शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

आता खुल्या मिठाईवर उत्पादन तारखेचे लेबल लावणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 20:49 IST

मिठाई अथवा कोणत्याही खाद्यान्नाच्या पॅकिंगवर उत्पादन तारीख आणि या तारखेपूर्वी खाण्यास योग्य (बेस्ट बिफोर) असे छापणे बंधनकारक आहे. पण आता हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये विकल्या जाणाऱ्या खुल्या मिठाईच्या ट्रेवर उत्पादन तारीख आणि बेस्ट बिफोरचे लेबल लावण्याचे बंधन १ ऑगस्टपासून येणार आहे.

ठळक मुद्दे१ ऑगस्टपासून सक्ती : अन्न सुरक्षा व मानके कायदा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिठाई अथवा कोणत्याही खाद्यान्नाच्या पॅकिंगवर उत्पादन तारीख आणि या तारखेपूर्वी खाण्यास योग्य (बेस्ट बिफोर) असे छापणे बंधनकारक आहे. पण आता हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये विकल्या जाणाऱ्या खुल्या मिठाईच्या ट्रेवर उत्पादन तारीख आणि बेस्ट बिफोरचे लेबल लावण्याचे बंधन १ ऑगस्टपासून येणार आहे. त्यामुळे मिठाईत भेसळ वा निकृष्ट दर्जाची असल्याचा ग्राहकांकडून होणारा आरोप या निमित्ताने थांबणार आहे.केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार हा नियम १ ऑगस्टपासून देशात बंधनकारक होणार आहे. हा नियम १ जूनपासून लागू होणार होता, पण लॉकडाऊनचा कालावधी वेळोवेळी वाढल्याने हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद आहेत. त्यामुळे हा नियम १ ऑगस्टपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुरशीयुक्त वा निकृष्ट मिठाईच्या तक्रारींवर आता विराम बसणार आहे.मिठाई खाण्यास अयोग्य असल्याच्या तक्रारी अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे येत आहेत. या तक्रारी मुख्यत्वे दिवाळी आणि अन्य सणांच्या काळात जास्त येतात. अशावेळी विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी नमुने घेऊन दर्जा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवितात. नमुन्याचा अहवाल प्राप्त होण्यास अनेक महिने लागतात. या प्रक्रियेपासून आता सुटकारा मिळणार आहे. खुल्या मिठाईची उत्पादन तारीख आणि कोणत्या तारखेपर्यंत खाण्यास योग्य आहे, ही बाब ग्राहकांना कळत नव्हती. खरेदीनंतर ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या. पण आता खुल्या मिठाईवर उत्पादन तारीख आणि या तारखेपर्यंत खाण्यास योग्य असल्याचा लेबल लावणे बंधनकारक केल्याने ग्राहकांनाही खरेदी सोपी झाली आहे.सणांदरम्यान गर्दीचा फायदा घेऊन काही विक्रेते खाण्यास अयोग्य असलेली मिठाई विकतात, अशा ग्राहकांच्या तक्रारी आहेत. खुल्या मिठाईवर उत्पादन तारीख व वापराच्या अंतिम मुदतीच्या तारखेचा उल्लेख नसल्याने ग्राहकही ताज्या आणि खराब मिठाईची ओळख करू शकत नाही. निकृष्ट दर्जाच्या मिठाईच्या सेवनाने तब्येत बिघडणे, उलट्या, डोकेदुखीचा त्रास होतो.कायद्यात १ लाखापर्यंत दंडअन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत खुल्या मिठाईवर उत्पादन तारीख आणि सेवनासाठी या तारखेपूर्वी योग्य असल्याचे लेबल हॉटेल्स आणि रेस्टॉरंट संचालकांना लावणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकांना हायजेनिक मिठाई मिळेल. यामुळे विक्रेते व खरेदीदारांना फायदा होणार आहे. या कायद्याचे पालन न करणाऱ्यांना १ लाखापर्यंत दंडाची तरतूद आहे.शरद कोलते, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागnagpurनागपूर