शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

त्या ६६१६ विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे बेकायदेशीर

By admin | Updated: June 18, 2014 01:27 IST

प्रवेशबंदीच्या यादीतील ६३ महाविद्यालयांतल्या ६६१६ विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेणे बेकायदेशीर आहे, असा दावा करणारा दिवाणी अर्ज मूळ याचिकाकर्ते प्रा. सुनील मिश्रा यांनी आज, मंगळवारी मुंबई

नागपूर : प्रवेशबंदीच्या यादीतील ६३ महाविद्यालयांतल्या ६६१६ विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेणे बेकायदेशीर आहे, असा दावा करणारा दिवाणी अर्ज मूळ याचिकाकर्ते प्रा. सुनील मिश्रा यांनी आज, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केला.याप्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ११ जून रोजी राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने प्रवेशबंदीच्या यादीतील ६३ महाविद्यालयांतल्या ६६१६ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा आदेश जारी केला आहे. आदेशावर उपसचिव आर.जी. जाधव यांची स्वाक्षरी आहे. हा आदेश अवैध असल्याचे मिश्रा यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम ८(४) अन्वये प्रकरणाची चौकशी केल्याशिवाय शासनाला असा आदेश काढता येत नाही. महाविद्यालय व्यवस्थापकांशी संगनमत करून हा आदेश काढण्यात आला असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला आहे. यापूर्वीचे उपसचिव रसाळ यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करून शैक्षणिक गुणवत्तेशी जडजोड करणार नाही, असे आश्वासन दिले होते. शासनाच्या नवीन आदेशाने हे आश्वासन फोल ठरविले आहे, असे मिश्रा यांनी न्यायालयाला सांगितले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने २४ जून रोजी दुपारी २.३० वाजता पुढील सुनावणी निश्चित करून यादरम्यान नागपूर विद्यापीठाला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.तत्पूर्वी याप्रकरणात आणखी एका नवीन वकिलाचे पदार्पण झाले. वरिष्ठ वकील एम.जी. भांगडे विद्यार्थ्यांच्या वतीने आखाड्यात उतरले. त्यांनी विद्वत् परिषदेच्या ४ मार्चच्या प्रस्तावासह विविध बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत ६६१६ विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यापीठातर्फे वरिष्ठ वकील ए. एम. गोरडे यांनी परीक्षेची वेळ निघून गेल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर भांगडे यांनी विशेष परीक्षा घेण्याची मागणी केली. नागपूर विद्यापीठाने एकही मान्यताप्राप्त पूर्णवेळ प्राध्यापक नसलेल्या २५० महाविद्यालयांना विद्यार्थी प्रवेशास बंदी केली आहे. यानंतरही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. विद्वत् परिषदेच्या ४ मार्चच्या बैठकीत विविध निर्णय घेऊन प्रस्ताव पारित करण्यात आला होता. २५० पैकी ७९ महाविद्यालयांनी प्राध्यापक नियुक्त केले असून यातील ६३ महाविद्यालयांतील ६६१६ विद्यार्थ्यांचे प्रवेश वैध आहेत. तसेच, ९६ महाविद्यालयांना प्राध्यापक नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ मेपर्यंत वेळ देण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाने बैठकीनंतर न्यायालयाला दिली होती.