शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

विकास आराखड्यामध्ये दुरुस्ती करून दीक्षाभूमी विस्ताराला जमीन देणे शक्य

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: April 10, 2025 19:01 IST

Nagpur : याचिकाकर्ते ॲड. शैलेश नारनवरे यांचा हायकोर्टात अर्ज

नागपूर : आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमी स्मारकाचा विस्तार करण्यासाठी मागण्यात येत असलेली जमीन शहराच्या विकास आराखड्यामध्ये दुरुस्ती करून दिली जाऊ शकते, अशी माहिती जनहित याचिकाकर्ते ॲड. शैलेश नारनवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाला दिली आहे.

दीक्षाभूमीच्या विस्ताराकरिता आरोग्य विभागाची १६.४४ एकर व कापूस संशोधन संस्थानची ३.८४ एकर जमीन मागितली जात आहे. ४ सप्टेंबर २०२४ रोजी न्यायालयाने ही जमीन दीक्षाभूमीला कशी मिळवून दिली जाऊ शकते, याची कायदेशीर माहिती ॲड. नारनवरे यांना मागितली होती. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात दिवाणी अर्ज दाखल केला आहे. शहराच्या नियोजन प्राधिकरणला महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायद्यातील कलम ३७ अनुसार विकास आराखड्यामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. त्यांतर्गत संबंधित जमीन धार्मिक व सांस्कृतिक उद्देशाकरिता आरक्षित करून दीक्षाभूमीला वाटप केली जाऊ शकते. दीक्षाभूमी राष्ट्रीय महत्व असलेले धार्मिक व ऐतिहासिक स्मारक असून भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांची येथे येण्याची संख्या सतत वाढत आहे. दीक्षाभूमीला अतिरिक्त जमीन मिळाल्यास तेथे अनुयायांकरिता आवश्यक सुविधा विकसित करता येतील. शेगाव, शिर्डी व पंढरपूर तीर्थक्षेत्रांचा विकास अशाच पद्धतीने करण्यात आला आहे. मूलभूत व धार्मिक अधिकार लक्षात घेताही दीक्षाभूमीचा तातडीने विकास करणे गरजेचे आहे, असे ॲड. नारनवरे यांनी अर्जात म्हटले आहे. 

२०१८ पासून जनहित याचिका प्रलंबितदीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता ॲड. नारनवरे यांनी डिसेंबर-२०१८ मध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. दीक्षाभूमी येथे दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिवस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिवस यासह विविध कार्यक्रम होतात. त्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येत अनुयायी येतात. परंतु, या ठिकाणी निवास, भोजन, स्वच्छतागृह, परिवहन इत्यादी आवश्यक सुविधा नसल्यामुळे अनुयायांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे, असे जनहित याचिकेत नमूद केले आहे.

याचिकेमुळे विकास आराखडा तयार

या प्रकरणात न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आवश्यक आदेशांमुळे दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यावर तीन टप्प्यांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २०० कोटी रुपयांची कामे केली जात आहेत. त्यामध्ये स्तुप विस्तारीकरण, सीमा भिंत, गेट कॉम्प्लेक्स, वॉच टॉवर, शौचालये, पिण्याचे पाणी, कार्यक्रम व्यासपीठ, जलसाठा टाकी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प इत्यादी कामांचा समावेश आहे.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालयDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी