शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

नागरिकांचा बेजबाबदारपणा: अखेर कळमना भाजीबाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 20:30 IST

कॉटन मार्केट आणि कळमना या शहरातील भाज्यांच्या मुख्य बाजारपेठा बंद करण्याच्या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. याकरिता नागरिकांचा बेजाबदारपणा कारणीभूत ठरला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटक : ग्राहकांनाही पाळावेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कॉटन मार्केट आणि कळमना या शहरातील भाज्यांच्या मुख्य बाजारपेठा बंद करण्याच्या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. याकरिता नागरिकांचा बेजाबदारपणा कारणीभूत ठरला आहे.उत्पादक शेतकरी, व्यापारी, अडतिया, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक ही साखळीच तुटल्याने शेतकऱ्यांना शहरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या किरकोळ बाजारात कवडीमोल भावात भाज्या विकून गावाकडे परत जावे लागेल. ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात भाज्यांची खरेदी करताना गर्दी केल्याने मनपा आयुक्तांना अखेर कठोर निर्णय घ्यावा लागला. बाजारपेठा बंद झाल्याने ग्राहकांना खरेदीसाठी पायपीट करावी लागणार आहे. दारात नियमितपणे सहजरीत्या उपलब्ध होणारा भाजीपाला ग्राहकांना मिळणार नाही. मनपा आयुक्तांच्या निर्णयानंतर कॉटन मार्केट, कळमन्यासह रेशीमबाग मैदान, राजाबाक्षा मैदान, गाडीखाना मैदान, बुधवार बाजार (सोमवारी पेठ) बंद झाले आहेत.कळमना युवा सब्जी अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, कळमना भाजीबाजारात ग्राहकांची गर्दी वाढत असल्याच्या तक्रारीनंतर मनपा आयुक्तांनी बाजार अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय रविवारी घेतला. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दुपारी ४.३० वाजता कळमना बाजारात अडतियांची बैठक घेतली आणि तात्काळ सोमवारपासून बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. पण व्यापारी आणि अडतियांनी बाजू मांडताना रात्री आणि पहाटेपर्यंत शेतकरी भाज्या विक्रीसाठी आणतात. या निर्णयाची माहिती नसल्याने त्यांनी भाज्या कुठे विकाव्यात, हे संकट त्यांच्यापुढे उभे राहणार आहे. त्यामुळे सोमवारी बाजार सुरू ठेवावा, असे त्यांना पटवून देण्यात आले. त्यानंतर मुंढे यांनी सोमवारी बाजार सुरू ठेवून नंतर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयुक्तांच्या पुढील आदेशापर्यंत कळमना भाजीबाजार बंद राहणार असल्याचे गौर यांनी सांगितले.बाजारात गर्दी होत असल्याच्या कारणावरून १२ दिवसांपूर्वी ५० अडतिये व व्यापारी आणि १०० गाड्यांना बाजारात सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्याचे पालन करण्यात येत होते. ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून दारातच भाज्या मिळत असतानाही बेजबाबदारपणे त्यांनी मुख्य बाजारात गर्दी केल्याचा फटका अखेर शेतकऱ्यांना बसला आहे. नागरिकांमुळेच शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. ग्राहकांनी आवश्यक तेवढ्याच भाज्यांची खरेदी करावी, असे गौर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याvegetableभाज्याMarketबाजारnagpurनागपूर