शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

नागपूर जिल्ह्यात पाणीटंचाईची ३२ कोटींची कामे; मिळाले फक्त ७.३० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 11:12 IST

जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाईची ३२ कोटी रुपयांची कामे झाली. त्यासाठी निधीचा प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला. परंतु शासनाने टंचाईच्या कामाचे फक्त ७.३० कोटी रुपये पाठविले.

ठळक मुद्देदेयके वाटायची कशी ? विभागासमोर प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाईची ३२ कोटी रुपयांची कामे झाली. त्यासाठी निधीचा प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला. परंतु शासनाने टंचाईच्या कामाचे फक्त ७.३० कोटी रुपये पाठविले. कामाच्या पेमेंटसाठी सध्या कंत्राटदारांची विभागात गर्दी होत आहे. अपेक्षित निधी मिळाला नसल्याने कंत्राटदारांची देयके वाटायची कशी? असा सवाल विभागाला पडला आहे.२०१८-१९ चा पाणीटंचाईचा उपाययोजना कार्यक्रम संपल्यानंतर देयके काढण्यासाठी कंत्राटदारांच्या जिल्हा परिषदेत चकरा वाढल्या आहे. जिल्ह्यात यंदा टंचाईची ४३० कामे झाली. त्याची देयके ३२ कोटींची आहे. शासनाकडून अपेक्षित निधी आला नसल्यामुळे कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांना जाब विचारण्यात येत आहे़ कामाची देयके ही एकमुस्त निघत नसल्याने यापुढे कामे करायची की नाही, असा सवालही कंत्राटदार विभागप्रमुखांना विचारत आहे. ही स्थिती अशीच राहिल्यास पुढील काळात पाणीटंचाई उपाययोजनेची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे़ २०१८-१९ या वर्षात झालेल्या टंचाईच्या कामांमध्ये विहीर खोलीकरण, खासगी टँकर, विहीर अधिग्रहण, तात्पुरत्या नळ योजना, प्रगतिपथावरील नळ योजना पूर्ण करणे, नळ योजनांची दुरुस्ती आदी कामांचा समावेश होता़ कंत्राटदारांनी सर्व अंदाजपत्रक स्थानिक पंचायत समितीत सादर केल्यानंतर, निधी मागणीचा प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पाठविण्यात आला़ मात्र, ३२ कोटींच्या मागणीनंतर ७ कोटी ३० लाखांचा निधी आला आहे़ त्यापैकी दोन कोटींची रक्कम वाटण्यात आल्याची माहिती आहे़ या कंत्राटदारांची अर्धेअधिक देयके द्यायची झाल्यास १७ कोटी ३९ लााख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे़ आता कधी निधी येईल, याची कुठलीही शाश्वती नाही़ त्यामुळे कंत्राटदारांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़

टॅग्स :Waterपाणी