शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

डाव्या इतिहासकारांमुळेच अयोध्येचा मुद्दा चिघळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:20 IST

डाव्या इतिहासकारांच्या खोटेपणामुळे समाजात गैरसमज पसरत गेले व अयोध्येचा मुद्दा चिघळला, असा आरोप भारतीय पुरातत्त्व विभागातील सेवानिवृत्त प्रादेशिक संचालक के.के.मोहम्मद यांनी केले.

ठळक मुद्दे‘मंथन’च्या व्याख्यानमालेत टाकला अयोध्येच्या उत्खननावर प्रकाश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अयोध्येतील विवादित स्थळी राममंदिर होते याचे भारतीय पुरातत्त्व विभागाला १९७६ साली केलेल्या पहिल्याच उत्खननात पुरावे सापडले होते. परंतु नव्वदीच्या दशकात डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी यासंदर्भात भ्रामक व खोटे दावे केले. त्यांच्या या खोटेपणामुळे समाजात गैरसमज पसरत गेले व अयोध्येचा मुद्दा चिघळला, असा आरोप भारतीय पुरातत्त्व विभागातील सेवानिवृत्त प्रादेशिक संचालक के.के.मोहम्मद यांनी केले. ‘मंथन’तर्फे रविवारी आयोजित व्याख्यानादरम्यान चिटणवीस केंद्र येथे आयोजित ‘भारतीय मंदिरे : संशोधन व पुरातत्त्वीय निष्कर्ष’ या विषयावर ते बोलत होते.१९७६ साली तत्कालीन महासंचालक बी.बी.लाल यांच्या नेतृत्वात अयोध्येतील विवादित स्थळी उत्खनन व पाहणी झाली होती. त्या चमूमध्ये माझादेखील समावेश होता. संबंधित स्थळाची पाहणी केली असता तेथे अगोदर मंदिर होते याचे पुरावे स्पष्टपणे दिसून येत होते. १० ते १२ खांब हे मंदिरांचे होते. शिवाय तेथे अष्टमांगल्य चिन्ह असलेले कलशदेखील कोरलेले दिसून येत होते. परंतु अयोध्या मुद्दा तेव्हा इतका वादात नव्हता. मात्र १९९० च्या जवळपास काही डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी अयोध्येत मंदिर कधीच नव्हते व भारतीय पुरातत्त्व विभागालादेखील काहीच पुरावे मिळाले नाहीत, असे खोटे दावे केले होते. त्यांच्या या खोटेपणामुळे मुद्दा जास्त चिघळला, असे के.के.मोहम्मद यांनी सांगितले. २००३ साली झालेल्या उत्खननानंतर संबंधित स्थळी हिंदू देवदेवता व संस्कृतीशी निगडित २६६ प्रतिमा आढळून आल्या. डाव्या विचारसरणीच्या लोकांचा खोटेपणा उघड झाल्यानंतर त्यांनी तेथे बौद्ध धम्म, जैन धर्म यांचे प्रार्थनास्थळ होते, असे दावे करणे सुरू केले.परंतु वैज्ञानिक अभ्यासातून सत्य समोर आले होते. अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पुराव्यांच्या आधारावर सर्वोत्तम निर्णय दिला आहे. मात्र काही लोक पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत. अशा गोष्टींना पाठिंबा देणाऱ्या ओवैसीसारख्या राजकारण्यांना मुस्लिम जनताच एक दिवस दूर सारेल, असेदेखील ते म्हणाले. यावेळी सतीश सारडा हेदेखील उपस्थित होते.भूतकाळातील चुका स्वीकारायलाच हव्यातभारतामध्ये मुस्लिम शासकांकडून भूतकाळात काही चुका निश्चित झाल्या. मंदिरे पाडण्यात आली. यात गझनी, घोरी यांचा प्रामुख्याने समावेश होता. त्याच चुकांचा स्वीकार करायलाच हवा. मात्र या चुकांचे स्पष्टीकरण देण्याचा अनाठायी प्रयत्न काही लोक करतात. ती बाब उचित नसल्याचे मत के.के.मोहम्मद यांनी व्यक्त केले.हिंदू बहुसंख्य असल्यामुळेच धर्मनिरपेक्षता टिकूनयावेळी के.के.मोहम्मद यांनी धर्मनिरपेक्षतेवरदेखील आपले मत व्यक्त केले. धर्माच्या आधारावर १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. आपल्या देशाने धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार केला. काही लोकांनी समाजात गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतात हिंदू बहुसंख्य प्रमाणात आहेत. त्यामुळेच देशात धर्मनिरपेक्षता टिकून आहे, असे मोहम्मद म्हणाले.अन् डाकू म्हणाले हा चमत्कारचके.के.मोहम्मद यांनी मध्य प्रदेशमधील बटेश्वर येथील ऐतिहासिक मंदिरांचे उत्खनन व त्यांची पुनर्रचना यावरदेखील प्रकाश टाकला. चंबळ खोºयात डाकूंचे साम्राज्य होते. त्यांना विनंती करुन भारतीय पुरातत्त्व विभागाची चमू या कामाला लागली होती. मंदिरे अक्षरश: उद्ध्वस्त झाली होती व त्यांचे अवशेष इतस्तत: विखुरलेले होते.मात्र अखंड प्रयत्नानंतर संपूर्ण मंदिरे जुन्या स्वरुपात उभी झाली. डाकू ज्यावेळी तेथे परत आले तेव्हा खरोखरच हा चमत्कारच झाला असल्याची त्यांची प्रतिक्रिया होती, असे मोहम्मद यांनी सांगितले.

टॅग्स :Ayodhyaअयोध्या