शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यावर अमित शाहांना हसू आवलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
2
IND vs SA 2nd Test : पंतनही गमावला टॉस! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
3
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
4
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
5
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
6
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
7
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
8
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
9
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
10
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
11
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
12
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
13
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
14
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
15
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
16
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
17
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
18
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
19
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांचा बेजबाबदारपणा: अखेर कळमना भाजीबाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 20:30 IST

कॉटन मार्केट आणि कळमना या शहरातील भाज्यांच्या मुख्य बाजारपेठा बंद करण्याच्या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. याकरिता नागरिकांचा बेजाबदारपणा कारणीभूत ठरला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटक : ग्राहकांनाही पाळावेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कॉटन मार्केट आणि कळमना या शहरातील भाज्यांच्या मुख्य बाजारपेठा बंद करण्याच्या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. याकरिता नागरिकांचा बेजाबदारपणा कारणीभूत ठरला आहे.उत्पादक शेतकरी, व्यापारी, अडतिया, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक ही साखळीच तुटल्याने शेतकऱ्यांना शहरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या किरकोळ बाजारात कवडीमोल भावात भाज्या विकून गावाकडे परत जावे लागेल. ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात भाज्यांची खरेदी करताना गर्दी केल्याने मनपा आयुक्तांना अखेर कठोर निर्णय घ्यावा लागला. बाजारपेठा बंद झाल्याने ग्राहकांना खरेदीसाठी पायपीट करावी लागणार आहे. दारात नियमितपणे सहजरीत्या उपलब्ध होणारा भाजीपाला ग्राहकांना मिळणार नाही. मनपा आयुक्तांच्या निर्णयानंतर कॉटन मार्केट, कळमन्यासह रेशीमबाग मैदान, राजाबाक्षा मैदान, गाडीखाना मैदान, बुधवार बाजार (सोमवारी पेठ) बंद झाले आहेत.कळमना युवा सब्जी अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, कळमना भाजीबाजारात ग्राहकांची गर्दी वाढत असल्याच्या तक्रारीनंतर मनपा आयुक्तांनी बाजार अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय रविवारी घेतला. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दुपारी ४.३० वाजता कळमना बाजारात अडतियांची बैठक घेतली आणि तात्काळ सोमवारपासून बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. पण व्यापारी आणि अडतियांनी बाजू मांडताना रात्री आणि पहाटेपर्यंत शेतकरी भाज्या विक्रीसाठी आणतात. या निर्णयाची माहिती नसल्याने त्यांनी भाज्या कुठे विकाव्यात, हे संकट त्यांच्यापुढे उभे राहणार आहे. त्यामुळे सोमवारी बाजार सुरू ठेवावा, असे त्यांना पटवून देण्यात आले. त्यानंतर मुंढे यांनी सोमवारी बाजार सुरू ठेवून नंतर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयुक्तांच्या पुढील आदेशापर्यंत कळमना भाजीबाजार बंद राहणार असल्याचे गौर यांनी सांगितले.बाजारात गर्दी होत असल्याच्या कारणावरून १२ दिवसांपूर्वी ५० अडतिये व व्यापारी आणि १०० गाड्यांना बाजारात सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्याचे पालन करण्यात येत होते. ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून दारातच भाज्या मिळत असतानाही बेजबाबदारपणे त्यांनी मुख्य बाजारात गर्दी केल्याचा फटका अखेर शेतकऱ्यांना बसला आहे. नागरिकांमुळेच शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. ग्राहकांनी आवश्यक तेवढ्याच भाज्यांची खरेदी करावी, असे गौर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याvegetableभाज्याMarketबाजारnagpurनागपूर