शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींच्या शहरातच पूल असुरक्षित? १८० कोटींचा पूल, पण सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह!

By शुभांगी काळमेघ | Updated: May 15, 2025 15:51 IST

पायाभूत सुविधांची पोलखोल : नागपूरच्या पुलावर तांत्रिक त्रुटी

शुभांगी काळमेघ नागपूर : नागपूरमधील शांतिनगर आणि कावडीपेठ मधील १८० कोटी रुपये खर्च करून बांधलेला पूल आता सुरक्षिततेच्या दृष्टीने वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. उद्घाटनानंतरच पुलाच्या बांधकामात काही तांत्रिक त्रुटी असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये पुलावरून प्रवास करतांना भीतीचे वातावरण आहे आणि त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात स्थानिक भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आमदार खोपडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यासंदर्भात पत्र लिहून या प्रकल्पाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पुलाच्या बांधकामात झालेल्या त्रुटीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे त्यांनी पात्रात म्हटले आहे. विशेषतः पुलावरील T-पॉइंट हा अपघातांसाठी संवेदनशील रस्ता ठरला असून, वेळेवर याकडे लक्ष न दिल्यास मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.

या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार खोपडे यांनी १८० कोटी रुपयांच्या या  प्रकल्पातील तांत्रिक दोष दूर करून नागरिकांच्या जीवाला धोका राहणार नाही अशे पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

या प्रकरणामुळे नागपूरमधील पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, आणि भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूरNitin Gadkariनितीन गडकरीKrishna Khupdeकृष्णा खोपडे