शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भारतीय मीडियाचं ध्रुवीकरण झालंय? ANIच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 23:29 IST

Smita Prakash : माध्यमांबाबत सोशल माध्यमांवर नकारात्मक प्रचार-प्रसार होतो. मात्र माध्यमांचे कुठल्याही प्रकारचे ध्रुवीकरण झालेले नाही. माध्यमे कालसुसंगत पद्धतीनेच कार्य करत आहेत, असे प्रतिपादन स्मिता प्रकाश यांनी केले.

भारतीय मीडियाचं ध्रुविकरण झालं आहे का? य मुद्यावर बोलताना लोकमत मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश म्हणाल्या की, ध्रुवीकरण चांगली बाब आहे. कारण आज सगळ्यांकडे मोबाईल आहेत. सोशल मीडिया आहे. कुणालाही कुठल्याही बाबतीत सांगण्यासाठी आमची गरज नाही. 

यावेळी मीडिया आपल्या बातम्या कव्हर करत नाही, या राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपालाही त्यांनी उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, राहुल गांधी म्हणतात की, मीडिया पक्षपाती झालाय, तो माझ्या बातम्या कव्हर करत नाही. मात्र भारत जोडो यात्रेतील एक एक दिवस भारतीय मीडियाने कव्हर केला आहे. राहुल गांधी जेव्हा प्रेस कॉन्फ्ररन्स करतात तेव्हा सर्व वृत्तवाहिन्या ती कव्हर करतात. हा मोदी समर्थक आहे. हा राहुल समर्थक आहे. हा पवार समर्थक आहे, हा ममता समर्थक आहे, असा आरोप करणं सोपं आहे. मात्र आता शिव्या खाऊन खाऊन आमची चामडी घट्ट झाली आहे, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. 

यावेळी परदेशी प्रसारमाध्यमांचा उल्लेख करत स्मिता प्रकाश यांनी सांगितलं की, भारतीय मीडिया आपलं काम करत नाही आहे, अशी वातावरणनिर्मिती परदेशी मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आम्ही बातम्या कव्हर करत नाही, तर सरकारच्या विचारांचं पालनपोषण करत आहोत, असा आरोप होतो. तीन दिवसांपूर्वी टाइम मॅगझिनमध्ये एक बातमी प्रसारित झाली होती. तिचा मुख्य  मुद्दा हा अमृतपाल याला अटक करण्याच्या मोहिमेत झालेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा होता. त्याचं कारण म्हणजे यावेळी इंटरनेट आणि मेसेजिंगवर निर्बंध आणले गेले होते. मात्र या मंडळींना पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीनसारख्या देशात होणाऱ्या अशाच प्रकारांची चिंता नसते, असा टोला त्यांनी लगावला.

माध्यमांबाबत सोशल माध्यमांवर नकारात्मक प्रचार-प्रसार होतो. मात्र माध्यमांचे कुठल्याही प्रकारचे ध्रुवीकरण झालेले नाही. माध्यमे कालसुसंगत पद्धतीनेच कार्य करत आहेत, असे प्रतिपादन स्मिता प्रकाश यांनी केले.

टॅग्स :Mediaमाध्यमेLokmatलोकमत