शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

देशभर संतापाची लाट उसळवणाऱ्या प्रकरणांचा तपास 'सिंहिणीं'कडे; गुंतागुंत उकलणार : तिकडे तेजतर्रार सीमा पाहुजा आणि ईकडे आरती सिंग

By नरेश डोंगरे | Updated: August 20, 2024 23:43 IST

कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमधील लेडी डॉक्टरच्या बलात्कार आणि खून प्रकरणाने देशभर संतापाची लाट निर्माण केली आहे.

नागपूर : देशभरातील समाजमन पेटविणाऱ्या कोलकाता येथील घटनेपाठोपाठ आता महाराराष्ट्रातील बदलापूरमध्येही निरागस चिमुकल्यांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण पुढे आले आहे. त्यामुळे समाजमनाच्या भावनांचा उद्रेक होत असल्याचे पाहुन या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आणि दोन्ही प्रकरणातील हिंस्त्र आरोपींना त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा देण्यासाठी दोन तेजतर्रार महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोलकाता प्रकरणाची चाैकशी बहुचर्चित आयपीएस सीमा पाहुजा करणार असून, बदलापूरच्या प्रकरणाचा तपास आयपीएस डॉ. आरती सिंग करणार आहेत. 'शेरणी' म्हणून तपास यंत्रणांमध्ये या दोन्ही अधिकाऱ्यांची ओळख आहे.

कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमधील लेडी डॉक्टरच्या बलात्कार आणि खून प्रकरणाने देशभर संतापाची लाट निर्माण केली आहे. अत्यंत क्लिष्ट ठरलेल्या या प्रकरणाचा तपास करताना राजकीय हस्तक्षेपाचे अडथळे येऊ शकते, ही शंका असल्याने सीमा पाहुजा यांना या प्रकरणाच्या चाैकशीसाठी नियुक्त करण्यात आले आहे.

कोण आहेत सीमा पाहूजा ?

सीमा पाहुजा सध्या गाजियाबादला सीबीआय (एसीबी)मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी अशाच प्रकारे देशभर खळबळ उडवून देणाऱ्या शिमला, हिमाचल प्रदेशच्या गुडिया रेप ॲण्ड मर्डर केसमध्ये तसेच हाथरस प्रकरणात सायंटिफिक टेक्नॉलॉजीचा वापर करून तंत्रशुद्ध पुरावे गोळा केले होते. त्याचमुळे अत्यंत गुंतागुंतीच्या या दोन्ही प्रकरणाचा उलगडा होऊन आरोपीं कोठडीत पोहचले होते.

विशेष म्हणजे, अत्यंत कडक, प्रामाणिक आणि कोणत्याही दडपणाला बळी न पडता नवनव्या तंत्राचा वापर करून त्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तपास यंत्रणांमध्ये नावारुपाला आल्या आहेत. त्यामुळे पॉलिटिकल कनेक्शन असलेली आणि गाजलेली मात्र क्लिष्ट प्रकरणे हाताळण्यासाठी सीमा यांना दिली जातात. उत्कृष्ट तपासाचे मॉडल ठरलेल्या २००७ आणि २०१८ च्या दोन प्रकरणात त्यांना दोन वेळा गोल्ड मेडल मिळाले आहे.

या आहेत आरती सिंग

आयपीएस आरती सिंग टेक्नोसॅव्ही तसेच भिडस्त अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. सध्या त्या मुंबईला पोलीस महासंचालनालयात पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आरती यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील तीन बहिणींच्या रहस्यमय मृत्यूची तसेच विधवा, एकाकी महिलांना जाळ्यात अडवून त्यांना गर्भवती करायचे आणि त्याचे बाळ विकण्यासाठी महिलांची हत्या करायची, असा आरोप असणाऱ्या एका प्रकरणाची चाैकशी केली होती. याशिवायही त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळवून अनेक मेडल मिळवलेले आहे. कसल्याही राजकीय दडपणाला भीक न घालता थेट भिडणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांनी अमरावती येथे काम करताना स्वत:ची ओळख करून दिली आहे. आता बदलापूरच्या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत केली आहे.

टॅग्स :Policeपोलिस