शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

नागपूर जिल्ह्यात पाणीटंचाईची ३२ कोटींची कामे; मिळाले फक्त ७.३० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 11:12 IST

जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाईची ३२ कोटी रुपयांची कामे झाली. त्यासाठी निधीचा प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला. परंतु शासनाने टंचाईच्या कामाचे फक्त ७.३० कोटी रुपये पाठविले.

ठळक मुद्देदेयके वाटायची कशी ? विभागासमोर प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाईची ३२ कोटी रुपयांची कामे झाली. त्यासाठी निधीचा प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला. परंतु शासनाने टंचाईच्या कामाचे फक्त ७.३० कोटी रुपये पाठविले. कामाच्या पेमेंटसाठी सध्या कंत्राटदारांची विभागात गर्दी होत आहे. अपेक्षित निधी मिळाला नसल्याने कंत्राटदारांची देयके वाटायची कशी? असा सवाल विभागाला पडला आहे.२०१८-१९ चा पाणीटंचाईचा उपाययोजना कार्यक्रम संपल्यानंतर देयके काढण्यासाठी कंत्राटदारांच्या जिल्हा परिषदेत चकरा वाढल्या आहे. जिल्ह्यात यंदा टंचाईची ४३० कामे झाली. त्याची देयके ३२ कोटींची आहे. शासनाकडून अपेक्षित निधी आला नसल्यामुळे कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांना जाब विचारण्यात येत आहे़ कामाची देयके ही एकमुस्त निघत नसल्याने यापुढे कामे करायची की नाही, असा सवालही कंत्राटदार विभागप्रमुखांना विचारत आहे. ही स्थिती अशीच राहिल्यास पुढील काळात पाणीटंचाई उपाययोजनेची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे़ २०१८-१९ या वर्षात झालेल्या टंचाईच्या कामांमध्ये विहीर खोलीकरण, खासगी टँकर, विहीर अधिग्रहण, तात्पुरत्या नळ योजना, प्रगतिपथावरील नळ योजना पूर्ण करणे, नळ योजनांची दुरुस्ती आदी कामांचा समावेश होता़ कंत्राटदारांनी सर्व अंदाजपत्रक स्थानिक पंचायत समितीत सादर केल्यानंतर, निधी मागणीचा प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पाठविण्यात आला़ मात्र, ३२ कोटींच्या मागणीनंतर ७ कोटी ३० लाखांचा निधी आला आहे़ त्यापैकी दोन कोटींची रक्कम वाटण्यात आल्याची माहिती आहे़ या कंत्राटदारांची अर्धेअधिक देयके द्यायची झाल्यास १७ कोटी ३९ लााख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे़ आता कधी निधी येईल, याची कुठलीही शाश्वती नाही़ त्यामुळे कंत्राटदारांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़

टॅग्स :Waterपाणी