शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कॅन्टीनमध्ये पदार्थांमध्ये असलेल्या तेल आणि साखरेच्या प्रमाणाचे फलक लावणे बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 17:00 IST

लठ्ठपणाविरोधात केंद्राची नवी पॉलिसी : 'एम्स'सह सर्व कार्यालयांत लागणार 'आरोग्य बोर्ड'

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या कार्यालयांमधील कॅन्टीनमध्ये आता कर्मचाऱ्यांची गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. कारण, आदेश आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने सर्व केंद्रीय कार्यालये, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसह (एम्स) सर्व रुग्णालये आणि शिक्षण संस्थांना त्यांच्या कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या सामोसा, कचोरी, गुलाबजाम यांसारख्या पदार्थांमध्ये असलेल्या तेल आणि साखरेच्या प्रमाणाचे फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. लठ्ठपणावर नियंत्रण मिळवण्यासाठी उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, शहरी भागातील पाचपैकी एक प्रौढ व्यक्ती लठ्ठपणाने ग्रस्त आहे. 'द लान्सेट जीबीडी २०२१'च्या अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, २०२१ मध्ये भारतातील लठ्ठ आणि जास्त वजन असलेल्या प्रौढांची संख्या १८ कोटी होती, जी २०५० पर्यंत ४४.९ कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असेल. लठ्ठपणामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल आणि वंध्यत्व यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. लठ्ठपणा साथीच्या रोगाप्रमाणे वेगाने पसरत आहे, ही चिंताजनक बाब आहे. 

एका गुलाबजाममध्ये पाच चमचे साखरज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी एका उदाहरणातून या फलकांच्या गरजेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, गुलाबजाम समोर आला की, आपण कुठलाही विचार न करता खाऊन घेतो. परंतु, अनेकांना हे माहीत नसते की, एका गुलाबजाममध्ये जवळपास पाच चमचे साखर असते. त्यामुळे खाद्यपदार्थ खाताना असे फलक आरोग्याचा इशारा देणारे ठरतील. 

'तेल-साखर बोर्ड'ची अशी असेल संकल्पनाया पार्श्वभूमीवर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व केंद्रीय संस्थांना त्यांच्या कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांखाली त्यात असलेले तेल आणि साखरेच्या प्रमाणाचे बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत. या 'आरोग्य बोर्ड'मुळे खाद्यपदार्थांमध्ये लपलेली चरबी आणि साखर उघड होईल, ज्यामुळे ग्राहक अधिक जागरूक होतील. 

पंतप्रधानांच्या 'फिट इंडिया'चे पुढचे पाऊलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २०२५ मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाच्या उद्घाटन प्रसंगी 'फिट इंडिया' मोहिमेचा उल्लेख करत नागरिकांना सक्रिय आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले होते. 'मन की बात'मध्ये त्यांनी तेलाचा वापर १० टक्के कमी करण्याचे आवाहन केले होते. याची सुरुवात आता केंद्र शासनाच्या कॅन्टीनमधून झाल्याचे बोलले जात आहे.

सूचना आल्यावर लागतील बोर्ड'एम्स' नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी सांगितले, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे 'आरोग्य बोर्ड' लावण्याचे पत्र प्राप्त झाले असले, तरी यासंदर्भात स्पष्ट सूचना यायच्या आहेत. त्या मिळताच कॅन्टीनमध्ये संबंधित फलक लागतील.

'काय खातो याचा विचार होईल'कार्डिओलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अमर आमले यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, केंद्राच्या या नव्या आदेशामुळे सामान्य माणसाला आपण काय खातो आणि त्याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, याची जाणीव होईल. खाद्यपदार्थांखालील हे फलक प्रत्येक ठिकाणी असणे गरजेचे आहे.

टॅग्स :nagpurनागपूर