शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सांडपाणी निगराणीतून कोरोना फैलावाची तपासणी शक्य : प्रा. मनीष कुमार यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 23:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात प्रत्येकाची कोरोना चाचणी करणे शक्य नाही. मात्र सांडपाण्याच्या ...

ठळक मुद्देनीरीतर्फे ऑनलाईन व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात प्रत्येकाची कोरोना चाचणी करणे शक्य नाही. मात्र सांडपाण्याच्या तपासणीतून कोरोना विषाणूच्या सामूहिक फैलावाची व्यापकता तपासणे शक्य होऊ शकते, असा विश्वास भारतीय प्रौद्योगिकी संस्था (आयआयटी), गांधीनगरच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे प्रा. मनीष कुमार यांनी व्यक्त केला.राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (सीएसआरआय-नीरी)च्या वतीने राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे औचित्य साधून ‘जलीय पर्यावरणात कोरोना विषाणूचे स्थानांतरण आणि सांडपाणी निगराणी’ विषयावर आयोजित आॅनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था, लखनौचे वैज्ञानिक प्रा. अशोक पांडेय, नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार व नीरीच्या जलवायू परिवर्तन व कौशल विकास विभागाचे प्रमुख व मुख्य वैज्ञानिक डॉ. जे. एस. पांडेय हेही आॅनलाईन सहभागी झाले. प्रा. मनीष कुमार म्हणाले, सांडपाणी निगराणी तंत्र नवीन नाही. पोलियोच्या समूळ उच्चाटनासाठी आपण या तंत्राचा उपयोग केला आहे. त्यांनी सांगितले, अपशिष्ट जल महामारी विज्ञान हे कोविड चाचणीचे प्रभावी माध्यम आहे. एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित असेल तर त्याच्या मलोत्सर्गातून त्याची तपासणी केली जाऊ शकते. सांडपाणी तपासताना जिवंत विषाणू नाही तर त्यामधील केवळ विषाणूचे आनुवंशिक पदार्थ (आरएनए) तपासणी केली जाते. विषाणूच्या आरएनएच्या चाचणीसाठी सांडपाण्यातील नमुन्यांची जीन सिक्वेन्सिंग करावी लागते. म्हणून सामूहिक फैलाव तपासण्यासाठी सांडपाण्याची नियमित तपासणी व्हायला हवी, असे ते म्हणाले.प्रा. अशोक पांडेय यांनीही कोरोनाचा सामूहिक संसर्ग तपासणीसाठी सांडपाणी निगराणी तंत्राचे समर्थन केले. डॉ. राकेश कुमार यांनी कोरोना महामारीत नीरीच्या कामाची माहिती दिली. निगराणी, रोगनिदान, उपचार, रुग्णालयासाठी आवश्यक उपकरण, सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक या बिंदूवर नीरीचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नीरीच्या पर्यावरण विज्ञान व संशोधन पत्रिका वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अधिकारी आणि विद्यार्थी आॅनलाईन सहभागी झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtechnologyतंत्रज्ञान