शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

पाणी पुरवठ्यातील कपातीचा मुद्दा मनपाच्या सभेत गाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:24 IST

मान्सून रुसल्याने प्रकल्पांनी तळ गाठला आहे. यामुळे शहराच्या ८० टक्के भागामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सत्तापक्षाने घेतला आहे. विरोधी पक्षातील सदस्यांसोबत चर्चा न करता हा निर्णय परस्पर झाल्याने विरोधी बाकावरून प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे. त्यामुळे २३ जुलैला होणाऱ्या विशेष सभेमध्ये चर्चेचा हाच मुख्य मुद्दा करण्याच्या तयारीला विरोधी पक्ष लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मान्सून रुसल्याने प्रकल्पांनी तळ गाठला आहे. यामुळे शहराच्या ८० टक्के भागामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सत्तापक्षाने घेतला आहे. विरोधी पक्षातील सदस्यांसोबत चर्चा न करता हा निर्णय परस्पर झाल्याने विरोधी बाकावरून प्रचंड असंतोष व्यक्त होत आहे. त्यामुळे २३ जुलैला होणाऱ्या विशेष सभेमध्ये चर्चेचा हाच मुख्य मुद्दा करण्याच्या तयारीला विरोधी पक्ष लागला आहे.मंगळवारी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे पाणी पुरवठ्यातील कपातीचा मुद्दा उचलणार आहेत. अशातच सोमवारी विरोधी पक्षातील नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या मुख्यालयात याच विषयावरून बराच गोंधळ घातला. यावरून विरोधकांची व्यूहरचना स्पष्ट दिसत आहे. वनवे म्हणाले, पाणी पुरवठ्याच्या नियोजनात सत्तापक्ष पर्णपणे चुकला आहे. उन्हाळ्याच्या दिवसातच या समस्येचे नियोजन केले असते तर आज ही वेळ आली नसती. लिकेजमुळे अर्धे पाणी वाया जात आहे. लिकेज दुरुस्तीचे काम ओसीडब्ल्यूला दिले आहे. मात्र आतापर्यंत फक्त ३४ टक्के पाईपलाईनच बदलण्यात आल्या आहेत. ६६ टक्के पाईपलाईन आजही जुन्याच आहेत. यामुळे लिकेजचा प्रश्न वेळेत निकाली न काढणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater shortageपाणीकपात