शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

कोणत्या पक्षात जायचे ते निश्चित नाही, वाटले तर स्वत:चा पक्ष काढेन; नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 20:55 IST

आता गुजरातमध्ये जाऊन मोदींनी ओबीसींच्या विकासासाठी काय केले, याचा हिशेब मागेल. सार्वजनिक मंचावरून त्यांच्या जातीची ‘व्हॅलिडीटी’ मागेल, असे आव्हान पटोले यांनी दिले.

ठळक मुद्देमोदींना सार्वजनिक व्यासपीठावरून त्यांच्या जातीची ‘व्हॅलिडीटी’ मागणार

आॅनलाईन लोकमतनागपूर : भाजपाचे सदस्यत्व आणि लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट आव्हान देण्याचे ठरविले आहे. जातीच्या मुद्द्यावरुन मोदी गुजरातमध्ये मते मागत आहेत. मात्र ‘ओबीसीं’च्या मुद्द्यावर आपण प्रश्न विचारला असता मोदी यांचा तिळपापड झाला होता. ते आपल्यावर भडकले होते. आता गुजरातमध्ये जाऊन मोदींनी ओबीसींच्या विकासासाठी काय केले, याचा हिशेब मागेल. सार्वजनिक मंचावरून त्यांच्या जातीची ‘व्हॅलिडीटी’ मागेल, असे आव्हान पटोले यांनी दिले.शुक्रवारी रात्री नागपुरात आल्यानंतर शनिवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्र, छत्तीसगडच्या खासदारांच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची वागणूक ही योग्य नव्हती. शेतकरी, ओबीसी समाज यांच्याबद्दल प्रश्न विचारले असता मोदी माझ्यावर भडकले. आता त्याच ओबीसी समाजाचा आधार घेऊन ते मते मागत आहेत. बैठकीनंतर गडकरी यांनीही माझ्यासोबत बोलताना नाराजी व्यक्त केली होती, असा दावाही त्यांनी केला. या बैठकीत मोदींनी आणखीही काही खासदारांना दरडावले होते. त्यांची नावे उघड केली तर त्यांच्या ‘नोकऱ्या’जातील, असेही त्यांनी सांगितले. मोदींनी नेहमीच दबावतंत्राचा वापर केला. ११ डिसेंबर रोजी गुजरातमध्ये जाऊन मोदींचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार आहे, ‘आगे आगे देखिये, होता है क्या’, असा इशाराही त्यांनी दिला.भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षात जायचे हे अद्याप निश्चित केलेले नाही. गुजरातमध्ये काँग्रेस भाजपाला टक्कर देत असल्यामुळे आपण तेथे काँग्रेसच्या प्रचारासाठी जात आहोत. राहुल गांधींशी चर्चाही करणार आहोत. मात्र, पुढील राजकीय वाटचालीबाबत जनमत घेऊनच निर्णय घेऊ. वाटले तर स्वत:चा पक्ष काढेल, असे सूचक वक्तव्यही पटोले यांनी केले.

मुंडे असते तर वेगळे चित्र असतेगोपीनाथ मुंडे व नितीन गडकरी यांच्यामुळे मी भाजपमध्ये आलो होतो. आज मुंडे असते तर त्यांनी अशी वेळच येऊ दिली नसती. त्यांनी काही ना काही मार्ग नक्कीच शोधून काढला असता, असे नाना पटोले म्हणाले. दरम्यान, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना मालेगाव प्रकरणाशी संबंधित काही माहिती द्यायची होती. मात्र त्यांची वेळच मिळू शकली नाही, असेदेखील त्यांनी सांगितले.

वेगळ्या विदर्भावरही रोखले भाजपाने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. याच आधारवर आपण संसदेत वेगळ्या विदर्भाचे विधेयक सादर केले. मात्र, त्यावेळीही आपल्याला मोदींची बोलणी खावी लागली. विधेयक संसदेत सादरच करू दिले नाही, असा आरोप पटोले यांनी केला. आता जनमताचा कौल घेऊन, विदर्भवादी नेत्यांच्या भेटी घेऊन विदर्भाच्या लढ्याबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोले