शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

अंबाझरीचे पाणी तुंबण्यासाठी जलपर्णी तर कारणीभूत नाही ना?

By निशांत वानखेडे | Updated: September 27, 2023 18:33 IST

काढलेल्या जलपर्णीचा ढीग काठावरच साचून : तलावातील हिरवा तवंगही यामुळेच

नागपूर : अंबाझरी तलावातील जलपर्णी मोठ्या प्रमाणात काढण्यात आल्यानंतर तो ढीग काठावर तसाच ठेवण्यात आला होता. उन्हामुळे सुकून या जलपर्णीचा तंतूमय लगदा बनला आहे. अंबाझरीच्या ओव्हरफ्लो झालेल्या पाण्यात हिरव्या जलपर्णींसोबत सुकलेल्या जलपर्णींचा लगदाही वाहून गेला. नाल्यांच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात हा लगदा अडकल्याने पाणी तुंबले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शनिवारी अवघ्या काही तासात कोसळलेल्या पावसासोबत पाण्याचा मार्ग रोखून धरणाऱ्या जलपर्णींची भूमिका नाकारता येत नाही. अजूनही अंबाझरीच्या काठावर सुकलेल्या जलपर्णींचे मोठे ढिगारे तसेच आहेत. काही पाण्यासोबत वाहून गेले. याआधी अंबाझरी तलावात जलपर्णी नव्हती. गेल्या वर्षीपासून ती खूप झपाट्याने वाढत असून नियंत्रण न मिळवल्यास ती संपूर्ण तलावच गिळंकृत करेल, अशी भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली. ही वनस्पती वाढल्यामुळेच अलीकडे मोठ्या प्रमाणात तलावाच्या पाण्यात हिरवा तवंग पसरला होता. त्याकडे लोकमतने लक्ष वेधले होते. 

अंबाझरीला मिसळणाऱ्या नाल्यात सोडल्या जाणाऱ्या रसायनयुक्त दूषित पाण्याची समस्या कायम आहे. त्याबाबत केवळ चिंता व्यक्त केली जाते, मात्र उपाययोजना नाही. अंबाझरीत अजूनही मोठ्या प्रमाणात जलपर्णी आहेत. पुन्हा मोठा पाऊस झाल्यास पाणी तुंबण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नालेसफाईसोबतच जलपर्णीचे समूळ उच्चाटन हे देखील मोठे आव्हान उभे ठरले आहे.

टॅग्स :Ambazari Lakeअंबाझरी तलावnagpurनागपूर