शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

एसएनडीएल कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये सामील करून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 23:41 IST

सोमवारी सकाळी एसएनडीएलचे कर्मचारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी पोहोचले. यावेळी कर्मचाऱ्यांनी एसएनडीएल कंपनी नागपुरातून जात असेल तर येथील कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये सामावून घेण्याची विनंती केली. बावनकुळे यांनीही यावेळी कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देऊर्जामंत्र्यांच्या घरी पोहोचले कर्मचारी : संरक्षणाचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने महावितरणला शहरातील जबाबदारी स्वीकारण्याबाबत केलेल्या विनंतीमुळे कर्मचारी घाबरले आहेत. त्यांना आपल्या भविष्याची चिंता सतावू लागली आहे. याच चिंतेने सोमवारी सकाळी एसएनडीएलचे कर्मचारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी पोहोचले. यावेळी कर्मचाऱ्यांनी एसएनडीएल कंपनी नागपुरातून जात असेल तर येथील कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये सामावून घेण्याची विनंती केली. बावनकुळे यांनीही यावेळी कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले.शहरातील तीन डिव्हिजनची वीज वितरणाची व्यवस्था एसएनडीएलकडे आहे. कंपनीने १२ ऑगस्ट रोजी महावितरणला एक पत्र पाठवून कंपनीची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याचे सांगितले आहे. ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्यासही अडचण येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. या पत्राची माहिती होताच कर्मचारी आपल्या भविष्याबाबत घाबरलेले आहेत.त्यांनी सोमवारी ऊर्जामंत्र्यांना आपल्या समस्या सांगत निवेदन सादर केले. त्यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सांगितले की, कंपनी काम सोडून गेल्यास ते बेरोजगार होतील. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षात पगारात कुठलीही वाढ झालेली नाही. त्यांना पीएलपीच्या माध्यमातून १५ ते २० टक्के वेतन दिले जाते. कंपनी व्यवस्थापनातर्फे लिखित आश्वासन मिळाल्यानंतरही त्यांना पीएलपी मिळालेला नाही. त्यामुळे ते आपल्या पगारापासूनही वंचित होत आहेत. त्यांच्याविरुद्ध बदल्याच्या भावनेने कारवाई होऊ नये. ते पूर्ण इमानदारीने काम करू इच्छितात. त्यांना केवळ आपल्या भविष्याची चिंता आहे.प्रादेशिक संचालक ऐकणार समस्याऊर्जामंत्री बावनकुळे यांनी कर्मचाऱ्यांना आश्वस्त केले की, सरकार त्यांच्या हिताचे रक्षण करेल. त्यांनी महावितरणचे कार्यकारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांना फोन करून कर्मचाºयांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.चर्चा योग्य दिशेने सुरूएसएनडीएल कंपनीची महावितरण आणि बँकांसोबत योग्य दिशेने चर्चा सुरू आहे. कंपनी केवळ आपल्या आर्थिक स्थितीबाबत चिंतेत आहे. कंपनीने परिस्थिती पाहून महावितरणला केवळ काही सवलती मागितल्या आहेत. बँकांनाही कमी व्याजावर कर्ज देण्याची विनंती केली आहे. ही चर्चा ज्या दिशेने सुरू आहे त्यावरून परिस्थिती सामान्य होईल, असा विश्वास आहे.सोनल खुराणाबिझनेस हेड , एसएनडीएल

टॅग्स :mahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारी