शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

वकिलांनी गुंडशाही करणे अशोभनीय; उच्च न्यायालयाने टोचले कान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2022 21:58 IST

Nagpur News सत्कारावरून वाद विकोपाला गेल्यानंतर, यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील वकिलांच्या दोन गटाने एकमेकांना जबर मारहाण केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या कृतीची अतिशय गंभीर दखल घेऊन कडक ताशेरे ओढले.

नागपूर : बदली झालेल्या प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या सत्कारावरून वाद विकोपाला गेल्यानंतर, यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील वकिलांच्या दोन गटाने एकमेकांना जबर मारहाण केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वकिलांच्या या कृतीची अतिशय गंभीर दखल घेऊन कडक ताशेरे ओढले. वकिली हा खूप प्रतिष्ठित व उच्च दर्जाचा व्यवसाय आहे. त्यामुळे वकिलांनी अशी गुंडशाही करणे या व्यवसायाकरिता अशोभनीय व निंदनीय आहे, असे परखड मत न्यायालयाने व्यक्त केले.

संबंधित वकिलांची कृती प्रतिष्ठा धुळीस मिळविणारी आहे. या क्षेत्रातील पूर्वज महान होते. त्यांनी कायदे व न्यायव्यवस्थेचा विकास आणि समाजाच्या कल्याणाकरिता उल्लेखनीय याेगदान दिले. वकिलांची न्यायालय, पक्षकार व समाज या तिघांसोबत बांधिलकी असते. परंतु, संबंधित वकिलांनी या कर्तव्याची पायमल्ली केली. या कृतीतून समाजापुढे कोणता आदर्श ठेवला गेला, यावर प्रत्येकाने विचारमंथन करावे. वकिलांचा दर्जा खालावत चालल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. वकिलांनी सतत ज्ञानार्जन व कौशल्य वृद्धीचा विचार केला पाहिजे. त्यांना न्याय दंडाधिकाऱ्यांच्या सत्काराविषयी चिंता करण्याची गरज नाही, असेही न्यायालयाने सुनावले.

११ वकिलांविरुद्ध गुन्हे दाखल

ही घटना २६ मे २०२२ रोजी घडली. त्यानंतर वकिलांनी २८ मे २०२२ रोजी पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारी नोंदविल्या. एका तक्रारीवरून पाच तर, दुसऱ्या तक्रारीवरून सहा वकिलांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, या वकिलांनी आपसी सहमतीने वाद संपवला व गुन्हे रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले होते.

२.७५ लाख रुपये दावा खर्च

उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता वकिलांविरुद्धचे गुन्हे रद्द केले. परंतु, त्याकरिता प्रत्येक वकिलावर २५ हजार, याप्रमाणे एकूण २ लाख ७५ हजार रुपये दावा खर्च बसवला, तसेच भविष्यात पुन्हा अशी कृती करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. दावा खर्चाची रक्कम चार आठवड्यामध्ये यवतमाळ जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले. दावा खर्च व प्रतिज्ञापत्र न दिल्यास, गुन्हे रद्द करण्याचा आदेश आपोआप निष्प्रभ होईल, असेही स्पष्ट करण्यात आले. न्यायमूर्तीद्वय मनीष पितळे व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय