक्षात घेता आता ‘आयएमएस’च्या आराखड्यातच बदल करण्याचे ठरविण्यात आले आहे.

ठळक मुद्देरेल्वे कॉलनीचे पुनर्वसन करणार अजनीचा ब्रिटिशकालीन पूलदेखील तुटणार

प्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अजनी येथे होणाऱ्या ‘आयएमएस’ला (इंटरमॉडेल स्टेशन) वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून प्रचंड विरोध सुरू झाला आहे. ही बाब लक्षात घेता आता ‘आयएमएस’च्या आराखड्यातच बदल करण्याचे ठरविण्यात आले आहे. नवीन आराखडा तयार करण्यात येणार असून यात जास्तीत जास्त झाडे कशी वाचतील यावर भर राहणार आहे. याशिवाय प्रकल्पासाठी जी झाडे हटविणे आवश्यक असेल, त्यांचे प्रकल्पातीलच मोकळ्या जागेत प्रत्यारोपण करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. अजनी वनातील झाडांची नियोजित कत्तल व त्यामुळे पर्यावरणाला निर्माण होणारा धोका याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने प्रकाश टाकला हे विशेष.

अजनी वनासाठी होणारा विरोध लक्षात घेत आयएमएस प्रकल्पाला गती देण्यासाठी ३१ जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. ‘आयएमएस’ प्रकल्पासाठी रेल्वे २०० एकर जागा देणार आहे. या प्रकल्पासाठी सिंचन, मेडिकल विभाग, मध्यवर्ती कारागृह, ‘एफसीआय’ यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. याशिवाय जी झाडे हटविणे अनिवार्य असेल त्यांचे प्रत्यारोपण एकतर प्रकल्पातील मोकळी जागा किंवा रिंगरोडवर करण्यात येईल. पुढील दोन महिन्यांत नवीन आराखडा तयार होईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

‘नीरी’तील जागा घेणार नाही

या प्रकल्पासाठी ‘नीरी’ची जवळपास दोन एकर जागा मागण्याचा ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांचा मानस होता. मात्र गडकरी यांनी त्याला विरोध केला आहे. ही जागा अधिग्रहित करण्याची आवश्यकता नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

रेल्वे कर्मचाऱ्यांना तिप्पट सुविधा देणार

या प्रकल्पासाठी रेल्वेकडून २०० एकरची जागा देण्यात येणार आहे. यात रेल्वे कर्मचारी राहत असलेले ‘क्वार्टर’देखील तुटणार आहेत. मात्र रेल्वे कॉलनीचे पुनर्वसन करण्यात येईल. या संदर्भात लवकरच जागा निश्चित करण्यात येणार आहे. त्यावर अगोदर नवीन ‘क्वार्टर्स’ बनतील. कर्मचाऱ्यांना तिप्पट सुविधा मिळतील अशा प्रकारचे पुनर्वसन असेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. अजनी येथील ब्रिटीशकालीन पूलदेखील तोडण्यात येईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

‘मिहान’मध्ये ‘कार्गो हब’ नको

एकेकाळी गाजावाजा करण्यात आलेल्या ‘मिहान’ येथील ‘कार्गो हब’बाबत गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले. शहराची सीमा वाढत असल्याने आता त्याला जास्त प्रोत्साहन देण्याची आवश्यकता नाही. विमानापुरते ते ठीक आहे. सिंदी रेल्वे येथे ‘लॉजिस्टिक हब’ उभारण्यात येत आहे. त्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यानंतर ‘इलेक्ट्रिक कार’नेच प्रवास

नागपुरात आल्यानंतर मी ‘बुलेटप्रुफ’ कारने प्रवास करतो. मात्र प्रदूषण कमी व्हावे यासाठी यापुढे ‘इलेक्ट्रीक कार’नेच प्रवास करीन. इतर लोकप्रतिनिधींनीदेखील ‘इलेक्ट्रिक’ वाहने वापरावीत, असे आवाहन गडकरी यांनी केले. दिल्ली-मुंबई येथील महामार्गाचा प्रकल्प अर्धा झाला; मात्र महापालिकेला महालातील केळीबाग मार्गावरील रस्ता बनविणे अद्यापही जमलेले नाही. मात्र मी पुढे महालातच राहायला जाईल, असे म्हणत गडकरी यांनी मनपाच्या पदाधिकाऱ्यांना चिमटा काढला.

‘आयएमएस’च्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

- ‘आयएमएस’मध्ये स्वस्त दरात भोजन देणारे ‘फूड मॉल्स’ उभारणार

- एस टी, शहरबस, खाजगी बससाठी ‘आयएमएस’ मध्यवर्ती केंद्र राहणार

- प्रकल्पात वापरण्यात येणाऱा ‘जेसीबी’ डिझेलऐवजी ‘सीएनजी’वर चालणार

-‘आयएमएस’पासून शहराबाहेर जाण्यासाठी कमीत कमी सिग्नल लागतील अशी व्यवस्था उभारणार

-‘आयएमएस’मधील सुधारणांसाठी जनतेकडून सूचना मागविणार

-पहिल्या टप्प्यासाठी बाराशे कोटींच्या निधीची मंजुरी

- प्रकल्पामुळे शहरातील १० हजार तरुणांना रोजगार मिळणार.

 

टॅग्स :Metroमेट्रो