- आनंद डेकाटे
नागपूर - नागपूर विभागातील सिंचन विहिरीच्या धडक कार्यक्रमास शासनाने ३१ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळून अपूर्ण विहिरींची कामे आता वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
नागपूर विभागातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमधील ३८६ अपूर्ण सिंचन विहिरींना मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासनाला पाठविलेल्या पत्रानंतर घेण्यात आला. शासनाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले असून, या सर्व विहिरी ३१ मे २०२६ पूर्वी पूर्ण करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त, नागपूर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, ३१ मे २०२६ नंतर ही योजना पूर्ण झालेली समजली जाईल. तसेच, जून ते सप्टेंबर २०२५ या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे खचलेल्या आणि बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीच्या कामासही शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या साधनांबाबत मोठा दिलासा मिळणार असून शेती उत्पादनात वाढ होईल. महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे हे आमचे उद्दिष्ट असून, सिंचन विहिरींच्या कामांना दिलेली मुदतवाढ ही त्याच दिशेने उचललेले पाऊल आहे.
Web Summary : The irrigation well scheme in Nagpur division gets extended until May 2026, benefiting farmers. 386 incomplete wells across Gadchiroli, Bhandara, Gondia, Chandrapur, Nagpur, and Wardha will be completed. Damaged wells due to excessive rains will also be repaired. This decision aims to boost agricultural production by providing irrigation resources.
Web Summary : नागपुर विभाग में सिंचाई कुआं योजना को मई 2026 तक बढ़ाया गया, जिससे किसानों को लाभ होगा। गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर, नागपुर और वर्धा में 386 अधूरे कुएं पूरे किए जाएंगे। अत्यधिक बारिश के कारण क्षतिग्रस्त कुओं की भी मरम्मत की जाएगी। इस निर्णय का उद्देश्य सिंचाई संसाधनों के माध्यम से कृषि उत्पादन को बढ़ावा देना है।