शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

आयपीएलने मोडले बुकींचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 09:58 IST

देश-विदेशातील बुकींसाठी पर्वणी समजला जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)चे अकरावे सीझन मध्य भारतातील बुकींचे कंबरडे मोडणारे ठरले.

ठळक मुद्देअनेकांचे डाव फसलेकोट्यवधींचा फटकामध्य भारतातील बुकी बाजार गारद

नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देश-विदेशातील बुकींसाठी पर्वणी समजला जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)चे अकरावे सीझन मध्य भारतातील बुकींचे कंबरडे मोडणारे ठरले. नागपूर-विदर्भातील बहुतांश बुकींचे पहिल्यांदाच क्रिकेटच्या सामन्यात डाव उलटे पडले. परिणामी अनेकांना कोट्यवधींचे नुकसान झाल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकट्या फिक्सरला या सीझनमध्ये दीडशे कोटींचा फटका बसल्याची जोरदार चर्चा आहे. बहुतांश बुकी कोट्यवधींची रक्कम हरल्यामुळे मध्य भारतातील सट्टाबाजार गारद झाल्याची माहिती संबंधित वर्तुळातून पुढे आली आहे.आयपीएल टी-२० क्रिकेटच्या रणसंग्रामाची सांगता रविवारी २७ मे रोजी झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आणि खासकरून आयपीएलचे सीझन म्हणजे देश-विदेशातील बुकींसाठी पर्वणी समजले जाते. रोज कोट्यवधींची उलाढाल अन् लाखोंची कमाई होत असल्याने बुकी मंडळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची खास तयारी करून ठेवतात. जागोजागी हायटेक अड्डे तयार करून क्रिकेट बेटिंगची व्यवस्था करतात. ठिकठिकाणच्या पंटर्सना लाईन देतात.विशेष म्हणजे, नागपूरचे बुकी देश-विदेशात चर्चेला आहेत. कारण चार वर्षांपूर्वी दिल्ली पोलिसांनी उघड केलेल्या मॅच फिक्सिंगमध्ये श्रीशांत, विंदू दारासिंगसह नागपुरातील सुनील भाटिया, छोटू अग्रवाल, मुन्ना डोले या बुकींसह अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. त्यामुळे येथील बुकी आणि सट्टाबाजाराच्या धक्कादायक नेटवर्कचा खुलासा झाला होता. तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची मॅच फिक्स करणाऱ्यांमध्ये नागपूरचे बुकी असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली होती. त्यानंतर उपराजधानीतील सट्टाबाजार देश-विदेशातील बुकींचे ‘हॉट मार्केट’ असल्याचे आणि येथील बुकी केवळ नागपूर-विदर्भच नव्हे तर मध्य भारतातील क्रिकेटचा सट्टाबाजार संचालित करीत असल्याचे उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर, आयपीएलच्या अकराव्या क्रिकेट संग्रामाची तयारी झाली होती. स्थानिक बुकींनी विविध ठिकाणी लाईन देऊन ठेवली होती. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी यावर्षी नागपूरात नव्हे तर भंडाऱ्यात कंट्रोल रूम उघडली होती. तेथून ते मध्य भारतातील क्रिकेट सट्ट्याचा कारभार संचालित करीत होते. दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, इंदूर, भोपाळ, रायपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धासह थेट गोवा, दुबई आणि बँकॉकमध्ये बसलेल्या बुकींच्याही स्थानिक बुकी निरंतर संपर्कात होते.पहिल्या सामन्याच्या नाणेफेकीपासून नंतरच्या प्रत्येक घडामोडीवर बुकींनी खयवाडी लगवाडी केली होती. पहिल्या २० सामन्यांपर्यंतची स्थिती स्थानिक बुकींसाठी ठिकठाक होती. नंतर मात्र बुकींची अवस्था पिटल्यासारखीच झाली. संबंधित वर्तुळाच्या माहितीनुसार, ६० पैकी ४५ सामन्यांमध्ये डाव उलटे पडल्याने बहुतांश बुकी गारद झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, एकट्या रिंकूला दीडशे कोटींचा फटका बसला. राज, सोनू कामठीचेही कंबरडे मोडले. रम्यासह भंडारा, वर्धा, यवतमाळ, गोंदिया आणि ठिकठिकाणी अड्डे संचालित करणाऱ्या बुकींची कोट्यवधींची हार झाल्याने दाणादाण उडाली.५० टक्के फायनलपूर्वीच आऊट४रविवारी आयपीएलची सांगता झाली. खरेतर फायनलचा सामना बुकीबाजारात सर्वाधिक उलाढालीचा सामना असतो. मात्र, कधी नव्हे एवढी मोठी रक्कम हरल्यामुळे अनेक बुकी हतबल झाले. त्यामुळे रविवारी फायनलच्या सामन्याच्या वेळी मध्यभारतातील सुमारे ५० टक्के बुकी बेटिंगसाठी बसलेच नाहीत. प्रत्यक्ष खयवाडीऐवजी इकडून तिकडे कटिंग करणाऱ्या बुकींनीच फायनलची खयवाडी केली. गेल्या दहा वर्षांत नागपूर-विदर्भातील बुकींना एवढे मोठे नुकसान कधीच सहन करावे लागले नाही, असे एका संबंधिताने लोकमतला सांगितले.

टॅग्स :IPL 2018आयपीएल 2018