शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

पालघर हत्याकांडात जातीय राजकारण होणे दुर्दैवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:09 IST

पालघर सामूहिक हत्याकांडाच्या निमित्ताने काही लोक जातीचे राजकारण करत आहेत. कोरोनाशी अवघे राज्य लढा देत असताना असे राजकारण करणे ही दुर्दैवी बाब आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे ८ तासात १०१ जण घेतले ताब्यात, तपास सीआयडीकडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पालघर सामूहिक हत्याकांडाच्या निमित्ताने काही लोक जातीचे राजकारण करत आहेत. प्रत्यक्षात अटक करण्यात आलेल्या १०१ आरोपींमध्ये एकही मुस्लिम बांधव नाही. काही लोक जाणूनबुजून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाशी अवघे राज्य लढा देत असताना असे राजकारण करणे ही दुर्दैवी बाब आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. बुधवारी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही भावना व्यक्त केली.पालघर येथे हत्याकांड झाल्यानंतर ८ तासात पोलिसांनी १०१ आरोपींना ताब्यात घेतले. हा आदिवासी बहुल भाग आहे. मुलं पळविणारी टोळी आल्याच्या अफवेतून हा प्रकार घडला. या घटनेचा तपास स्पेशल आयजी व सीआयडीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या हत्याकांडाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. ही वेळ सवार्नी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आहे. पण काही लोक मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत आहेत, असे गृहमंत्री म्हणाले.वाधवान कुटुंबियांना सीबीआयकडे देणारगृहमंत्र्यांनी वाधवान कुटुंबियांबाबत शासनाची भूमिका मांडली. वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वरला जायची परवानगी देणे ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची मोठी चूक होती. आज त्या कुटुंबियांचा अलगिकरणाचा कालावधी संपतो आहे. त्यामुळे ईडी आणि सीबीआयला तसे आम्ही पत्र लिहून कळविले आहे व ताब्यात घेण्याची विनंती केली आहे, असेदेखील गृहमंत्र्यांनी सांगितले. मागील कालावधीत काही लोक लंडन किंवा इतर देशात पळून गेले. आम्ही मात्र जोपर्यंत सीबीआय येत नाही, तोपर्यंत वाधवान कुटुंबाला आमच्या ताब्यात ठेऊ, असा टोलादेखील त्यांनी लगावला.

टॅग्स :palgharपालघरAnil Deshmukhअनिल देशमुख