शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

दूषित व पाणीटंचाईच्या मुद्यावर नागपूर मनपात विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:10 IST

उन्हाच्या तडाख्यासोबतच शहराच्या विविध भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शहरातील काही वस्त्यात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. नळांना पाणी कमी दाबाने येत आहे. मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन व सत्तापक्षाने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. परंतु अद्याप त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. टंचाईसोबतच दूषित पाण्याच्या मुद्यावरून विरोधक आक्र मक असल्याने शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभेत गाजणार एम्प्रेस मॉलचा मुद्दा : निधी वाटपातही भेदभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाच्या तडाख्यासोबतच शहराच्या विविध भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शहरातील काही वस्त्यात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. नळांना पाणी कमी दाबाने येत आहे. मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन व सत्तापक्षाने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. परंतु अद्याप त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. टंचाईसोबतच दूषित पाण्याच्या मुद्यावरून विरोधक आक्र मक असल्याने शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.सर्व कामकाज बाजूला सारून स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून पाणीटंचाईच्या मुद्यावर चर्चेची मागणी करण्याच्या प्रयत्नात विरोधक आहेत. सत्तापक्षाच्या अनेक नगरसेवकांच्या प्रभागातही पाणीटंचाईची ओरड आहे. परंतु या मुद्यावरून सत्तापक्षाची कोंडी होण्याची शक्यता विचारात घेता पक्षाच्या नगरसेवकांना गुरुवारी बैठकीत सूचना देण्यात आल्या. त्यामुळे टंचाई असली तरी सत्तापक्षाचे नगरसेवक यावर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाही.दूषित पाणीपुरवठा व पाणीटंचाईच्या मुद्यावरून शहरातील विविध भागात आंदोलन करण्यात आले. सभागृहातही या मुद्यावरून सत्तापक्षाला कोंडीत पकडण्याची विरोधकांना संधी आहे. परंतु काँग्रेस दोन गटात विभागली आहे. त्यामुळे टंचाईसोबतच निधी वाटपातील भेदभाव व अन्य महत्त्वाच्या मुद्यावर काँग्रेस संघटित नाही. मध्य नागपुरातील अनेक वस्त्यात पाण्याची टंचाई आहे. नागरिकांनी आंदोलन केले परंतु काँग्रेस संघटित नसल्याने आक्रमणाची धार कमी झाली आहे. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित केला असून यावर ते आक्रमक आहेत.दूषित व कमी दबाने पाणीपुरवठाकन्हान नदीच्या पात्रातील पातळी कमी झाली आहे. यासोबतच शहरातील नळांना पाणी कमी दाबाने येत आहे. मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. २४ बाय ७ योजनेच्या माध्यमातून शहरातील किती भागातील नागरिकांना २४ तास पाणी मिळते, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. मागील महिन्याच्या सर्वसाधारण सभेतही पाण्याचा मुद्दा गाजला होता. शुक्रवारी पुन्हा हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.एम्प्रेस मॉलच्या मुद्यावर दटके आक्रमकगांधीसागर तलावाच्या बाजूला उभारण्यात येत असलेल्या एम्प्रेस सिटीच्या बांधकामाचा वाद कोर्टात सुरू आहे. या प्रकरणात महापालिकेची कोंडी झाली आहे. असे असतानाच माजी महापौर प्रवीण दटके यांनी एम्प्रेस सिटीच्या बांधकामाबाबतचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे एम्प्र्रेस सिटीतील विहिरीत तीन मजुरांचा मृत्यू झाला. याविरोधात नागरिकांनी आंदोलन के ले. या प्रकरणात प्रवीण दटके व रमेश पुणेकर यांच्यासह ७० लोकांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्यामुळे दटके व पुणेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

टॅग्स :WaterपाणीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका