शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

दूषित व पाणीटंचाईच्या मुद्यावर नागपूर मनपात विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:10 IST

उन्हाच्या तडाख्यासोबतच शहराच्या विविध भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शहरातील काही वस्त्यात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. नळांना पाणी कमी दाबाने येत आहे. मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन व सत्तापक्षाने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. परंतु अद्याप त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. टंचाईसोबतच दूषित पाण्याच्या मुद्यावरून विरोधक आक्र मक असल्याने शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभेत गाजणार एम्प्रेस मॉलचा मुद्दा : निधी वाटपातही भेदभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाच्या तडाख्यासोबतच शहराच्या विविध भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शहरातील काही वस्त्यात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. नळांना पाणी कमी दाबाने येत आहे. मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन व सत्तापक्षाने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. परंतु अद्याप त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. टंचाईसोबतच दूषित पाण्याच्या मुद्यावरून विरोधक आक्र मक असल्याने शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.सर्व कामकाज बाजूला सारून स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून पाणीटंचाईच्या मुद्यावर चर्चेची मागणी करण्याच्या प्रयत्नात विरोधक आहेत. सत्तापक्षाच्या अनेक नगरसेवकांच्या प्रभागातही पाणीटंचाईची ओरड आहे. परंतु या मुद्यावरून सत्तापक्षाची कोंडी होण्याची शक्यता विचारात घेता पक्षाच्या नगरसेवकांना गुरुवारी बैठकीत सूचना देण्यात आल्या. त्यामुळे टंचाई असली तरी सत्तापक्षाचे नगरसेवक यावर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाही.दूषित पाणीपुरवठा व पाणीटंचाईच्या मुद्यावरून शहरातील विविध भागात आंदोलन करण्यात आले. सभागृहातही या मुद्यावरून सत्तापक्षाला कोंडीत पकडण्याची विरोधकांना संधी आहे. परंतु काँग्रेस दोन गटात विभागली आहे. त्यामुळे टंचाईसोबतच निधी वाटपातील भेदभाव व अन्य महत्त्वाच्या मुद्यावर काँग्रेस संघटित नाही. मध्य नागपुरातील अनेक वस्त्यात पाण्याची टंचाई आहे. नागरिकांनी आंदोलन केले परंतु काँग्रेस संघटित नसल्याने आक्रमणाची धार कमी झाली आहे. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित केला असून यावर ते आक्रमक आहेत.दूषित व कमी दबाने पाणीपुरवठाकन्हान नदीच्या पात्रातील पातळी कमी झाली आहे. यासोबतच शहरातील नळांना पाणी कमी दाबाने येत आहे. मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. २४ बाय ७ योजनेच्या माध्यमातून शहरातील किती भागातील नागरिकांना २४ तास पाणी मिळते, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. मागील महिन्याच्या सर्वसाधारण सभेतही पाण्याचा मुद्दा गाजला होता. शुक्रवारी पुन्हा हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.एम्प्रेस मॉलच्या मुद्यावर दटके आक्रमकगांधीसागर तलावाच्या बाजूला उभारण्यात येत असलेल्या एम्प्रेस सिटीच्या बांधकामाचा वाद कोर्टात सुरू आहे. या प्रकरणात महापालिकेची कोंडी झाली आहे. असे असतानाच माजी महापौर प्रवीण दटके यांनी एम्प्रेस सिटीच्या बांधकामाबाबतचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे एम्प्र्रेस सिटीतील विहिरीत तीन मजुरांचा मृत्यू झाला. याविरोधात नागरिकांनी आंदोलन के ले. या प्रकरणात प्रवीण दटके व रमेश पुणेकर यांच्यासह ७० लोकांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्यामुळे दटके व पुणेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

टॅग्स :WaterपाणीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका