शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

एप्रिल ते सप्टेंबरमध्ये आयपीपीबीचे १२१ कोटींचे व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 23:38 IST

IPPB transactions, Nagpur news कोरोना महामारीच्या काळात डाक विभागाने लोकसेवेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. इंडियन पोस्टल पेमेंट बँक (आयपीपीबी) ला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून विभागाने एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळात ३ लाख ७२ हजार ९९७ आधार संलग्नित पेमेंट सर्व्हिसद्वारे १२१ कोटी ६४ लाख रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती नागपूर क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी शुक्रवारी दिली.

ठळक मुद्देपोस्टमास्टर जनरल जायभाये यांची माहिती : विभागात उघडली साडेसात लाख आयपीपीबी खाती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना महामारीच्या काळात डाक विभागाने लोकसेवेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. इंडियन पोस्टल पेमेंट बँक (आयपीपीबी) ला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून विभागाने एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळात ३ लाख ७२ हजार ९९७ आधार संलग्नित पेमेंट सर्व्हिसद्वारे १२१ कोटी ६४ लाख रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती नागपूर क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी शुक्रवारी दिली. नागपूर विभागात आतापर्यंत आयपीपीबीची साडेसात लाख बँक खाती उघडल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.भारतीय टपाल विभागातर्फे ९ ते १५ सप्टेंबरदरम्यान चालणाऱ्या ‘राष्ट्रीय  टपाल सप्ताह’ उत्सवाचे आयोजन नागपूर क्षेत्रातर्फे करण्यात आले आहे. यावेळी जायभाये यांनी विभागाच्या प्रगतीची माहिती दिली. पोस्टल जीवन बीमा योजना, सुकन्या समृद्धी योजना, नागरिक बचत योजना ,किसान विकास पत्र यासारख्या योजना खेड्यापाड्यातील सामान्य नागरिकांसाठी लाभदायक असून त्या पोहचविण्यासाठी विभाग प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्त टपाल सेवा नागपूरचे संचालक पवन कुमार डालमिया यांच्याहस्ते प्रचारासाठी कार्यालयीन वाहनांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी सहायक संचालक शशीन राय उपस्थित होते. जायभाये यांनी सादरीकरणातून योजनांची माहिती दिली. नागपूर क्षेत्रात २४९ आधार अद्ययावतीकरण आणि नोंदणी केंद्र असून ३० सप्टेंबरपर्यंत या केंद्रावर ३ लाख ८९ हजार ९७ व्यवहार करण्यात आले. त्यांनी पंचतारांकित गावांच्या योजनेबाबत सांगितले, नागपूर क्षेत्रात सुकन्या योजनेअंतर्गत २८ गावे पूर्ण झाले असून पीएलआय ग्राम म्हणजे संपूर्ण बीमा ग्राम योजनेअंतर्गत २१६ गावे विमा ग्राम म्हणून समाविष्ट झालेली आहेत.५४ हजार पासपोर्ट अर्जावर प्रक्रियापोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांनासुद्धा प्रतिसाद मिळत असून नागपूर लोकसभा क्षेत्रात पासपोर्ट सेवा केन्द्र कार्यरत झाले आहेत. आतापर्यंत या पासपोर्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून ३१ मार्चपर्यंत ५४ हजार ९०४ पारपत्रांच्या अर्जावर प्रक्रिया करण्यात आली आहे.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसnagpurनागपूर