शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

पालघर हत्याकांडात जातीय राजकारण होणे दुर्दैवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:09 IST

पालघर सामूहिक हत्याकांडाच्या निमित्ताने काही लोक जातीचे राजकारण करत आहेत. कोरोनाशी अवघे राज्य लढा देत असताना असे राजकारण करणे ही दुर्दैवी बाब आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे ८ तासात १०१ जण घेतले ताब्यात, तपास सीआयडीकडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पालघर सामूहिक हत्याकांडाच्या निमित्ताने काही लोक जातीचे राजकारण करत आहेत. प्रत्यक्षात अटक करण्यात आलेल्या १०१ आरोपींमध्ये एकही मुस्लिम बांधव नाही. काही लोक जाणूनबुजून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाशी अवघे राज्य लढा देत असताना असे राजकारण करणे ही दुर्दैवी बाब आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. बुधवारी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही भावना व्यक्त केली.पालघर येथे हत्याकांड झाल्यानंतर ८ तासात पोलिसांनी १०१ आरोपींना ताब्यात घेतले. हा आदिवासी बहुल भाग आहे. मुलं पळविणारी टोळी आल्याच्या अफवेतून हा प्रकार घडला. या घटनेचा तपास स्पेशल आयजी व सीआयडीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या हत्याकांडाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. ही वेळ सवार्नी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आहे. पण काही लोक मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत आहेत, असे गृहमंत्री म्हणाले.वाधवान कुटुंबियांना सीबीआयकडे देणारगृहमंत्र्यांनी वाधवान कुटुंबियांबाबत शासनाची भूमिका मांडली. वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वरला जायची परवानगी देणे ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची मोठी चूक होती. आज त्या कुटुंबियांचा अलगिकरणाचा कालावधी संपतो आहे. त्यामुळे ईडी आणि सीबीआयला तसे आम्ही पत्र लिहून कळविले आहे व ताब्यात घेण्याची विनंती केली आहे, असेदेखील गृहमंत्र्यांनी सांगितले. मागील कालावधीत काही लोक लंडन किंवा इतर देशात पळून गेले. आम्ही मात्र जोपर्यंत सीबीआय येत नाही, तोपर्यंत वाधवान कुटुंबाला आमच्या ताब्यात ठेऊ, असा टोलादेखील त्यांनी लगावला.

टॅग्स :palgharपालघरAnil Deshmukhअनिल देशमुख