शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

त्या ६६१६ विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे बेकायदेशीर

By admin | Updated: June 18, 2014 01:27 IST

प्रवेशबंदीच्या यादीतील ६३ महाविद्यालयांतल्या ६६१६ विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेणे बेकायदेशीर आहे, असा दावा करणारा दिवाणी अर्ज मूळ याचिकाकर्ते प्रा. सुनील मिश्रा यांनी आज, मंगळवारी मुंबई

नागपूर : प्रवेशबंदीच्या यादीतील ६३ महाविद्यालयांतल्या ६६१६ विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेणे बेकायदेशीर आहे, असा दावा करणारा दिवाणी अर्ज मूळ याचिकाकर्ते प्रा. सुनील मिश्रा यांनी आज, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केला.याप्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ११ जून रोजी राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने प्रवेशबंदीच्या यादीतील ६३ महाविद्यालयांतल्या ६६१६ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा आदेश जारी केला आहे. आदेशावर उपसचिव आर.जी. जाधव यांची स्वाक्षरी आहे. हा आदेश अवैध असल्याचे मिश्रा यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम ८(४) अन्वये प्रकरणाची चौकशी केल्याशिवाय शासनाला असा आदेश काढता येत नाही. महाविद्यालय व्यवस्थापकांशी संगनमत करून हा आदेश काढण्यात आला असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला आहे. यापूर्वीचे उपसचिव रसाळ यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करून शैक्षणिक गुणवत्तेशी जडजोड करणार नाही, असे आश्वासन दिले होते. शासनाच्या नवीन आदेशाने हे आश्वासन फोल ठरविले आहे, असे मिश्रा यांनी न्यायालयाला सांगितले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने २४ जून रोजी दुपारी २.३० वाजता पुढील सुनावणी निश्चित करून यादरम्यान नागपूर विद्यापीठाला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.तत्पूर्वी याप्रकरणात आणखी एका नवीन वकिलाचे पदार्पण झाले. वरिष्ठ वकील एम.जी. भांगडे विद्यार्थ्यांच्या वतीने आखाड्यात उतरले. त्यांनी विद्वत् परिषदेच्या ४ मार्चच्या प्रस्तावासह विविध बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत ६६१६ विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यापीठातर्फे वरिष्ठ वकील ए. एम. गोरडे यांनी परीक्षेची वेळ निघून गेल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर भांगडे यांनी विशेष परीक्षा घेण्याची मागणी केली. नागपूर विद्यापीठाने एकही मान्यताप्राप्त पूर्णवेळ प्राध्यापक नसलेल्या २५० महाविद्यालयांना विद्यार्थी प्रवेशास बंदी केली आहे. यानंतरही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. विद्वत् परिषदेच्या ४ मार्चच्या बैठकीत विविध निर्णय घेऊन प्रस्ताव पारित करण्यात आला होता. २५० पैकी ७९ महाविद्यालयांनी प्राध्यापक नियुक्त केले असून यातील ६३ महाविद्यालयांतील ६६१६ विद्यार्थ्यांचे प्रवेश वैध आहेत. तसेच, ९६ महाविद्यालयांना प्राध्यापक नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ मेपर्यंत वेळ देण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाने बैठकीनंतर न्यायालयाला दिली होती.