शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
4
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
5
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? एसबीआय करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
6
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
7
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
8
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
9
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
10
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
11
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
12
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
13
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
14
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
15
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
16
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
17
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
18
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
19
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
20
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण

पालघर हत्याकांडात जातीय राजकारण होणे दुर्दैवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:09 IST

पालघर सामूहिक हत्याकांडाच्या निमित्ताने काही लोक जातीचे राजकारण करत आहेत. कोरोनाशी अवघे राज्य लढा देत असताना असे राजकारण करणे ही दुर्दैवी बाब आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे ८ तासात १०१ जण घेतले ताब्यात, तपास सीआयडीकडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पालघर सामूहिक हत्याकांडाच्या निमित्ताने काही लोक जातीचे राजकारण करत आहेत. प्रत्यक्षात अटक करण्यात आलेल्या १०१ आरोपींमध्ये एकही मुस्लिम बांधव नाही. काही लोक जाणूनबुजून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाशी अवघे राज्य लढा देत असताना असे राजकारण करणे ही दुर्दैवी बाब आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. बुधवारी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही भावना व्यक्त केली.पालघर येथे हत्याकांड झाल्यानंतर ८ तासात पोलिसांनी १०१ आरोपींना ताब्यात घेतले. हा आदिवासी बहुल भाग आहे. मुलं पळविणारी टोळी आल्याच्या अफवेतून हा प्रकार घडला. या घटनेचा तपास स्पेशल आयजी व सीआयडीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या हत्याकांडाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. ही वेळ सवार्नी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आहे. पण काही लोक मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत आहेत, असे गृहमंत्री म्हणाले.वाधवान कुटुंबियांना सीबीआयकडे देणारगृहमंत्र्यांनी वाधवान कुटुंबियांबाबत शासनाची भूमिका मांडली. वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वरला जायची परवानगी देणे ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची मोठी चूक होती. आज त्या कुटुंबियांचा अलगिकरणाचा कालावधी संपतो आहे. त्यामुळे ईडी आणि सीबीआयला तसे आम्ही पत्र लिहून कळविले आहे व ताब्यात घेण्याची विनंती केली आहे, असेदेखील गृहमंत्र्यांनी सांगितले. मागील कालावधीत काही लोक लंडन किंवा इतर देशात पळून गेले. आम्ही मात्र जोपर्यंत सीबीआय येत नाही, तोपर्यंत वाधवान कुटुंबाला आमच्या ताब्यात ठेऊ, असा टोलादेखील त्यांनी लगावला.

टॅग्स :palgharपालघरAnil Deshmukhअनिल देशमुख