शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

नागरिकांचा बेजबाबदारपणा: अखेर कळमना भाजीबाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 20:30 IST

कॉटन मार्केट आणि कळमना या शहरातील भाज्यांच्या मुख्य बाजारपेठा बंद करण्याच्या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. याकरिता नागरिकांचा बेजाबदारपणा कारणीभूत ठरला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटक : ग्राहकांनाही पाळावेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कॉटन मार्केट आणि कळमना या शहरातील भाज्यांच्या मुख्य बाजारपेठा बंद करण्याच्या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. याकरिता नागरिकांचा बेजाबदारपणा कारणीभूत ठरला आहे.उत्पादक शेतकरी, व्यापारी, अडतिया, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक ही साखळीच तुटल्याने शेतकऱ्यांना शहरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या किरकोळ बाजारात कवडीमोल भावात भाज्या विकून गावाकडे परत जावे लागेल. ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात भाज्यांची खरेदी करताना गर्दी केल्याने मनपा आयुक्तांना अखेर कठोर निर्णय घ्यावा लागला. बाजारपेठा बंद झाल्याने ग्राहकांना खरेदीसाठी पायपीट करावी लागणार आहे. दारात नियमितपणे सहजरीत्या उपलब्ध होणारा भाजीपाला ग्राहकांना मिळणार नाही. मनपा आयुक्तांच्या निर्णयानंतर कॉटन मार्केट, कळमन्यासह रेशीमबाग मैदान, राजाबाक्षा मैदान, गाडीखाना मैदान, बुधवार बाजार (सोमवारी पेठ) बंद झाले आहेत.कळमना युवा सब्जी अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, कळमना भाजीबाजारात ग्राहकांची गर्दी वाढत असल्याच्या तक्रारीनंतर मनपा आयुक्तांनी बाजार अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय रविवारी घेतला. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दुपारी ४.३० वाजता कळमना बाजारात अडतियांची बैठक घेतली आणि तात्काळ सोमवारपासून बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. पण व्यापारी आणि अडतियांनी बाजू मांडताना रात्री आणि पहाटेपर्यंत शेतकरी भाज्या विक्रीसाठी आणतात. या निर्णयाची माहिती नसल्याने त्यांनी भाज्या कुठे विकाव्यात, हे संकट त्यांच्यापुढे उभे राहणार आहे. त्यामुळे सोमवारी बाजार सुरू ठेवावा, असे त्यांना पटवून देण्यात आले. त्यानंतर मुंढे यांनी सोमवारी बाजार सुरू ठेवून नंतर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयुक्तांच्या पुढील आदेशापर्यंत कळमना भाजीबाजार बंद राहणार असल्याचे गौर यांनी सांगितले.बाजारात गर्दी होत असल्याच्या कारणावरून १२ दिवसांपूर्वी ५० अडतिये व व्यापारी आणि १०० गाड्यांना बाजारात सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्याचे पालन करण्यात येत होते. ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून दारातच भाज्या मिळत असतानाही बेजबाबदारपणे त्यांनी मुख्य बाजारात गर्दी केल्याचा फटका अखेर शेतकऱ्यांना बसला आहे. नागरिकांमुळेच शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. ग्राहकांनी आवश्यक तेवढ्याच भाज्यांची खरेदी करावी, असे गौर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याvegetableभाज्याMarketबाजारnagpurनागपूर