शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

एसएनडीएल कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये सामील करून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 23:41 IST

सोमवारी सकाळी एसएनडीएलचे कर्मचारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी पोहोचले. यावेळी कर्मचाऱ्यांनी एसएनडीएल कंपनी नागपुरातून जात असेल तर येथील कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये सामावून घेण्याची विनंती केली. बावनकुळे यांनीही यावेळी कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देऊर्जामंत्र्यांच्या घरी पोहोचले कर्मचारी : संरक्षणाचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने महावितरणला शहरातील जबाबदारी स्वीकारण्याबाबत केलेल्या विनंतीमुळे कर्मचारी घाबरले आहेत. त्यांना आपल्या भविष्याची चिंता सतावू लागली आहे. याच चिंतेने सोमवारी सकाळी एसएनडीएलचे कर्मचारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी पोहोचले. यावेळी कर्मचाऱ्यांनी एसएनडीएल कंपनी नागपुरातून जात असेल तर येथील कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये सामावून घेण्याची विनंती केली. बावनकुळे यांनीही यावेळी कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले.शहरातील तीन डिव्हिजनची वीज वितरणाची व्यवस्था एसएनडीएलकडे आहे. कंपनीने १२ ऑगस्ट रोजी महावितरणला एक पत्र पाठवून कंपनीची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याचे सांगितले आहे. ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्यासही अडचण येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. या पत्राची माहिती होताच कर्मचारी आपल्या भविष्याबाबत घाबरलेले आहेत.त्यांनी सोमवारी ऊर्जामंत्र्यांना आपल्या समस्या सांगत निवेदन सादर केले. त्यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सांगितले की, कंपनी काम सोडून गेल्यास ते बेरोजगार होतील. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षात पगारात कुठलीही वाढ झालेली नाही. त्यांना पीएलपीच्या माध्यमातून १५ ते २० टक्के वेतन दिले जाते. कंपनी व्यवस्थापनातर्फे लिखित आश्वासन मिळाल्यानंतरही त्यांना पीएलपी मिळालेला नाही. त्यामुळे ते आपल्या पगारापासूनही वंचित होत आहेत. त्यांच्याविरुद्ध बदल्याच्या भावनेने कारवाई होऊ नये. ते पूर्ण इमानदारीने काम करू इच्छितात. त्यांना केवळ आपल्या भविष्याची चिंता आहे.प्रादेशिक संचालक ऐकणार समस्याऊर्जामंत्री बावनकुळे यांनी कर्मचाऱ्यांना आश्वस्त केले की, सरकार त्यांच्या हिताचे रक्षण करेल. त्यांनी महावितरणचे कार्यकारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांना फोन करून कर्मचाºयांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.चर्चा योग्य दिशेने सुरूएसएनडीएल कंपनीची महावितरण आणि बँकांसोबत योग्य दिशेने चर्चा सुरू आहे. कंपनी केवळ आपल्या आर्थिक स्थितीबाबत चिंतेत आहे. कंपनीने परिस्थिती पाहून महावितरणला केवळ काही सवलती मागितल्या आहेत. बँकांनाही कमी व्याजावर कर्ज देण्याची विनंती केली आहे. ही चर्चा ज्या दिशेने सुरू आहे त्यावरून परिस्थिती सामान्य होईल, असा विश्वास आहे.सोनल खुराणाबिझनेस हेड , एसएनडीएल

टॅग्स :mahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारी