शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

आता खुल्या मिठाईवर उत्पादन तारखेचे लेबल लावणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 20:49 IST

मिठाई अथवा कोणत्याही खाद्यान्नाच्या पॅकिंगवर उत्पादन तारीख आणि या तारखेपूर्वी खाण्यास योग्य (बेस्ट बिफोर) असे छापणे बंधनकारक आहे. पण आता हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये विकल्या जाणाऱ्या खुल्या मिठाईच्या ट्रेवर उत्पादन तारीख आणि बेस्ट बिफोरचे लेबल लावण्याचे बंधन १ ऑगस्टपासून येणार आहे.

ठळक मुद्दे१ ऑगस्टपासून सक्ती : अन्न सुरक्षा व मानके कायदा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिठाई अथवा कोणत्याही खाद्यान्नाच्या पॅकिंगवर उत्पादन तारीख आणि या तारखेपूर्वी खाण्यास योग्य (बेस्ट बिफोर) असे छापणे बंधनकारक आहे. पण आता हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये विकल्या जाणाऱ्या खुल्या मिठाईच्या ट्रेवर उत्पादन तारीख आणि बेस्ट बिफोरचे लेबल लावण्याचे बंधन १ ऑगस्टपासून येणार आहे. त्यामुळे मिठाईत भेसळ वा निकृष्ट दर्जाची असल्याचा ग्राहकांकडून होणारा आरोप या निमित्ताने थांबणार आहे.केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार हा नियम १ ऑगस्टपासून देशात बंधनकारक होणार आहे. हा नियम १ जूनपासून लागू होणार होता, पण लॉकडाऊनचा कालावधी वेळोवेळी वाढल्याने हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद आहेत. त्यामुळे हा नियम १ ऑगस्टपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुरशीयुक्त वा निकृष्ट मिठाईच्या तक्रारींवर आता विराम बसणार आहे.मिठाई खाण्यास अयोग्य असल्याच्या तक्रारी अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे येत आहेत. या तक्रारी मुख्यत्वे दिवाळी आणि अन्य सणांच्या काळात जास्त येतात. अशावेळी विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी नमुने घेऊन दर्जा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवितात. नमुन्याचा अहवाल प्राप्त होण्यास अनेक महिने लागतात. या प्रक्रियेपासून आता सुटकारा मिळणार आहे. खुल्या मिठाईची उत्पादन तारीख आणि कोणत्या तारखेपर्यंत खाण्यास योग्य आहे, ही बाब ग्राहकांना कळत नव्हती. खरेदीनंतर ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या. पण आता खुल्या मिठाईवर उत्पादन तारीख आणि या तारखेपर्यंत खाण्यास योग्य असल्याचा लेबल लावणे बंधनकारक केल्याने ग्राहकांनाही खरेदी सोपी झाली आहे.सणांदरम्यान गर्दीचा फायदा घेऊन काही विक्रेते खाण्यास अयोग्य असलेली मिठाई विकतात, अशा ग्राहकांच्या तक्रारी आहेत. खुल्या मिठाईवर उत्पादन तारीख व वापराच्या अंतिम मुदतीच्या तारखेचा उल्लेख नसल्याने ग्राहकही ताज्या आणि खराब मिठाईची ओळख करू शकत नाही. निकृष्ट दर्जाच्या मिठाईच्या सेवनाने तब्येत बिघडणे, उलट्या, डोकेदुखीचा त्रास होतो.कायद्यात १ लाखापर्यंत दंडअन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत खुल्या मिठाईवर उत्पादन तारीख आणि सेवनासाठी या तारखेपूर्वी योग्य असल्याचे लेबल हॉटेल्स आणि रेस्टॉरंट संचालकांना लावणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकांना हायजेनिक मिठाई मिळेल. यामुळे विक्रेते व खरेदीदारांना फायदा होणार आहे. या कायद्याचे पालन न करणाऱ्यांना १ लाखापर्यंत दंडाची तरतूद आहे.शरद कोलते, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागnagpurनागपूर