शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

कोणत्या पक्षात जायचे ते निश्चित नाही, वाटले तर स्वत:चा पक्ष काढेन; नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 20:55 IST

आता गुजरातमध्ये जाऊन मोदींनी ओबीसींच्या विकासासाठी काय केले, याचा हिशेब मागेल. सार्वजनिक मंचावरून त्यांच्या जातीची ‘व्हॅलिडीटी’ मागेल, असे आव्हान पटोले यांनी दिले.

ठळक मुद्देमोदींना सार्वजनिक व्यासपीठावरून त्यांच्या जातीची ‘व्हॅलिडीटी’ मागणार

आॅनलाईन लोकमतनागपूर : भाजपाचे सदस्यत्व आणि लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट आव्हान देण्याचे ठरविले आहे. जातीच्या मुद्द्यावरुन मोदी गुजरातमध्ये मते मागत आहेत. मात्र ‘ओबीसीं’च्या मुद्द्यावर आपण प्रश्न विचारला असता मोदी यांचा तिळपापड झाला होता. ते आपल्यावर भडकले होते. आता गुजरातमध्ये जाऊन मोदींनी ओबीसींच्या विकासासाठी काय केले, याचा हिशेब मागेल. सार्वजनिक मंचावरून त्यांच्या जातीची ‘व्हॅलिडीटी’ मागेल, असे आव्हान पटोले यांनी दिले.शुक्रवारी रात्री नागपुरात आल्यानंतर शनिवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्र, छत्तीसगडच्या खासदारांच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची वागणूक ही योग्य नव्हती. शेतकरी, ओबीसी समाज यांच्याबद्दल प्रश्न विचारले असता मोदी माझ्यावर भडकले. आता त्याच ओबीसी समाजाचा आधार घेऊन ते मते मागत आहेत. बैठकीनंतर गडकरी यांनीही माझ्यासोबत बोलताना नाराजी व्यक्त केली होती, असा दावाही त्यांनी केला. या बैठकीत मोदींनी आणखीही काही खासदारांना दरडावले होते. त्यांची नावे उघड केली तर त्यांच्या ‘नोकऱ्या’जातील, असेही त्यांनी सांगितले. मोदींनी नेहमीच दबावतंत्राचा वापर केला. ११ डिसेंबर रोजी गुजरातमध्ये जाऊन मोदींचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार आहे, ‘आगे आगे देखिये, होता है क्या’, असा इशाराही त्यांनी दिला.भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षात जायचे हे अद्याप निश्चित केलेले नाही. गुजरातमध्ये काँग्रेस भाजपाला टक्कर देत असल्यामुळे आपण तेथे काँग्रेसच्या प्रचारासाठी जात आहोत. राहुल गांधींशी चर्चाही करणार आहोत. मात्र, पुढील राजकीय वाटचालीबाबत जनमत घेऊनच निर्णय घेऊ. वाटले तर स्वत:चा पक्ष काढेल, असे सूचक वक्तव्यही पटोले यांनी केले.

मुंडे असते तर वेगळे चित्र असतेगोपीनाथ मुंडे व नितीन गडकरी यांच्यामुळे मी भाजपमध्ये आलो होतो. आज मुंडे असते तर त्यांनी अशी वेळच येऊ दिली नसती. त्यांनी काही ना काही मार्ग नक्कीच शोधून काढला असता, असे नाना पटोले म्हणाले. दरम्यान, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना मालेगाव प्रकरणाशी संबंधित काही माहिती द्यायची होती. मात्र त्यांची वेळच मिळू शकली नाही, असेदेखील त्यांनी सांगितले.

वेगळ्या विदर्भावरही रोखले भाजपाने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. याच आधारवर आपण संसदेत वेगळ्या विदर्भाचे विधेयक सादर केले. मात्र, त्यावेळीही आपल्याला मोदींची बोलणी खावी लागली. विधेयक संसदेत सादरच करू दिले नाही, असा आरोप पटोले यांनी केला. आता जनमताचा कौल घेऊन, विदर्भवादी नेत्यांच्या भेटी घेऊन विदर्भाच्या लढ्याबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोले