शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 21:00 IST

येत्या आर्थिक वर्षात आपणास वीज ग्राहकांना अचूक देयक देण्यासोबतच मागणी वाढवायची आहे. वीज देयकाची व्यवस्था अचूकपणे अमलात आणल्यास वीज ग्राहकांना चुकीचे देयक जाणार नाहीत, ही सामूहिक जबाबदारी आहे, असे महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सांगितले.

ठळक मुद्देप्रादेशिक संचालक खंडाईत : उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : येत्या आर्थिक वर्षात आपणास वीज ग्राहकांना अचूक देयक देण्यासोबतच मागणी वाढवायची आहे. वीज देयकाची व्यवस्था अचूकपणे अमलात आणल्यास वीज ग्राहकांना चुकीचे देयक जाणार नाहीत, ही सामूहिक जबाबदारी आहे, असे महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सांगितले.नागपूर परिमंडळच्यावतीने २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करण्याऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यात आला. महावितरणच्या बिजली नगर विश्रामगृहाच्या हिरवळीवर हा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख, नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, शहर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता मनीष वाठ, वर्धा मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता उमेश शहारे, विधी सल्लागार ताराचंद लालवानी, सहायक महाव्यस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात उपस्थित होते.नागपूर परिमंडळ कार्यालयाने दररोज चार थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची योजना नोव्हेंबर-२०१७ पासून अमलात आणली याचे चांगले परिणाम मागील आर्थिक वर्षात दिसल्याचेही खंडाईत म्हणाले.यावेळी नागपूर परिमंडलातील मौदा उपविभागाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या शिवाय प्रत्येक उपविभागातील दोन जनमित्र, शहरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येकी दोन विभाग, प्रत्येक उपविभातील लेखा विभागातील लिपिक, शंभर टक्के मागणी वसूल करणारे शाखा अभियंता यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय मानकर, पी.एन. गुन्नाले, उपकार्यकारी अभियंता प्रफुल वैद्य, वैभव नारखेडे, गुणसागर नाईक, प्रशांत उईके, सहायक लेखापाल कुंदन शंभरकर, अनिल पिसे, पिरूसिंग राठोड, मनीष क्षीरसागर, महेश नायडू, विलास सत्रे यांच्यासह ६७ जनमित्रांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.संचालन मधुसूदन मराठे यांनी केले तर कार्यकारी अभियंता वंदना परिहार यांनी आभार मानले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर